शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात काम नसल्याने रोजगारासाठी स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 15:11 IST

कवठेमहांकाळ या कायमस्वरुपी दुष्काळी गणलेल्या तालुक्यातील जनता तीव्र दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत आहे. टंचाईग्रस्त स्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चारा-पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण

ठळक मुद्देटंचाईमुळे बागा जतन करणेही जिकिरीचे बनले आहे. सध्या काहींनी पाण्याविना बागा सोडून दिल्या आहेत

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ या कायमस्वरुपी दुष्काळी गणलेल्या तालुक्यातील जनता तीव्र दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत आहे. टंचाईग्रस्त स्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चारा-पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, या सततच्या दुष्काळाने अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आहे. कामच मिळत नसल्याने स्थलांतराची वेळ आली असून, रोजगार हमीची कामे सुरू करण्याची वाढती मागणी होत आहे.  

कवठेमहांकाळ हा कायमस्वरुपी दुष्काळी तालुका. सततच्या दुष्काळाने ओढे, नाले, बंधारे, तलाव कोरडे ठणठणीत असून काही भागात म्हैसाळ व टेंभू योजनेची कामे झाली. परंतु घाटमाथ्यावर बराच भाग सिंचन योजनेपासून वंचित आहे. जलसिंचन योजना झालेल्या भागातही पाण्याचे आवर्तन मोक्याच्या वेळी बंद असते.  त्याचा फटका शेतीला बसत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊसच झाला नसल्याने खरीप व रब्बीचा पेरा वाया गेला. बळीराजाने मशागती, खते, औषधे यावर केलेला खर्चही वाया गेला. काही शेतकºयांनी पीक विमा भरला. पण त्याचा परतावाही समाधानकारक मिळाला नाही. 

सध्या तीव्र चारा व पाणी टंचाई तालुक्यात जाणवू लागली आहे. पाऊसच न झाल्याने व रब्बी, खरीप हंगाम वाया गेल्याने, त्यातच पावसाविना नैसर्गिक चारा उपलब्ध न झाल्याने चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोठेही जलस्रोत उपलब्ध नसल्याने पाण्याचा प्रश्नही जाणवत असून, पशुखाद्याचे दरही गगनाला भिडले असल्याने जनावरे जतन करणे जिकिरीचे झाले आहे. 

परिसरात नगदी पीक म्हणून द्राक्ष व डाळिंब लागवडीला शेतकºयांनी पसंती दिली. त्यामुळे हळूहळू बागायत क्षेत्रही वाढले. परंतु सततच्या दुष्काळाने व हवामानाच्या लहरीपणामुळे  बागायत क्षेत्रही घटू लागले आहे. सततच्या टंचाईमुळे बागा जतन करणेही जिकिरीचे बनले आहे. सध्या काहींनी पाण्याविना बागा सोडून दिल्या आहेत, तर काहींनी बागा काढून टाकण्यास सुरुवात केली आहे.

चारा व पाण्याविना जनावरे जतन करणे कसरतीचे झाले असून, चारा छावणी सुरू करण्याची मागणी शासनदरबारी धूळ खात पडली आहे. जनतेच्या व जनावरांच्या हलाखीत नेतेमंडळी व प्रशासकीय अधिकारी वर्ग निवडणुकीच्या कामात अडकला असून, जनता मात्र मरणयातना सहन करीत आहे. जनतेला दुष्काळाच्या झळा जाणवू दिल्या जाणार नाहीत, ही सरकारची घोषणा हवेत विरल्याचे जाणवत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई