शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रबोधन, मॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅलीसह इतर उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:16 IST

निवडणुकांमध्ये घसरत चाललेला मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने स्पीप कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाढलेली टक्केवारी लक्षात घेता, हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. या निवडणुकीत किमान ७५ टक्क्यांपर्यंत मतदान जाण्यासाठी प्रशासनाने प्रबोधनाची तयारी केली आहे. मॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅलीसह इतर मतदारांना प्रभावित करणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रबोधनमॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅलीसह मतदारांना प्रभावित करणारे उपक्रम

सांगली : निवडणुकांमध्ये घसरत चाललेला मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने स्पीप कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाढलेली टक्केवारी लक्षात घेता, हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. या निवडणुकीत किमान ७५ टक्क्यांपर्यंत मतदान जाण्यासाठी प्रशासनाने प्रबोधनाची तयारी केली आहे. मॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅलीसह इतर मतदारांना प्रभावित करणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत.मतदानाचा दिवस म्हणजे सुटी हा समज अनेकांमध्ये असतो. यावर पर्याय म्हणून निवडणूक आयोगाने मतदान रविवारी न घेता अन्य दिवशी घेण्यास सुरुवात केली. तरीही अनेकवेळा घसरत चाललेला मतदानाचा टक्का चिंतेचा विषय ठरला होता. मात्र, थेट मतदारांपर्यंत पोहोचत लोकशाही बळकटीकरणात एक मत किती महत्त्वाचे आहे, हे सांगण्यासाठी स्वीप (सिस्टीमॅटिक व्होटर एनरोल्मेंट अ‍ॅण्ड एज्युकेशन प्रोग्रॅम) उपक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.चार स्तरावर होत असलेल्या या प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्रणेची मतदारांना माहिती देण्यात येत आहे. त्याचबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर चुनावी पाठशाला उपक्रमात मतदारांच्या शंकांचे निरसन करत त्यांचे मतदान यादीतील नाव, भाग याची माहिती देण्यात येत आहे. प्रत्येक तहसील कार्यालयात मतदार सहाय केंद्र, तर प्रत्येक शासकीय कार्यालयात मतदार जागृती फोरम सुरू करण्यात आला आहे.दुसऱ्या प्रकारात शहरातील ज्या भागात नेहमीच कमी मतदान होते, त्याठिकाणी जागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक गलाई बांधव व्यवसायासाठी देशभर वास्तव्यास आहेत. त्यांनी मतदान करावे यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. तरुण मतदारांनीही मतदान करावे, यासाठी कॉलेजमध्ये उपक्रम सुरू करण्यात येत असून, प्रत्येक  कॅम्पस अ‍ॅम्बेसिडर कार्यरत आहेत. शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी गृहनिर्माण सोसायटीमध्ये बैठक, मुलांकडून पत्रलेखन उपक्रम राबविण्यात येत आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगलीVotingमतदान