शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पोलिसांची नजर हटली अन् शहरात वर्दळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कडक लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत झालेली कडक तपासणी आता बंद झाली आहे. पोलिसांची लोकांकडील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कडक लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत झालेली कडक तपासणी आता बंद झाली आहे. पोलिसांची लोकांकडील नजर हटताच शहरातील लोकांची वर्दळ वाढली आहे. अकारण भटकंती करणाऱ्यांची संख्या यात अधिक आहे.

सांगली शहरात माधवनगर जकात नाका, काॅलेज कार्नर, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, पटेल चौक, स्टेशन चौक, एसटी स्टँड, कोल्हापूर रोड, विश्रामबाग चौक याठिकाणी पोलिसांनी बॅरिकेट्स लावून तपासणी नाके केले आहेत. मात्र, हे नाके आता पोलिसांचे विश्रांती नाके बनले आहेत. बुधवारी शहरातील एकाही नाक्यावर तपासणी होत नव्हती. त्यामुळे अनेक चारचाकी व दुचाकी वाहने रस्त्यावर आली. दिवसभर नागरिकांची वर्दळ वाढली होती.

कडक लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत पोलीस प्रमुखांनी मोठी कारवाई केल्याने सर्व ठिकाणी बंदोबस्तातील पोलीस अलर्ट झाले. पोलीस प्रमुखांचे दुर्लक्ष होताच पोलिसांची तपासणीत ढिलाई सुरू झाली. त्याचा गैरफायदा घेत लोक रस्त्यावर फिरू लागले आहेत. तरुण मुलेही भरधाव वेगाने दुचाकी फिरविताना दिसत आहेत. अत्यावश्यक वाहनांसह अन्य वाहनेही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दिसत आहेत. त्यांची कोणीही तपासणी करीत नाहीत.

चौकट

संचारबंदीची व्याख्या बदलली

संचारबंदीच्या काळात मुक्त संचार करता येतो, हे सांगलीकरांनी दाखवून दिले आहे. संचारबंदीची व्याख्याच बदलली, नव्या व्याख्येप्रमाणे संसर्गाला निमंत्रण देत नागरिकांचा पोलिसांसमोर मुक्त संचार सुरू आहे.

चौकट

गृहविलगीकरणातील लोक रस्त्यावर

गृहविलगीकरणातील लोक आता रस्त्यावर फिरत आहेत. माधवनगर, शिवोदयनगर येथील काही रुग्ण मंगळवारी रात्री रस्त्यावरून फिरत होते. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. रस्त्यावरून फिरणारे, गृह विलगीकरणातील रुग्ण अशा कोणावरही प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष नसल्याचे दिसत आहे.