शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

भाजपमधील नेत्यांचा वाद फडणवीस मिटवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST

सांगली : भाजपमधील नाराज जिल्हा परिषद सदस्यांनी अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी फिल्डींग लावली होती. यावरुन भाजप ...

सांगली : भाजपमधील नाराज जिल्हा परिषद सदस्यांनी अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी फिल्डींग लावली होती. यावरुन भाजप नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. भाजपमधील संघर्ष टाळण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या आठवड्यात जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वीच जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्धचा ठराव बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत.

महापालिकेतील सत्ता गेल्यामुळे भाजप सध्या ताकही फुंकून पिताना दिसत आहे. म्हणूनच जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाला भाजपच्या बहुतांशी नेत्यांचा विरोध आहे. खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे हे दोनच नेते बदलाच्या बाजूने आहेत. अन्य नेते जिल्हा परिषद पदाधिकारी बदलण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्यामुळे भाजपच्या नाराज १८ सदस्यांनी अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्याविरुध्द अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरु केली होती. सदस्यांच्या सह्याही घेतल्या होत्या. त्यापैकी तडसर (ता. कडेगाव) जिल्हा परिषद गटातील शांता कनुंजे आणि बिळूर (ता. जत) गटाच्या सदस्य मंगल नामद यांनी आमची फसवणूक घेऊन सह्या घेतल्या आहेत, अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यामुळे अविश्वास ठरावाच्या बाजूच्या भाजप सदस्यांची सख्या १६ झाली आहे. तसेच मूळ भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी जिल्हा परिषदेतील भाजपमधील संघर्ष देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. त्यानुसार फडणवीस यांनी येत्या आठवड्यात जिल्ह्यातील भाजप नेत्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये भाजपच्या अंतर्गत संघर्षाबद्दलच चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये पदाधिकारी बदलावरही चर्चा होणार आहे. त्यापूर्वीच भाजपच्या नाराज जिल्हा परिषद सदस्यांचीही समजूत नेते मंडळीकडून काढली जात आहे. यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास ठराव जवळपास बारगळल्यातच जमा आहे, अशी माहिती भाजप नेत्यांकडून मिळाली.

चौकट

अविश्वास ठरावासाठी महिन्याचाच अवधी

जिल्हा परिषद निवडणूकांना सहा महिने अवधी असेल तर अविश्वास ठराव आणता येत नाही. सहा महिन्यांपेक्षा जादाचा कालावधी निवडणुकांसाठी शिल्लक असेल तरच अविश्वास ठराव मांडता येतो. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीला सप्टेंबरनंतर सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक राहात आहे. सप्टेंबरनंतर जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव आणता येत नाही. त्यामुळे दि. २० सप्टेंबर २०२१पर्यंतच भाजपचे नाराज जिल्हा परिषद सदस्य अविश्वास ठराव आणू शकतात, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.