शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Sangli: विस्तारित ‘म्हैसाळ’च्या कामाला आठवड्यात सुरुवात, ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश 

By अशोक डोंबाळे | Updated: July 14, 2023 18:35 IST

जत पूर्वच्या वंचित ६५ गावांना मिळणार अखेर न्याय

सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ गावांसाठी एक हजार ९२८ कोटी रुपये खर्चाच्या विस्तारित म्हैसाळ म्हणजेच जत उपसा सिंचन योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. कामाच्या पहिल्या टप्प्याची ९८१ कोटी ६० लाख ९२ हजार रुपयांचे काम मिळविण्यात कोल्हापूरची लक्ष्मी इन्फ्रा ही कंपनी यशस्वी झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारास काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या आठवड्यात प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा जत तालुक्यातील १२५ पैकी ७७ गावांना लाभ मिळत आहे. मात्र, पूर्व भागातील ६५ गावे पाण्यापासून वंचित होती. त्यांना पाणी देण्यासाठी राज्य शासनाने विस्तारित म्हैसाळ योजनेमधून ‘जत उपसा सिंचन योजना’ नावाने प्रकल्प मंजूर केला आहे. मूळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन म्हणजे बेडग (ता. मिरज) येथून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी सहा टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. त्यातून ६५ गावांतील ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.यासाठी शासनाने १ हजार ९२८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. टप्पा क्रमांक एक, दोन आणि तीन येथे पंपगृह, ऊर्ध्वगामी नलिका, टप्पा क्रमांक एक व दोनमधील जोड कालवे, बोगदा आदींच्या कामाची ९८१ कोटी ६० लाख ९२ हजार रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली होती. या मोठ्या कामाची निविदा मिळविण्यात लक्ष्मी इन्फ्रा ही कंपनी यशस्वी झाली आहे. या कंपनीला जलसंपदा विभागाने काम सुरू करण्याचे आदेशही दिले आहेत. येत्या आठ दिवसांत विस्तारित म्हैसाळ म्हणजेच जत उपसा सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे.

राजकीय घडामोडीमुळे थेट कामालाच सुरुवातराज्यात सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरू असून त्यामुळे विस्तारित म्हैसाळ जत उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही. योजनेच्या कामाला जास्तीचा वेळ न लावता थेट काम सुरू करून नंतर कामाचा शुभारंभ करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाच्या हालचाली सुरू आहेत. ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेशही जलसंपदा विभागाकडून दिले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी