शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

सत्ताधारी भाजपही मिरज पॅटर्नच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 11:02 IST

या मिरज पॅटर्नने काँग्रेसला पुरते बदनाम केले होते. हा डाग अजूनही काँग्रेसच्या माथी आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर येथील कारभाराला शिस्त लागेल, अशी सर्वसामान्य जनतेची आशा होती; पण आता वर्षभराच्या कारभारानंतर भाजपही मिरज पॅटर्नह्णच्या वाटेवरूनच गाडा हाकणार असल्याचे दिसू लागले आहे.

ठळक मुद्देयापूर्वीच्या सत्ताकाळातही महासभेचे इतिवृत्त अपूर्ण ठेवले जायचे. काही विषय नंतर घुसडले जायचे. त्यातून पदाधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध जपण्याचे प्रकार घडले होते.

शीतल पाटील ।सांगली : महापालिकेच्या स्थापनेपासून सातत्याने ह्यमिरज पॅटर्नह्णच्या कारभाराची चर्चा होत होती. विशेषत: या पॅटर्नमुळे महापालिका क्षेत्रात काँग्रेस पुरती बदनाम झाली होती. भाजपची सत्ता आल्यानंतर हा पॅटर्न इतिहासजमा होईल, असे बोलले जात होते; पण अखेर भाजपचे सत्ताधारीही ह्यमिरज पॅटर्नह्णच्या वळचणीला गेल्याचे महासभेच्या कामकाजावरून स्पष्ट झाले.

विधानसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी बुधवारी महापालिकेची सभा होती. सभेच्या विषयपत्रिकेवर फार महत्त्वाचे विषय नव्हते. मिरजेतील आण्णाबुवा शॉपिंग सेंटरच्या गाळेधारकांना वाढीव जागा देण्याचा विषय चर्चेत होता. त्यामुळे शहरातील इतर प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी नगरसेवकांना होती. विशेषत: महापालिका क्षेत्रात डेंग्यूची मोठी साथ पसरली आहे. प्रत्येक गल्लीबोळात आठ-दहा डेंग्यूचे रुग्ण आहेत. साथीचा फैलाव वेगाने होत असताना त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने काय उपाययोजना केल्या, त्यात आणखी काय सुधारणा करता येतील, या विषयावर बोलण्यासारखे बरेच काही होते.

लोकांशी निगडीत हा महत्त्वाचा प्रश्न होता. मिरजेतील शिवाजी रोडवर मोठे खड्डे पडले आहेत. गेल्या आठवड्यात खड्ड्यामुळे दोघांचा बळी गेला होता. ड्रेनेज व इतर योजनांची स्थिती काय आहे, अशा विविध विषयांवर नगरसेवकांकडून चर्चा अपेक्षित होती. पण ही अपेक्षा फोल ठरली. अर्धा तासातच प्रचंड गोंधळात सभा गुंडाळण्यात आली. त्यासाठी मागील सभेचे इतिवृत्त अपूर्ण असल्याचे कारण ठरले. वास्तविक दोन महिन्यांचा कालावधी असताना इतिवृत्त का पूर्ण करण्यात आले नाही, हा खरा प्रश्न आहे.

यापूर्वीच्या सत्ताकाळातही महासभेचे इतिवृत्त अपूर्ण ठेवले जायचे. काही विषय नंतर घुसडले जायचे. त्यातून पदाधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध जपण्याचे प्रकार घडले होते. मध्यंतरी सभा गुंडाळण्याचा मिरज पॅटर्न महापालिकेत गाजला होता. आर्थिक फायद्याचा विषय असेल तर, किरकोळ विषयावरून सभेत गोंधळ घालण्यास भाग पाडले जायचे. त्या गोंधळातच सर्व विषय मंजूर म्हणत सभागृह सोडायचे, असा नवा पायंडा पडला होता. काही सभा तर सुरू होण्यापूर्वीच संपल्या होत्या. पाच ते दहा मिनिटात सभा संपविण्याचा विक्रमही तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केला होता. विविध पदांवर मिरजेच्या नगरसेवकांचे वर्चस्व असले की असे प्रकार घडत होते.

या मिरज पॅटर्नने काँग्रेसला पुरते बदनाम केले होते. हा डाग अजूनही काँग्रेसच्या माथी आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर येथील कारभाराला शिस्त लागेल, अशी सर्वसामान्य जनतेची आशा होती; पण आता वर्षभराच्या कारभारानंतर भाजपही मिरज पॅटर्नह्णच्या वाटेवरूनच गाडा हाकणार असल्याचे दिसू लागले आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत त्याची प्रचिती आली. एकूण कारभाराचे निरीक्षण केले तर त्यांची दिशा ही ह्यमिरज पॅटनह्णकडे जाताना दिसून येते. त्यामुळे जुन्या आणि नव्या सत्ताधाºयांमधील फरकाची रेषा आता पुसट होत असल्याचे नागरिकांना जाणवत आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण