शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

गावकऱ्यांचे डोळे पाणावले... क्रिकेट खेळताना मृत्युमुखी पडलेला अतुल 'निवडणुकीत जिंकला'

By महेश गलांडे | Updated: January 19, 2021 08:31 IST

निवडणूक निकालानंतर गड आला पण सिंह गेला, अशी प्रतिक्रिया अतुलच्या मित्रांनी दिली. आटपाडी येथे मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान अतुल विष्णू पाटील (वय 35 रा. ढवळी ता.तासगांव) येथील युवकाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता

ठळक मुद्देअतुल पाटील हा खासदार संजय पाटील समर्थक तसेच ढवळी गावचा माजी उपसरपंच होता. यंदा त्यानेच पॅनेल उभा करण्यात पुढाकार घेतला होता, म्हणून तोच सरपंच पदाचा दावेदारदेखील होता.

सांगली/मुंबई - सांगली जिल्ह्यात ढवळी गावात क्रिकेटच्या मैदानात एक धक्कादायक घटना घडली. क्रिकेट खेळताना सरपंच अतुल पाटील यांना  ग्राउंडवर हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीत अतुल उमेदवार होता. 18  जानेवारी रोजी ग्रामपंचायतीचा निकाल लागला अन् गावातील मित्र परिवाराच्या अश्रूंचा बांध फुटला. कारण, अतुलने यंदाच्या निवडणुकीत 333 मेत घेऊन सहजच विजय मिळवला होता. तर, ज्या पॅनेलकडून अतुल निवडणुकीत उभा राहिला होता, त्या पॅनेलने ढवळी ग्रामपंचायतीवर वर्चस्वही मिळवलं आहे. 

निवडणूक निकालानंतर गड आला पण सिंह गेला, अशी प्रतिक्रिया अतुलच्या मित्रांनी दिली. आटपाडी येथे मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान अतुल विष्णू पाटील (वय 35 रा. ढवळी ता.तासगांव) येथील युवकाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. अतुल हा ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभा होता.  याशिवाय अतुलने पुढाकार घेऊन उभारलेले शिवशंभू पॅनेलही 11 पैकी 10 जागांवर विजय मिळवत निवडून आले आहे. कायम गावकऱ्यांच्या सुखा-दु:खात हिरिरीने सहभाग घेणारा अतुल या सुखाच्या सर्वोच्च क्षणी गावकऱ्यांमध्ये नव्हता. त्यामुळे, विजयाचं सेलिब्रेशन करायचं की अतुल नसल्याचं दु:ख अशी भावनिक परिस्थिती गावकरी आणि मित्र परिवारावर ओढवली होती. 

अतुल पाटील हा खासदार संजय पाटील समर्थक तसेच ढवळी गावचा माजी उपसरपंच होता. यंदा त्यानेच पॅनेल उभा करण्यात पुढाकार घेतला होता, म्हणून तोच सरपंच पदाचा दावेदारदेखील होता. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते, निवडणूक निकालापूर्वीच अतुलचे दुर्दैवी निधन झाले. गावकऱ्यांसाठी आणि अतुलच्या मित्रपरिवारासाठी हा मोठा धक्का होता. निकालानंतर स्थानिक सोशल मीडियातूनही अतुलच्या आठवणी जागवल्या जात आहेत. अनेकांकडून गड आला पण सिंह गेला, अशीच भावना व्यक्त केली जात आहे. एकीकडे विजयामुळे आनंदाश्रू तरळले असताना दुसरीकडे, अतुलच्या नसण्याने दु:खी नयनांनी डोळेही पाणावले आहेत. गावातील ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दिवसभर पॅनेलमधील लोकांनी अतुलला श्रद्धांजली वाहिली.    

टॅग्स :Deathमृत्यूgram panchayatग्राम पंचायतSangliसांगली