शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पंचायत समित्यांचे अस्तित्व संपविलेच पाहिजे : मुळीक -- चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 21:47 IST

७३ व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आणली. आज फक्त महाराष्टतच पंचायत समित्या आहेत. - अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक

ठळक मुद्देजिल्हा समितीचे बळकटीकरण आवश्यक

दिलीप मोहिते ।शासनाने तालुका पंचायत समितीचे अधिकार काढून घेऊन अनुदान थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व सदस्यांकडे काहीही अधिकार राहिले नाहीत. हे पदाधिकारी व सदस्य केवळ समारंभात सत्काराचे कारभारी ठरले आहेत. शासनाने घटना दुरुस्तीप्रमाणे घेतलेल्या निर्णयाबाबत पंचायत राज व्यवस्थेचे अभ्यासक अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न : पंचायत समित्यांचा शासनाकडून अधिकार संकोच होत आहे हे खरे आहे का? यात कितपत तथ्य आहे?उत्तर : आता पंचायत राज व्यवस्थेने केवळ जिल्हा परिषद व ग्रामपंचायत या दोन्हीलाच अधिकार देऊन व्दिस्तरीय व्यवस्था अस्तित्वात आणण्याची शिफारस केली आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद ते थेट ग्रामपंचायत असा निधी येऊ लागला आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे पंचायत समित्यांचा अधिकार संकोच होण्यात कोणतेही तथ्य नाही.

प्रश्न : पंचायत राज व्यवस्था कालबाह्य झाली आहे का?उत्तर : पूर्वीच्या काळात दळणवळण व्यवस्था नसल्याने विविध प्रकारे आलेल्या शिफारशींनुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय व्यवस्था अस्तित्वात आणली गेली. आज जनता ग्रामपंचायत ते थेट जिल्हा परिषदेशी संपर्क साधू शकते. त्यामुळे पंचायत समित्यांची गरज राहिली नाही. हे राज्यकर्त्यांना माहिती आहे. परंतु, ‘पोपट मेला’ असे कोणी म्हणायचे? कार्यकर्त्यांना नाराज करण्यापेक्षा अधिकार नसलेले का होईना पण पं.स.चे सदस्यपद दिल्याने कार्यकर्तेही खूष राहतात. आज तालुका पंचायत समित्यांचे अस्तित्व संपविले तरी काहीही अडचण येणार नाही.शासन व्यवस्था सुधारण्यासाठी काय केले पाहिजेजिल्हा नियोजन समितीचे बळकटीकरण करावे, घटना दुरुस्तीप्रमाणे या समितीला शासनाने अधिकार देऊन पारदर्शक काम केले पाहिजे. तसेच या समितीच्या कामात खासदार, आमदार, तसेच अन्य राजकारण्यांचा होणारा हस्तक्षेप पूर्णपणे बंद झाला पाहिजे.थेट लाभार्थी यातील दुवे ?शासन ते लाभार्थी यात प्रस्ताव तयार करून ते तपासण्यासाठी जिल्हा नियोजन समिती पाहिजे. कृषी विभागाचे प्रस्ताव कृषी विभाग स्वीकारते आहे, त्याप्रमाणे जिल्हा परिषदेला घटना दुरुस्तीमुळे मिळालेले सर्व ते अधिकार देऊन जिल्हा नियोजन समिती सक्षम केली पाहिजे. त्यामुळे जनतेची थेट कामे होण्यास मदत होईल.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत