शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

कारखान्यांचे धुराडे नोव्हेंबरमध्ये पेटणार

By admin | Updated: October 8, 2014 23:01 IST

शासनाचा आदेश धुडकावणार : पाऊस, ऊस दर, कामगारांच्या आंदोलनामुळे कारखानदारांचा निर्णय

सांगली : १५ आॅक्टोबरपासून साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करण्याचे फर्मान राज्य शासनाने काढले आहे. पण, पाऊस, साखरेचे गडगडले दर, ऊस दराचा प्रश्न, तसेच साखर कारखान्यांतील कामगारांनी वेतन करारासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकल्यामुळे, साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम खडतरच दिसत आहे. या समस्यांचा विचार करूनच जिल्ह्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. ऊस दराचा प्रश्न वेळेवर सुटला तरच नोव्हेंबरमध्ये गळीत हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे.उपलब्ध ऊस संपण्याच्यादृष्टीने राज्य शासनाने १५ आॅक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा आदेश साखर कारखानदारांना दिला आहे. हा आदेश देताना त्यांनी ऊस दराचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतीच पावले उचलल्याचे दिसत नाही. राज्य सरकारने ऊसदर निर्धारण समिती गठित केली आहे. या समितीमध्ये कारखानदार, संघटनांचे प्रतिनिधी, राज्याचे मुख्य सचिव समितीचे प्रमुख आहेत. समिती गठित झाल्यापासून आजपर्यंत त्यांची बैठकच झालेली नाही. शासनाच्या नियमानुसार साखर कारखाने सुरू करण्यास केवळ सात दिवस शिल्लक असतानाही, उसाचा दर ठरविणाऱ्या समितीची एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे ऊस दरावर तोडगा निघण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. सध्या पश्चिम महाराष्ट्रात तर उष्ण तापमान निर्माण होऊन मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. उष्णता आणि पाऊस याचा साखर उताऱ्यावर वाईट परिणाम होत असल्यामुळे साखर कारखानदारांनी, शासन काहीही आदेश देऊ दे, गळीत हंगाम नोव्हेंबरमध्येच घेण्याचा निर्णय घेतला आहे. गळीत हंगाम लांबविण्यामागचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, कामगारांचा वेतन करार अद्याप झालेला नाही. तो निश्चित करण्याच्या द्विसदस्यीय समितीमध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे होते. मुंडे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या जागेवर पंकजा मुंडे-पालवे यांची नियुक्ती केली आहे, पण विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे वेतन कराराच्या प्रश्नावर पवार आणि मुंडे-पालवे यांची बैठकच झालेली नाही. त्यामुळे कामगारांचा वेतन कराराचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे साखर कारखान्यांतील कामगार आणि ऊस तोडणी मजुरांनी, वेतन करार झाल्याशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा दिला आहे. ऊस उत्पादकांच्या आंदोलनासह यंदा साखर कामगारांच्या आंदोलनाच्या रोषालाही साखर कारखानदारांना सामोरे जावे लागणार आहे. सरकार पडले तर दराचा तिढा लवकर सुटणार का?, असा प्रश्न साखरसम्राटांना भेडसावत आहे. या सर्व प्रश्नांवर उपाय म्हणून कारखानदारांनी गळीत हंगामच नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर, ऊसदर आणि कामगारांच्या वेतन कराराचा प्रश्न मिटल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटवण्याची घाई कारखानदार करणार नाहीत, हे उघड आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)साखरेच्या दरावर उसाचा दर हे सूत्र चुकीचेसाखरेचे दर गडगडले म्हणून शेतकऱ्यांचा ऊस उत्पादनाचा खर्च कमी होत नाही. यामुळे शासन आणि कारखानदारांनी साखरेच्या दरावर उसाचा दर निश्चित करू नये. हवे तर शासनाने अनुदान द्यावे. पण, शेतकऱ्यांना प्रतिटन ३३०० रुपये दर मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. प्रसंगी रस्त्यावरील लढाईही आम्ही करण्यास तयार आहोत, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे.साखरेचे दर गडगडलेसाखर कारखान्यांकडून विक्री होणाऱ्या साखरेला २७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. साखरेचे दर दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे साखर कारखान्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य बँकेकडून साखरेला प्रतिक्विंटल २८१० रुपये दर गृहित धरून कर्ज दिले आहे. याहीपेक्षा दर कमी झाल्यामुळे बँकेचे कर्ज आणि व्याज भागवणे हेही कारखान्यांसमोर मोठे आव्हान आहे. यामुळे कारखानदारी टिकवण्यासाठी केंद्र शासनाने कच्ची साखर निर्यात करण्यासाठी अनुदान देण्याची गरज आहे, अशी मागणी राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केली आहे. शासनाने काही आदेश दिला असला तरी, गळीत हंगाम नोव्हेंबरमध्येच सुरू होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.