शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

अखेर त्या तरुणाची मृत्युशी झुंज ठरली अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 10:36 IST

Accident Death Sangli Shirala- अपघात होऊन सात दिवस ओघळात अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलणाऱ्या रूपेशची मृत्युशी झुंज अखेर मंगळवारी अकराव्या दिवशी अपयशी ठरली. त्याच्या जगण्यासाठी झटणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांचा क्षणार्धात चुराडा झाला.

ठळक मुद्देअखेर त्या तरुणाची मृत्युशी झुंज ठरली अपयशीत्याच्या जगण्यासाठी झटणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांचा चुराडा

विकास शहाशिराळा-अपघात होऊन सात दिवस ओघळात अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलणाऱ्या रूपेशची मृत्युशी झुंज अखेर मंगळवारी अकराव्या दिवशी अपयशी ठरली. त्याच्या जगण्यासाठी झटणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांचा क्षणार्धात चुराडा झाला.रूपेश विष्णू कदम ( वय 2६ ) अमेणी पैकी खोंगेवाडी ( ता. शाहूवाडी ) येथील तरुण. तो ३० जानेवारी २०२१ रोजी कोकरूड येथे आला होता. त्याने आपल्या मामा सोबत बाहेर हॉटेलमध्ये जेवण केले. रात्री घरी गेला नाही. तो दुसऱ्या दिवशी ही घरी न आल्याने व त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी मामाकडे चौकशी केली असता तो त्याच रात्री परत घरी आल्याचे त्यांनी सांगितले. सर्वत्र शोध घेतला पण तो सापडला नसल्याने त्याच्या वडिलांनी तो कोकरूड येथून मोटरसायकलसह बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.१ फेब्रुवारीला कोकरुड पोलीस ठाण्यात दिली होती. शनिवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी तुरुकवाडी ( ता.शाहूवाडी) येथील सुभाष पाटील व विलास पाटील हे कालव्याचे पाणी शेतीला पाजण्यासाठी गेले होते. पण शेतात पाणी येत नसल्याने पाण्याच्या मार्गात कुठे अडथळा निर्माण झाला आहे का हे पाहण्यासाठी फिरत होते. ते पाहत असताना त्यांना शाहीरवाडी येथील सनंदा शेताजवळ कोकरुड - ते तुरुकवाडी दरम्यानच्या मख्य रस्त्या लागत असणाऱ्या दहा फूट ओघळात विव्हळत व अर्धवट बेशुद्ध अवस्थेत तरुण आढळून आला. त्यांच्या अंगा खालून पाणी जात होते.

पाण्याचा प्रवाह कमी असल्याने तो वाचला होता . सोबत मोटरसायकल होती. दरम्यान तरुण बेपत्ता असल्याची माहिती माध्यमाद्वारे सर्वत्र फ़िरत होती.त्यावरून तो रूपेश असल्याची खात्री पटली. त्यानंतर डॉ. नामदेव पाटील, युवराज पाटील , एकनाथ पाटील व ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेतुन त्यास भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले . तिथून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले होते.त्याच्यावर तीन दिवस उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . त्याच्या पश्चात आई , वडील , भाऊ , भावजय , पुतण्या , दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे . त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगलीshirala-acशिराळा