शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमधील नेत्यांचा वाद फडणवीस मिटवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST

सांगली : भाजपमधील नाराज जिल्हा परिषद सदस्यांनी अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी फिल्डींग लावली होती. यावरुन भाजप ...

सांगली : भाजपमधील नाराज जिल्हा परिषद सदस्यांनी अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी फिल्डींग लावली होती. यावरुन भाजप नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. भाजपमधील संघर्ष टाळण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या आठवड्यात जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वीच जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्धचा ठराव बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत.

महापालिकेतील सत्ता गेल्यामुळे भाजप सध्या ताकही फुंकून पिताना दिसत आहे. म्हणूनच जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाला भाजपच्या बहुतांशी नेत्यांचा विरोध आहे. खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे हे दोनच नेते बदलाच्या बाजूने आहेत. अन्य नेते जिल्हा परिषद पदाधिकारी बदलण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्यामुळे भाजपच्या नाराज १८ सदस्यांनी अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्याविरुध्द अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरु केली होती. सदस्यांच्या सह्याही घेतल्या होत्या. त्यापैकी तडसर (ता. कडेगाव) जिल्हा परिषद गटातील शांता कनुंजे आणि बिळूर (ता. जत) गटाच्या सदस्य मंगल नामद यांनी आमची फसवणूक घेऊन सह्या घेतल्या आहेत, अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यामुळे अविश्वास ठरावाच्या बाजूच्या भाजप सदस्यांची सख्या १६ झाली आहे. तसेच मूळ भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी जिल्हा परिषदेतील भाजपमधील संघर्ष देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. त्यानुसार फडणवीस यांनी येत्या आठवड्यात जिल्ह्यातील भाजप नेत्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये भाजपच्या अंतर्गत संघर्षाबद्दलच चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये पदाधिकारी बदलावरही चर्चा होणार आहे. त्यापूर्वीच भाजपच्या नाराज जिल्हा परिषद सदस्यांचीही समजूत नेते मंडळीकडून काढली जात आहे. यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास ठराव जवळपास बारगळल्यातच जमा आहे, अशी माहिती भाजप नेत्यांकडून मिळाली.

चौकट

अविश्वास ठरावासाठी महिन्याचाच अवधी

जिल्हा परिषद निवडणूकांना सहा महिने अवधी असेल तर अविश्वास ठराव आणता येत नाही. सहा महिन्यांपेक्षा जादाचा कालावधी निवडणुकांसाठी शिल्लक असेल तरच अविश्वास ठराव मांडता येतो. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीला सप्टेंबरनंतर सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक राहात आहे. सप्टेंबरनंतर जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव आणता येत नाही. त्यामुळे दि. २० सप्टेंबर २०२१पर्यंतच भाजपचे नाराज जिल्हा परिषद सदस्य अविश्वास ठराव आणू शकतात, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.