शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून तलाठ्याची सांगलीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:32 IST

एरंडोली (ता. मिरज) येथील तलाठी केंदार रवींद्र जोशी (वय ३२, रा. विद्यानगर गल्ली क्रमांक ६, वारणाली, विश्रामबाग, सांगली) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. वारणालीत त्यांच्या घरी रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देएरंडोलीच्या तलाठ्याची गळफासाने आत्महत्यासांगलीत घटना : नैराश्येतून केले कृत्य

सांगली : एरंडोली (ता. मिरज) येथील तलाठी केंदार रवींद्र जोशी (वय ३२, रा. विद्यानगर गल्ली क्रमांक ६, वारणाली, विश्रामबाग, सांगली) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. वारणालीत त्यांच्या घरी रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.जोशी यांनी सांगलीत तलाठी कार्यालयात सेवा बजावली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातही त्यांनी काम केले होते. चार महिन्यापूर्वी त्यांची एरंडोली येथे बदली झाली होती. आईसोबत ते वारणालीत राहत होते. शनिवारी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले होते.

सायंकाळी घरी परत आले. त्यानंतर कामानिमित्त ते बाहेर गेले. रात्री पुन्हा घरी आले. जेवण करून घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपण्यास गेले. सकाळी त्यांची आई फिरायला गेली होती. त्या आठ वाजता घरी परत परतल्या.

मुलगा झोपेतून अजून का उठला नाही, हे पाहण्यासाठी त्या दुसऱ्या मजल्यावर गेल्या. त्यावेळी जोशी गळफासाने लटकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर संजयनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. जोशी यांनी मध्यरात्री छताच्या हुकाला दोरीने गळफास घेतला असण्याची शक्यता आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.आधार हरपलाजोशी यांच्या वडिलांचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर आता मुलाने आत्महत्या केल्याने त्यांच्या आईचा आधारच हरपला आहे. जोशी यांचे लग्न ठरत नव्हते. ते ठरविण्यासाठी त्यांची खटपट सुरू होती. यातून ते नाराज होते. कदाचित आत्महत्या करण्यामागे हेच कारण असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली