शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

बेदाणा वॉशिंगमुळे पर्यावरण धोक्यात

By admin | Updated: September 11, 2015 23:14 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्यात रसायनमिश्रित घटक; पाण्याचे स्रोत प्रदूषित

 प्रदीप पोतदार -कवठेएकंद ते तासगाव मुख्य मार्गावरील बेदाणा वॉशिंगमधील टाकाऊ सांडपाणी, रासायनिक घटकांमुळे येथील पर्यावरण धोकादायक बनले आहे. बेदाणा वॉशिंग उद्योगामधील रसायनमिश्रित पाणी जमिनीत मुरवले गेल्याने परिसरातील पाण्याचे स्रोत आणि शेतजमिनीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेती आणि पाण्याबरोबरच पशु, पक्षी, प्राण्यांचाही वावर या परिसरात कमी झाला आहे.बेदाण्याला चमकवण्याच्या या व्यवसायामुळे परिसरातील शेतकऱ्यांसमोर काजवे चमकू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी करुनसुद्धा बड्या उद्योजकांकडून मनमानी सुरू आहे. एकीकडे द्राक्ष उत्पादनाची आणि बेदाणा बाजारपेठेची देशभरात तासगावची ख्याती असली तरी, पर्यावरण संवर्धनाबाबत मात्र उदासीनताच दिसून येत आहे. कवठेएकंद-तासगाव मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक बेदाणा वॉशिंगचे लहान-मोठे प्रकल्प आहेत. यामध्ये प्रामुख्याने बेदाण्याला चमकवण्यासाठी तो वॉशिंग केला जातो. यासाठी अनेक रासायनिक घटकांचा वापर केला जातो. त्या वापरानंतर वॉशिंग उद्योगातून रसायनयुक्त पाणी बाहेर सोडले जाते किंवा प्रकल्पाच्या आतच खुल्या जागेत मुरवले जाते. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात असे पाणी ओढ्या, नाल्यात सोडल्यामुळे परिसरातील पाण्यावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. बेदाणा उद्योगातील सांडपाण्यासह रासायनिक घटकांची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावली जात नाही. या उद्योगातील गंधकासारखे घटक, रासायनिकचे जळके पदार्थ स्त्याकडेला, नदी, नाल्यात टाकून दिले जातात. याचा विपरित परिणाम होऊन पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील पाण्याच्या स्रोतांमधून हे रसायनमिश्रित पाणी मिसळल्यामुळे ते विषारी बनले आहे. याबाबत तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.बेदाणा वॉशिंगमुळे पर्यावरण धोक्यातप्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्यात रसायनमिश्रित घटक; पाण्याचे स्रोत प्रदूषित प्रदीप पोतदार ल्ल कवठेएकंदकवठेएकंद ते तासगाव मुख्य मार्गावरील बेदाणा वॉशिंगमधील टाकाऊ सांडपाणी, रासायनिक घटकांमुळे येथील पर्यावरण धोकादायक बनले आहे. बेदाणा वॉशिंग उद्योगामधील रसायनमिश्रित पाणी जमिनीत मुरवले गेल्याने परिसरातील पाण्याचे स्रोत आणि शेतजमिनीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेती आणि पाण्याबरोबरच पशु, पक्षी, प्राण्यांचाही वावर या परिसरात कमी झाला आहे.बेदाण्याला चमकवण्याच्या या व्यवसायामुळे परिसरातील शेतकऱ्यांसमोर काजवे चमकू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी करुनसुद्धा बड्या उद्योजकांकडून मनमानी सुरू आहे. एकीकडे द्राक्ष उत्पादनाची आणि बेदाणा बाजारपेठेची देशभरात तासगावची ख्याती असली तरी, पर्यावरण संवर्धनाबाबत मात्र उदासीनताच दिसून येत आहे. कवठेएकंद-तासगाव मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक बेदाणा वॉशिंगचे लहान-मोठे प्रकल्प आहेत. यामध्ये प्रामुख्याने बेदाण्याला चमकवण्यासाठी तो वॉशिंग केला जातो. यासाठी अनेक रासायनिक घटकांचा वापर केला जातो. त्या वापरानंतर वॉशिंग उद्योगातून रसायनयुक्त पाणी बाहेर सोडले जाते किंवा प्रकल्पाच्या आतच खुल्या जागेत मुरवले जाते. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात असे पाणी ओढ्या, नाल्यात सोडल्यामुळे परिसरातील पाण्यावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. बेदाणा उद्योगातील सांडपाण्यासह रासायनिक घटकांची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावली जात नाही. या उद्योगातील गंधकासारखे घटक, रासायनिकचे जळके पदार्थ स्त्याकडेला, नदी, नाल्यात टाकून दिले जातात. याचा विपरित परिणाम होऊन पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील पाण्याच्या स्रोतांमधून हे रसायनमिश्रित पाणी मिसळल्यामुळे ते विषारी बनले आहे. याबाबत तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.तासगाव-कवठेएकंद मार्गावर तालुक्याचे कृषी कार्यालय आहे. अवघ्या हाकेच्या अंतरापासून अशा उद्योगांचे सर्व उद्योग सुरु असतात. मात्र कृषी कार्यालयाकडून याबाबतची साधी तक्रारसुद्धा केली गेली नाही. अवघ्या पन्नास मीटर अंतरावर असणाऱ्या ओढ्याच्या पाण्यात वॉशिंग उद्योगातील जळके गंधक गाड्या भरून ओतले जाते. पण याकडे कोणाचेच लक्ष नसणे किंवा कृषी खात्याच्या नजरेत ही बाब न येणे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. परिसरातील रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्या प्रकल्पांचा प्रश्न दरवर्षीच ऐरणीवर येतो. प्रदूषणाचे गंभीर परिणाम नव्याने मांडण्याची गरज नाही. पण अशा रसायनमिश्रित दूषित पाण्यामुळे जनावरांचे आणि पशु-पक्ष्यांचे जीवनही धोक्यात येत आहे. अनेक वर्षांची साक्ष देणारी झाडे प्रदूषणामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. हे सारे अक्षरश: डोळ्यासमोर घडत असताना कृषी विभाग नेमके काय करत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.