शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

सांगलीच्या विकासासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करा : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 1:55 PM

सांगली जिल्ह्याचा सर्व क्षेत्रात विकास व्हावा, यासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करावी. यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह लोकांचा सहभाग असावा, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देप्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमाचा घेतला आढावा 2018-19 : पर्यटनस्थळ विकासासाठी 3 कोटी 35 लाख रुपयांची तरतूद

सांगली : सांगली जिल्ह्याचा सर्व क्षेत्रात विकास व्हावा, यासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करावी. यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह लोकांचा सहभाग असावा. या माध्यमातून पर्यटन, धार्मिक स्थळांचा विकास, हळद, बेदाणा, कला, क्रीडा, साहित्य अशा अनेक क्षेत्रांचे ब्रँडिंग होईल. तसेच रोजगार निर्मितीही होईल. शासनाला लोकसहभागाची साथ मिळेल. गावांचे आर्थिक, सामाजिक परिवर्तन होईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित प्रादेशिक पर्यटन विकास आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश खाडे, आमदार मोहनराव कदम, आमदार विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे यांच्यासह अन्य संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सांगली जिल्ह्यात क वर्ग मान्यताप्राप्त 50 पर्यटनस्थळे आहेत. सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 8 वन पर्यटन स्थळांना 1 कोटी 10 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. तसेच वन पर्यटन वगळून इतर पर्यटन स्थळांसाठी 2 कोटी 25 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. ही कामे दर्जेदार करावीत. तसेच, पर्यटनस्थळांच्या परिसरात पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, चांदोली राष्ट्रीय उद्यान हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांची मुंबईमध्ये लवकरच बैठक आयोजित केली जाईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग आणि अन्य संबंधित यंत्रणांचा समन्वय साधून, तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील.

चांदोली येथे पर्यटकांसाठी चांगली निवास व्यवस्था, बोटींग सुविधा, अंतर्गत रस्ते, सर्प उद्यान, मत्स्यालय होण्यासाठी प्रयत्न करू. तसेच, औदुंबर येथे कृष्णा नदीत मगरीच्या वावराच्या पार्श्वभूमिवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती यंत्रणा करावी किंवा कुंपण घालण्याची कार्यवाही आगामी दोन ते तीन महिन्यात पूर्ण करावी. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी वॉटर ए. टी. एम. बसवताना प्रमाणित निकष करून घेऊन, पिण्याचे शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध करून द्या. तसेच, पेड प्रादेशिक पर्यटन केंद्र ठिकाणी रस्ते बांधकाम करा, अशा सूचना त्यांनी केल्या.यावेळी उपस्थित सर्वच लोकप्रतिनिधींनी मौलिक सूचना केल्या. यावेळी वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी