शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

सांगलीच्या विकासासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करा : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 13:56 IST

सांगली जिल्ह्याचा सर्व क्षेत्रात विकास व्हावा, यासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करावी. यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह लोकांचा सहभाग असावा, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देप्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमाचा घेतला आढावा 2018-19 : पर्यटनस्थळ विकासासाठी 3 कोटी 35 लाख रुपयांची तरतूद

सांगली : सांगली जिल्ह्याचा सर्व क्षेत्रात विकास व्हावा, यासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करावी. यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह लोकांचा सहभाग असावा. या माध्यमातून पर्यटन, धार्मिक स्थळांचा विकास, हळद, बेदाणा, कला, क्रीडा, साहित्य अशा अनेक क्षेत्रांचे ब्रँडिंग होईल. तसेच रोजगार निर्मितीही होईल. शासनाला लोकसहभागाची साथ मिळेल. गावांचे आर्थिक, सामाजिक परिवर्तन होईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित प्रादेशिक पर्यटन विकास आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश खाडे, आमदार मोहनराव कदम, आमदार विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे यांच्यासह अन्य संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सांगली जिल्ह्यात क वर्ग मान्यताप्राप्त 50 पर्यटनस्थळे आहेत. सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 8 वन पर्यटन स्थळांना 1 कोटी 10 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. तसेच वन पर्यटन वगळून इतर पर्यटन स्थळांसाठी 2 कोटी 25 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. ही कामे दर्जेदार करावीत. तसेच, पर्यटनस्थळांच्या परिसरात पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, चांदोली राष्ट्रीय उद्यान हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांची मुंबईमध्ये लवकरच बैठक आयोजित केली जाईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग आणि अन्य संबंधित यंत्रणांचा समन्वय साधून, तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील.

चांदोली येथे पर्यटकांसाठी चांगली निवास व्यवस्था, बोटींग सुविधा, अंतर्गत रस्ते, सर्प उद्यान, मत्स्यालय होण्यासाठी प्रयत्न करू. तसेच, औदुंबर येथे कृष्णा नदीत मगरीच्या वावराच्या पार्श्वभूमिवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती यंत्रणा करावी किंवा कुंपण घालण्याची कार्यवाही आगामी दोन ते तीन महिन्यात पूर्ण करावी. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी वॉटर ए. टी. एम. बसवताना प्रमाणित निकष करून घेऊन, पिण्याचे शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध करून द्या. तसेच, पेड प्रादेशिक पर्यटन केंद्र ठिकाणी रस्ते बांधकाम करा, अशा सूचना त्यांनी केल्या.यावेळी उपस्थित सर्वच लोकप्रतिनिधींनी मौलिक सूचना केल्या. यावेळी वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी