शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

सांगलीच्या पूरपट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर सुरु, आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ३० फुटांवर 

By अविनाश कोळी | Updated: July 24, 2024 15:46 IST

पुनर्वसन केंद्रांची सज्ज्जता

सांगली : आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ३० फुटांवर गेल्यानंतर सांगलीच्या सूर्यवंशी प्लाॅटमध्ये पुराचे पाणी दाखल झाले. याठिकाणच्या १० कुटुंबांचे बुधवारी स्थलांतर करण्यात आले. पाणीपातळीत वाढ झाली तर परिसरातील आणखी काही कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.सांगलीच्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये मध्यरात्री पाणी दाखल झाले. येथील आठ घरांना पाण्याने वेढले. त्यामुळे महापालिकेच्या सुचनेनुसार काही कुटुंबांनी नातेवाईकांकडे तर काहींनी महापालिकेच्या पुनर्वसन केंद्रात स्थलांतर केले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने सूर्यवंशी प्लॉटमधील सर्व नागरिकांसह इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, शिवमंदिर परिसर, मगरमच्छ कॉलनीतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. घरातील साहित्य सूरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे.

पूरपट्ट्यात स्थलांतराची लगबगसांगलीच्या पूरपट्ट्यातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रस्त्यावरील काही नागरिकांनी साहित्य हलविण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळपासून या भागात स्थलांतरासाठीची पूर्वतयारी सुरु होती.

आयुक्तांकडून मिरजेत पाहणीमहापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी बुधवारी मिरजेच्या कृष्णा घाट परिसरास भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. कृष्णा नदी क्षेत्रात आणि कोयना धरण क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढला असून नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठाच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

मिरजेची पाणीपातळी ४३ फुटांवरमिरजेत दुपारी दोन वाजता कृष्णेची पाणीपातळी ४३.१ फूट होती. ४५ फूट ही इशारा पातळी आहे. कृष्णा घाट परिसरात नागरिकांनी आपली जनावरे आणि अत्यावश्यक साहित्यासह स्थलांतर व्हावे. प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल. मिरज हायस्कूल येथे निवारा केंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त सजीव ओहोळ, सहायक आयुक्त अनिस मुल्ला, अग्निशमन अधिकारी सुनील माळी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसfloodपूर