शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

Sangli News: मणेराजुरीतील द्राक्ष उत्पादकांना ४७ लाखांचा गंडा, उत्तर प्रदेशचे संशयित पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 18:39 IST

सुरुवातीला रोख रक्कम देऊन द्राक्ष उत्पादकांचा विश्वास संपादन केला

तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील द्राक्ष बागायतदारांचा विश्वास मिळवून, त्यांच्याकडून द्राक्ष खरेदी करून, उत्तर प्रदेशमधील तीन व्यापाऱ्यांनी अवघ्या पंधरा दिवसांत २० द्राक्ष उत्पादकांना ४७ लाख रुपयांचा गंडा घातला. हे व्यापारी ‘नॉट रिचेबल’ झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, ही द्राक्षे विक्रीसाठी बाजारात नेत असतानाच चार वाहने शेतकऱ्यांनी ताब्यात घेतली.उत्तर प्रदेशमधील तीन व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी तासगाव परिसरात १५ दिवसांपूर्वी दाखल झाले होते. तासगाव येथील एजंटाला हाताशी धरून त्यांनी आरवडे येथे राहण्यासाठी जागा मिळवली. त्यानंतर मणेराजुरी परिसरात द्राक्ष हंगामाला सुरुवात झाल्यानंतर २३ जानेवारीपासून खरेदीला सुरुवात केली.सुरुवातीला रोख रक्कम देऊन द्राक्ष उत्पादकांचा विश्वास संपादन केला. रोखीने रक्कम मिळत असल्यामुळे मणेराजुरीतील शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांना द्राक्षांची विक्री केली. खरेदी वाढल्यानंतर काही रक्कम देऊन, तांत्रिक कारणे सांगून उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. पंधरा दिवसांत २० शेतकऱ्यांची द्राक्ष खरेदी करून, त्यांची ४७ लाख रुपयांची देणी बाकी ठेवली.बुधवारी (दि. १) रात्री संबंधित व्यापाऱ्यांनी आरवडे येथील स्वतःचा बिस्तारा गुंडाळून पोबारा केला. गुरुवार, दि. २ पासून त्यांचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’ लागत असल्याने या व्यापाऱ्यांनी गंडा घातल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मंगळवारी (दि. ७) शेतकऱ्यांनी तासगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिस ठाण्यात याबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, तासगाव येथील एजंटाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.मालेगाव, लखनौजवळ चार वाहनांतील माल ताब्यातफसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही शेतकऱ्यांनी तातडीने, ज्या ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या वाहनांतून व्यापाऱ्यांनी द्राक्षे नेली होती, त्या कंपनीशी संपर्क साधून वाटेतच वाहने ताब्यात घेण्याची व्यवस्था केली. त्यानुसार मालेगावजवळ दोन, तर लखनौजवळ दोन वाहनांमधील दहा हजार पेट्या ताब्यात घेऊन विक्री करण्यासाठी यंत्रणा लावली.पोलिसांच्या आवाहनाला केराची टोपलीकाही दिवसांपूर्वी तासगाव पोलिस ठाण्यात व्यापारी, एजंट, शेतकऱ्यांची बैठक घेऊन पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी व्यापाऱ्यांचे ओळखपत्र, बँकेच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच द्राक्षांची विक्री करण्याबाबत आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाला उत्पादकांनी केराची टोपली दाखवली. फसवणूक झालेल्या एकाही शेतकऱ्याकडे संबंधित व्यापाऱ्याचे ओळखपत्र किंवा पूर्ण माहिती नसल्याचे निष्पन्न झाले आहे.या शेतकऱ्यांची झाली फसवणूकफसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये पांडुरंग महादेव जमदाडे, संतोष बबन जमदाडे, सुभाष रामचंद्र एरंडोले, परशराम वसंत एरंडोले, परशराम धाेंडीराम वाघमारे, शशिकांत शिवाजी कलढाेणे, अनिल बबन चव्हाण, वसंत पंडित लांडगे, रवींद्र नामदेव जमदाडे, गोविंद बाबा भोसले, उदय रघुनाथ भोसले, विजय ऊर्फ कुंडलिक लक्ष्मण लांडगे, रमेश अर्जुन लांडगे, अमोल नारायण माने, प्रकाश तुकाराम कलढोणे, सदाशिव पांडुरंग कलढोणे, विनायक कृष्णराव कांबळे, मौला जलालुद्दीन मुजावर, संदीप हनुमंत बेडगे व राम प्रभाकर पवार यांचा समावेश आहे.

टॅग्स :Sangliसांगली