शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांचे डोळे पाणावले... क्रिकेट खेळताना मृत्युमुखी पडलेला अतुल 'निवडणुकीत जिंकला'

By महेश गलांडे | Updated: January 19, 2021 08:31 IST

निवडणूक निकालानंतर गड आला पण सिंह गेला, अशी प्रतिक्रिया अतुलच्या मित्रांनी दिली. आटपाडी येथे मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान अतुल विष्णू पाटील (वय 35 रा. ढवळी ता.तासगांव) येथील युवकाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता

ठळक मुद्देअतुल पाटील हा खासदार संजय पाटील समर्थक तसेच ढवळी गावचा माजी उपसरपंच होता. यंदा त्यानेच पॅनेल उभा करण्यात पुढाकार घेतला होता, म्हणून तोच सरपंच पदाचा दावेदारदेखील होता.

सांगली/मुंबई - सांगली जिल्ह्यात ढवळी गावात क्रिकेटच्या मैदानात एक धक्कादायक घटना घडली. क्रिकेट खेळताना सरपंच अतुल पाटील यांना  ग्राउंडवर हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीत अतुल उमेदवार होता. 18  जानेवारी रोजी ग्रामपंचायतीचा निकाल लागला अन् गावातील मित्र परिवाराच्या अश्रूंचा बांध फुटला. कारण, अतुलने यंदाच्या निवडणुकीत 333 मेत घेऊन सहजच विजय मिळवला होता. तर, ज्या पॅनेलकडून अतुल निवडणुकीत उभा राहिला होता, त्या पॅनेलने ढवळी ग्रामपंचायतीवर वर्चस्वही मिळवलं आहे. 

निवडणूक निकालानंतर गड आला पण सिंह गेला, अशी प्रतिक्रिया अतुलच्या मित्रांनी दिली. आटपाडी येथे मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान अतुल विष्णू पाटील (वय 35 रा. ढवळी ता.तासगांव) येथील युवकाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. अतुल हा ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभा होता.  याशिवाय अतुलने पुढाकार घेऊन उभारलेले शिवशंभू पॅनेलही 11 पैकी 10 जागांवर विजय मिळवत निवडून आले आहे. कायम गावकऱ्यांच्या सुखा-दु:खात हिरिरीने सहभाग घेणारा अतुल या सुखाच्या सर्वोच्च क्षणी गावकऱ्यांमध्ये नव्हता. त्यामुळे, विजयाचं सेलिब्रेशन करायचं की अतुल नसल्याचं दु:ख अशी भावनिक परिस्थिती गावकरी आणि मित्र परिवारावर ओढवली होती. 

अतुल पाटील हा खासदार संजय पाटील समर्थक तसेच ढवळी गावचा माजी उपसरपंच होता. यंदा त्यानेच पॅनेल उभा करण्यात पुढाकार घेतला होता, म्हणून तोच सरपंच पदाचा दावेदारदेखील होता. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते, निवडणूक निकालापूर्वीच अतुलचे दुर्दैवी निधन झाले. गावकऱ्यांसाठी आणि अतुलच्या मित्रपरिवारासाठी हा मोठा धक्का होता. निकालानंतर स्थानिक सोशल मीडियातूनही अतुलच्या आठवणी जागवल्या जात आहेत. अनेकांकडून गड आला पण सिंह गेला, अशीच भावना व्यक्त केली जात आहे. एकीकडे विजयामुळे आनंदाश्रू तरळले असताना दुसरीकडे, अतुलच्या नसण्याने दु:खी नयनांनी डोळेही पाणावले आहेत. गावातील ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दिवसभर पॅनेलमधील लोकांनी अतुलला श्रद्धांजली वाहिली.    

टॅग्स :Deathमृत्यूgram panchayatग्राम पंचायतSangliसांगली