शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

गावकऱ्यांचे डोळे पाणावले... क्रिकेट खेळताना मृत्युमुखी पडलेला अतुल 'निवडणुकीत जिंकला'

By महेश गलांडे | Updated: January 19, 2021 08:31 IST

निवडणूक निकालानंतर गड आला पण सिंह गेला, अशी प्रतिक्रिया अतुलच्या मित्रांनी दिली. आटपाडी येथे मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान अतुल विष्णू पाटील (वय 35 रा. ढवळी ता.तासगांव) येथील युवकाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता

ठळक मुद्देअतुल पाटील हा खासदार संजय पाटील समर्थक तसेच ढवळी गावचा माजी उपसरपंच होता. यंदा त्यानेच पॅनेल उभा करण्यात पुढाकार घेतला होता, म्हणून तोच सरपंच पदाचा दावेदारदेखील होता.

सांगली/मुंबई - सांगली जिल्ह्यात ढवळी गावात क्रिकेटच्या मैदानात एक धक्कादायक घटना घडली. क्रिकेट खेळताना सरपंच अतुल पाटील यांना  ग्राउंडवर हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीत अतुल उमेदवार होता. 18  जानेवारी रोजी ग्रामपंचायतीचा निकाल लागला अन् गावातील मित्र परिवाराच्या अश्रूंचा बांध फुटला. कारण, अतुलने यंदाच्या निवडणुकीत 333 मेत घेऊन सहजच विजय मिळवला होता. तर, ज्या पॅनेलकडून अतुल निवडणुकीत उभा राहिला होता, त्या पॅनेलने ढवळी ग्रामपंचायतीवर वर्चस्वही मिळवलं आहे. 

निवडणूक निकालानंतर गड आला पण सिंह गेला, अशी प्रतिक्रिया अतुलच्या मित्रांनी दिली. आटपाडी येथे मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान अतुल विष्णू पाटील (वय 35 रा. ढवळी ता.तासगांव) येथील युवकाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. अतुल हा ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभा होता.  याशिवाय अतुलने पुढाकार घेऊन उभारलेले शिवशंभू पॅनेलही 11 पैकी 10 जागांवर विजय मिळवत निवडून आले आहे. कायम गावकऱ्यांच्या सुखा-दु:खात हिरिरीने सहभाग घेणारा अतुल या सुखाच्या सर्वोच्च क्षणी गावकऱ्यांमध्ये नव्हता. त्यामुळे, विजयाचं सेलिब्रेशन करायचं की अतुल नसल्याचं दु:ख अशी भावनिक परिस्थिती गावकरी आणि मित्र परिवारावर ओढवली होती. 

अतुल पाटील हा खासदार संजय पाटील समर्थक तसेच ढवळी गावचा माजी उपसरपंच होता. यंदा त्यानेच पॅनेल उभा करण्यात पुढाकार घेतला होता, म्हणून तोच सरपंच पदाचा दावेदारदेखील होता. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते, निवडणूक निकालापूर्वीच अतुलचे दुर्दैवी निधन झाले. गावकऱ्यांसाठी आणि अतुलच्या मित्रपरिवारासाठी हा मोठा धक्का होता. निकालानंतर स्थानिक सोशल मीडियातूनही अतुलच्या आठवणी जागवल्या जात आहेत. अनेकांकडून गड आला पण सिंह गेला, अशीच भावना व्यक्त केली जात आहे. एकीकडे विजयामुळे आनंदाश्रू तरळले असताना दुसरीकडे, अतुलच्या नसण्याने दु:खी नयनांनी डोळेही पाणावले आहेत. गावातील ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दिवसभर पॅनेलमधील लोकांनी अतुलला श्रद्धांजली वाहिली.    

टॅग्स :Deathमृत्यूgram panchayatग्राम पंचायतSangliसांगली