शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘महांकाली साखर कारखाना’ फुकट दिला तरी ‘राजारामबापू’ने घेऊ नये - संजय कोले 

By अशोक डोंबाळे | Updated: October 19, 2023 13:49 IST

सभासदांच्या शेअर्सची रक्कम १५ हजार रुपये करू नये

सांगली : महांकाली सहकारी साखर कारखाना चुकीच्या ठिकाणी उभा केला आहे. तसेच व्यवस्थापनाच्या चुकीमुळे कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचा कर्जाचा बोजा वाढला आहे. कर्जात बुडालेला महांकाली कारखाना फुकट चालविण्यास दिला तरी राजारामबापू साखर कारखान्याने घेऊ नये, असा सल्ला शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी दिला. तसेच कारखान्याने सभासदांच्या शेअर्सची किंमत वाढवून ती १५ हजार रुपये करू नये, असेही त्यांनी सांगितले.राजारामबापू कारखान्याच्या वार्षिक सभेत महांकाली कारखाना चालविण्यास घेण्यासह शेअर्सची किंमत १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर संजय कोले बोलत होते. ते म्हणाले, मुळात माणगंगा- आटपाडी, डफळे-जत, यशवंत-नागेवाडी, महांकाली हे साखर कारखाने चुकीच्या ठिकाणी उभारले आहेत. जिथे कच्चा माल म्हणजे ऊस पिकण्याची व मिळण्याची शाश्वती नाही. लाखो वर्षे जिथे दुष्काळी परिस्थिती आहे, ज्या भागातील बहुतांश लोक जगण्यासाठी शहर, बागायती पट्ट्यात अथवा सैन्यात गेले आहेत. तत्कालीन पुढाऱ्यांनी राजकारणासाठी चुकीच्या ठिकाणी कारखाने उभारले आहेत. त्यात सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, कर्ज पुरवठादार बँका व सरकारचे पैसे बुडाले आहेत. कामगारही देशोधडीला लागले आहेत. अशाच ठिकाणचा महांकाली कारखाना राजारामबापू कारखान्याने फुकट चालवायला दिला तरी तो व्यवस्थापनाने घेऊ नये. कारण, डफळे कारखाना चालवायला घेऊन राजारामबापू कारखान्यास किती तोटा झाला याचा व्यवस्थापनाने अनुभव घेतला आहे. हा अनुभव पाठीशी असताना महांकाली चालविण्यास घेणे, म्हणजे राजारामबापू कारखाना आर्थिक संकटात टाकणारा निर्णय आहे. तसेच तुम्ही कितीही कारखाने चालविण्यास घ्या, पण शेअर्सची किंमत १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे. तसेच शेअर्सची किंमत वाढवायची असेल तर शेअर्सची वाढीव रक्कम कारखान्याने भरली पाहिजे.

संपत्ती वाढविण्यावर भरएफआरपी देणे शक्य नाही तर राजारामबापू कारखाना ‘महांकाली’ हे पाचवे युनिट कशासाठी घेत आहेत. उसाला तीन हजार ५०० रुपये दर शेतकऱ्यांना न देता कारखाना व्यवस्थापन संपत्ती वाढवण्याकडे लक्ष देत आहे. राजारामबापू कारखान्यास सर्वाधिक साखर उताऱ्याचा ऊस पुरवठा होत आहे. टनाला १० ते १२ किलो साखर उतारा जास्त आहे. तरीही कारखाना एफआरपीपेक्षा जास्त दर देत नाही हे पूर्णत: चुकीचे आहे, याबद्दल कोले यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने