शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नूतनीकरणासाठी तब्बल 'एक कोटी' खर्च, तरीही ‘बालगंधर्व’ची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 18:27 IST

नाट्यगृहाचे नूतनीकरण झाल्याचे भासवून येथे राज्य नाट्य स्पर्धा घेण्याचा घाट घातला जात आहे. त्याला मिरजेतील नाट्यकर्मी, रसिकांनी विरोध केला आहे.

मिरज : मिरजेची सांस्कृतिक ओळख असलेल्या बालगंधर्व नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी तब्बल एक कोटी खर्च झाले आहेत. मात्र नाट्यगृहात ध्वनी यंत्रणा व विद्युत यंत्रणेचे कामे अपूर्णच आहे. नाट्यगृहाचे नूतनीकरण झाल्याचे भासवून येथे राज्य नाट्य स्पर्धा घेण्याचा घाट घातला जात आहे. त्याला मिरजेतील नाट्यकर्मी, रसिकांनी विरोध केला आहे. ध्वनी व विद्युत यंत्रणेचे काम पूर्ण करण्याची मागणी शहरातील नाट्यसंस्था व रंगकर्मींनी केली आहे.नाट्यगृहात दर्जेदार ध्वनी व विद्युत यंत्रणा आवश्यक आहे. मिरजेत महापालिकेने साडेसात कोटी रुपये खर्चून बालगंधर्व नाट्यगृह बांधले आहे. मात्र कोट्यवधी खर्चून बांधलेल्या नाट्यगृहात अनेक उणिवा आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष असल्याने नाट्यगृहाच्या वापरावर मर्यादा आल्या आहेत. महापालिकेसाठी हे नाट्यगृह पांढरा हत्ती ठरले आहे. वापराअभावी ते भंगाराचे गोदाम बनले आहे. महापालिकेच्या कचरा गाड्या, घंटागाड्या, रेकॉर्ड, रद्दी व मोडके फर्निचर तळघरात ठेवण्यात येत आहे. मोकळ्या खोल्या महापालिकेचा विद्युत विभाग व मालमत्ता विभागाच्या ताब्यात आहेत.बालगंधर्व नाट्यगृहाच्या या उपेक्षेमुळे नाट्यकर्मींत अस्वस्थता आहे. त्याच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले. नूतनीकरणाचे रखडलेले काम दोन वर्षानंतर पूर्ण झाले. नाट्यगृहात खुर्च्यांची दुरुस्ती, कार्पेट, छताची गळती काढणे, रंगरंगोटी करणे, पडदे व्यवस्था दुरुस्ती, कुंपणभिंत रंगवणे, कुंपण दुरुस्ती अशा कामांवर एक कोटी रुपये खर्च झाले. नाट्यगृहाच्या ध्वनी व विद्युत यंत्रणेच्या कामासाठी आता निधीच शिल्लक नसल्याचा ठेकेदाराचा पवित्रा आहे. सुविधांचा अभाव असतानाही काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असल्याने नूतनीकरणाच्या कामात घोटाळा झाल्याची नाट्यकर्मींची तक्रार आहे. ध्वनी व विद्युत यंत्रणेचे काम पूर्ण झाल्याशिवाय नाट्यगृह सुरू करू नये अशी त्यांची मागणी आहे.रंगकर्मीसोबत चर्चा न करताच निर्णयमहापालिकेचे अधिकारी झालेले काम योग्य असल्याचे सांगत ठेकेदारास पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी लोकांची तक्रार आहे. ध्वनी व विद्युत यंत्रणा नसतानाही बालगंधर्व नाट्यगृहात राज्य नाट्य स्पर्धा घेण्यास नाट्यकर्मींनी विरोध दर्शविला आहे. सांगली-मिरजेतील रंगकर्मींसोबत चर्चा न करता राज्य नाट्य स्पर्धा मिरजेत बालगंधर्वमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काम अपूर्ण असताना नाट्यगृहात राज्य नाट्य स्पर्धा घेतल्यास आंदोलनाचा इशारा काही रंगकर्मींनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरज