शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

अखेर त्या तरुणाची मृत्युशी झुंज ठरली अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 10:36 IST

Accident Death Sangli Shirala- अपघात होऊन सात दिवस ओघळात अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलणाऱ्या रूपेशची मृत्युशी झुंज अखेर मंगळवारी अकराव्या दिवशी अपयशी ठरली. त्याच्या जगण्यासाठी झटणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांचा क्षणार्धात चुराडा झाला.

ठळक मुद्देअखेर त्या तरुणाची मृत्युशी झुंज ठरली अपयशीत्याच्या जगण्यासाठी झटणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांचा चुराडा

विकास शहाशिराळा-अपघात होऊन सात दिवस ओघळात अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलणाऱ्या रूपेशची मृत्युशी झुंज अखेर मंगळवारी अकराव्या दिवशी अपयशी ठरली. त्याच्या जगण्यासाठी झटणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांचा क्षणार्धात चुराडा झाला.रूपेश विष्णू कदम ( वय 2६ ) अमेणी पैकी खोंगेवाडी ( ता. शाहूवाडी ) येथील तरुण. तो ३० जानेवारी २०२१ रोजी कोकरूड येथे आला होता. त्याने आपल्या मामा सोबत बाहेर हॉटेलमध्ये जेवण केले. रात्री घरी गेला नाही. तो दुसऱ्या दिवशी ही घरी न आल्याने व त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी मामाकडे चौकशी केली असता तो त्याच रात्री परत घरी आल्याचे त्यांनी सांगितले. सर्वत्र शोध घेतला पण तो सापडला नसल्याने त्याच्या वडिलांनी तो कोकरूड येथून मोटरसायकलसह बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.१ फेब्रुवारीला कोकरुड पोलीस ठाण्यात दिली होती. शनिवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी तुरुकवाडी ( ता.शाहूवाडी) येथील सुभाष पाटील व विलास पाटील हे कालव्याचे पाणी शेतीला पाजण्यासाठी गेले होते. पण शेतात पाणी येत नसल्याने पाण्याच्या मार्गात कुठे अडथळा निर्माण झाला आहे का हे पाहण्यासाठी फिरत होते. ते पाहत असताना त्यांना शाहीरवाडी येथील सनंदा शेताजवळ कोकरुड - ते तुरुकवाडी दरम्यानच्या मख्य रस्त्या लागत असणाऱ्या दहा फूट ओघळात विव्हळत व अर्धवट बेशुद्ध अवस्थेत तरुण आढळून आला. त्यांच्या अंगा खालून पाणी जात होते.

पाण्याचा प्रवाह कमी असल्याने तो वाचला होता . सोबत मोटरसायकल होती. दरम्यान तरुण बेपत्ता असल्याची माहिती माध्यमाद्वारे सर्वत्र फ़िरत होती.त्यावरून तो रूपेश असल्याची खात्री पटली. त्यानंतर डॉ. नामदेव पाटील, युवराज पाटील , एकनाथ पाटील व ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेतुन त्यास भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले . तिथून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले होते.त्याच्यावर तीन दिवस उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . त्याच्या पश्चात आई , वडील , भाऊ , भावजय , पुतण्या , दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे . त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगलीshirala-acशिराळा