शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

वीस वर्षांपासून लढा तरीही सांगली, आष्टा, संखला तालुक्यांचा दर्जा नाही; राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष  

By अशोक डोंबाळे | Updated: April 25, 2024 17:16 IST

प्रत्येक निवडणुकीत मुद्दा; पण, पुढे काहीच हालचाली नाहीत

अशोक डोंबाळेसांगली : लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये संख, आष्टा आणि सांगली स्वतंत्र तालुक्यांचा मुद्दा चर्चेत असतो. पण, निवडणुका संपल्यानंतर पाच वर्षात खासदार, आमदारांकडून काहीच हालचाली होत नाहीत. नागरिकांच्या प्रश्नांकडे राज्यकर्ते दुर्लक्ष का करत आहेत, असा प्रश्न मतदारांमध्ये चर्चेत आला आहे. गेल्या वीस वर्षांपासून स्वतंत्र तालुक्यासाठी स्थानिक नागरिक लढा देत असूनही तालुक्यांचा दर्जा काही मिळाला नाही.मिरज, वाळवा, जत तालुक्यांचे विभाजन करून सांगली, संख, आष्टा तालुक्यांची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. लोकांची प्रशासकीय गैरसोय टाळण्यासाठी तेथे तूर्त अपर तहसील कार्यालये सुरू करून शासनाने मध्यम मार्ग काढला होता. नव्या तालुक्यांचा निर्णय मात्र प्रत्यक्षात आला नाही. मिरज पश्चिम भागातील लोकांना विविध कामांसाठी मिरज येथे हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे त्यांना गैरसोय सहन करावी लागत आहे. लोकसंख्या, क्षेत्रफळ यांचा विचार करता सांगली स्वतंत्र तालुका होणे गरजेचे आहे.महायुती सरकारच्या काळात आमदार सुधीर गाडगीळ यांनी स्वतंत्र सांगली तालुक्याचा नव्याने प्रस्ताव दिला. त्याचा पाठपुरावा केला. गेल्या वीस वर्षांत स्वतंत्र तालुक्यांची नागरिकांची मागणी असूनही निर्मिती केली गेली नाही. त्याऐवजी अपर तहसील कार्यालय सुरू करून महसूल विभागाचा कारभार चालवला जातो.वाळवा तालुका लोकसंख्येच्या तुलनेत मोठा आहे. वाळवा तालुक्यातून आष्टा स्वतंत्र तालुक्यांची मागणी असूनही याकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी फारसे लक्ष दिले नाही. यामुळे आष्टा परिसरातील नागरिकांना इस्लामपूरला कामकाजासाठी जावे लागत आहे.जत तालुका लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही खूप मोठा आहे. जत पूर्व भागातील लोकांची गैरसोय होत असल्यामुळे संख आणि उमदी येथे स्वतंत्र तालुक्यांची मागणी होती. प्रशासनाने मध्यम मार्ग काढत संखला अपर तहसील मंजूर आहे. पण, स्वतंत्र तालुक्याचा प्रश्न आजही प्रलंबितच आहे. नागरिकांची मागणी असूनही त्याकडे खासदार, आमदारांनी का दुर्लक्ष केले, असाही प्रश्न सद्या मतदार उपस्थित करत आहेत.

कर्मचाऱ्यांची संख्या अपूर्णसांगली अपर तहसीलमध्ये मिरज तालुक्यातील सांगली, अंकली, इनामधामणी, सांगलीवाडी, हरिपूर, कर्नाळ, पद्माळे, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, तुंग, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, कवठेपिरान, मोळा कुंभोज, शेरीकवठे, बुधगाव, कुपवाड, वॉन्लेसवाडी, बामणोली, बिसूर, नांद्रे, वाजेगाव, कावजी खोतवाडी आणि माधवनगर या ३१ गावांचा समावेश आहे. अपर तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपिक, टंकलेखक चार अशी पदे देण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कारभार ठप्प झाला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४