शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून तलाठ्याची सांगलीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:32 IST

एरंडोली (ता. मिरज) येथील तलाठी केंदार रवींद्र जोशी (वय ३२, रा. विद्यानगर गल्ली क्रमांक ६, वारणाली, विश्रामबाग, सांगली) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. वारणालीत त्यांच्या घरी रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देएरंडोलीच्या तलाठ्याची गळफासाने आत्महत्यासांगलीत घटना : नैराश्येतून केले कृत्य

सांगली : एरंडोली (ता. मिरज) येथील तलाठी केंदार रवींद्र जोशी (वय ३२, रा. विद्यानगर गल्ली क्रमांक ६, वारणाली, विश्रामबाग, सांगली) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. वारणालीत त्यांच्या घरी रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.जोशी यांनी सांगलीत तलाठी कार्यालयात सेवा बजावली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातही त्यांनी काम केले होते. चार महिन्यापूर्वी त्यांची एरंडोली येथे बदली झाली होती. आईसोबत ते वारणालीत राहत होते. शनिवारी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले होते.

सायंकाळी घरी परत आले. त्यानंतर कामानिमित्त ते बाहेर गेले. रात्री पुन्हा घरी आले. जेवण करून घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपण्यास गेले. सकाळी त्यांची आई फिरायला गेली होती. त्या आठ वाजता घरी परत परतल्या.

मुलगा झोपेतून अजून का उठला नाही, हे पाहण्यासाठी त्या दुसऱ्या मजल्यावर गेल्या. त्यावेळी जोशी गळफासाने लटकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर संजयनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. जोशी यांनी मध्यरात्री छताच्या हुकाला दोरीने गळफास घेतला असण्याची शक्यता आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.आधार हरपलाजोशी यांच्या वडिलांचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर आता मुलाने आत्महत्या केल्याने त्यांच्या आईचा आधारच हरपला आहे. जोशी यांचे लग्न ठरत नव्हते. ते ठरविण्यासाठी त्यांची खटपट सुरू होती. यातून ते नाराज होते. कदाचित आत्महत्या करण्यामागे हेच कारण असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली