शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात कालबाह्य पोषण आहार

By admin | Updated: June 30, 2015 23:21 IST

ठेकेदाराचा प्रताप : बालके, गरोदर स्त्रियांच्या आरोग्याला धोका

गजानन पाटील -संख -महिला व बालकल्याण विभागांतर्गत असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या जत तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना कालबाह्य पोषण आहार वाटप करण्यात आला आहे. उत्पादक कंपनीने पोषण आहाराच्या पाकिटावर असलेले बॅच नंबर, उत्पादनाचा दिनांक शाई लावून पुसण्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. कालबाह्य झालेला पोषण आहार गरोदर स्त्रिया व स्तनदा माता, बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणार आहे. या विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.तालुक्यामध्ये मोठ्या अंगणवाड्या ३४५, मिनी अंगणवाड्या ८० आहेत. अंगणवाड्यांमध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील १६ हजार ४२९ विद्यार्थी शिकत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे जत व उमदी प्रकल्प आहेत. अंगणवाडी सेविकांतर्फे गावातील बालक, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता कुपोषित बालकांचा सर्व्हे करण्यात येतो. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातून सूक्ष्म पोषक तत्त्वांनी समृद्ध केलेला ब्लेंडेड पोषण आहार पाककृती १ व २ असे आहाराचे वाटप केले जाते. ठेकेदाराकडून पोषण आहार पुरविला जातो.तालुक्यातील अंगणवाड्यांना पसायदान महिला संस्था सांगली या उत्पादक युनिटकडून पोषण आहार पुरविला जातो. एका महिन्याचे बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना आहार दिला जातो. महिन्यातून पाककृती १ व पाककृती २ असे दोन पिशव्यांचे वाटप केले जाते. त्याचे वजन १८२० ग्रॅम आहे. बालकांना पोषण आहारामध्ये शिरा, उपमा, तर गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना शिरा, सुकडी दिली जाते. प्लॅस्टिक गोण्यांमध्ये २० पाकिटे असतात. पिशव्यांवर बॅच नंबर, उत्पादनाचा दिनांक, उपयोगाचा अंतिम कालावधी नमूद केला आहे. परंतु कालबाह्य झालेल्या पोषण आहारातील पाकिटाच्या बॅच नंबर, उत्पादनाच्या दिनांकावर शाई लावण्यात आली आहे, तर काही पाकिटांवर उत्पादनाची १६ एप्रिल २०१५ ही तारीख आहे. उपयोगाचा अंतिम कालावधी उत्पादन केल्याच्या तारखेपासून ६ महिनेपर्यंत आहे, असा शिक्का आहे. म्हणजेच पाकिटे १६ जूनलाच कालबाह्य झाली आहेत. अंगणवाड्यांना १५ ते २० जूनपर्यंत ती वाटप करण्यात आली आहेत.कालबाह्य पोषण आहारामुळे बालकांच्या शारीरिक विकासावर त्याचा गंभीर परिणाम होतो. गर्भावर परिणाम होतो. स्तनदा मातांच्या आरोग्यावर परिणाम होतो. ठेकेदारांनी पुरविलेल्या पोषण आहाराचा दर्जा तपासला जात नाही. कालबाह्य आहाराची माहिती असूनही त्याचे वाटप झाले आहे. वाटप करताना, आहार कालबाह्य झालेला आहे, जनावरांना खायला घाला, असा मौलिक सल्ला सेविकांना वरिष्ठांनी दिला आहे. म्हणजेच माहिती असूनही ठेकेदाराचे हित जपण्याचा प्रयत्न झाला आहे. कालबाह्य झालेली पोषण आहाराची पाकिटे परत का पाठविली गेली नाहीत?, असा संतप्त सवाल पालकांतून उपस्थित केला जात आहे. या विभागाच्या निष्काळजीपणामुळे तो लवकर वाटप करण्यात आलेला नाही का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. बालके, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांच्या आरोेग्याशी खेळणाऱ्या या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.बिस्किटेही वादाच्या भोवऱ्यातजत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पोषण आहाराप्रमाणेच अंगणवाडीतील लहान मुलांना दिली जाणारी बिस्किटेही चांगल्या प्रतवारीची व गुणवत्तेची नाहीत, कमी दर्जाची आहेत, निकृष्ट आहेत. तीही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.अंगणवाडीतील पोषण आहार कालबाह्य झालेला आहे. याची पंचायत समितीकडे तक्रार केली आहे. चौकशी करण्याचे आश्वासन दिले, पण त्यावर कोणतीही चौकशी झालेली नाही. कालबाह्य पोषण आहार परत घ्यावा, दुसरा द्यावा. - भैरु कांबळे,सामाजिक कार्यकर्ते, दरीबडचीपोषण आहाराबाबत तक्रार आल्यानंतर आम्ही संबंधित आहार पुरविणाऱ्या ठेकेदारांशी पत्रव्यवहार केला आहे. त्याने यापुढे आपल्याकडून अशी चूक होणार नाही, असे लिहून दिले आहे. पोषण आहार कालबाह्य झालेला नाही. तो आजही चालतो.- ए. आर. मडकेसहायक गटविकास अधिकारी