शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

दुष्काळात काम नसल्याने रोजगारासाठी स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 15:11 IST

कवठेमहांकाळ या कायमस्वरुपी दुष्काळी गणलेल्या तालुक्यातील जनता तीव्र दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत आहे. टंचाईग्रस्त स्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चारा-पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण

ठळक मुद्देटंचाईमुळे बागा जतन करणेही जिकिरीचे बनले आहे. सध्या काहींनी पाण्याविना बागा सोडून दिल्या आहेत

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ या कायमस्वरुपी दुष्काळी गणलेल्या तालुक्यातील जनता तीव्र दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत आहे. टंचाईग्रस्त स्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चारा-पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, या सततच्या दुष्काळाने अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आहे. कामच मिळत नसल्याने स्थलांतराची वेळ आली असून, रोजगार हमीची कामे सुरू करण्याची वाढती मागणी होत आहे.  

कवठेमहांकाळ हा कायमस्वरुपी दुष्काळी तालुका. सततच्या दुष्काळाने ओढे, नाले, बंधारे, तलाव कोरडे ठणठणीत असून काही भागात म्हैसाळ व टेंभू योजनेची कामे झाली. परंतु घाटमाथ्यावर बराच भाग सिंचन योजनेपासून वंचित आहे. जलसिंचन योजना झालेल्या भागातही पाण्याचे आवर्तन मोक्याच्या वेळी बंद असते.  त्याचा फटका शेतीला बसत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊसच झाला नसल्याने खरीप व रब्बीचा पेरा वाया गेला. बळीराजाने मशागती, खते, औषधे यावर केलेला खर्चही वाया गेला. काही शेतकºयांनी पीक विमा भरला. पण त्याचा परतावाही समाधानकारक मिळाला नाही. 

सध्या तीव्र चारा व पाणी टंचाई तालुक्यात जाणवू लागली आहे. पाऊसच न झाल्याने व रब्बी, खरीप हंगाम वाया गेल्याने, त्यातच पावसाविना नैसर्गिक चारा उपलब्ध न झाल्याने चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोठेही जलस्रोत उपलब्ध नसल्याने पाण्याचा प्रश्नही जाणवत असून, पशुखाद्याचे दरही गगनाला भिडले असल्याने जनावरे जतन करणे जिकिरीचे झाले आहे. 

परिसरात नगदी पीक म्हणून द्राक्ष व डाळिंब लागवडीला शेतकºयांनी पसंती दिली. त्यामुळे हळूहळू बागायत क्षेत्रही वाढले. परंतु सततच्या दुष्काळाने व हवामानाच्या लहरीपणामुळे  बागायत क्षेत्रही घटू लागले आहे. सततच्या टंचाईमुळे बागा जतन करणेही जिकिरीचे बनले आहे. सध्या काहींनी पाण्याविना बागा सोडून दिल्या आहेत, तर काहींनी बागा काढून टाकण्यास सुरुवात केली आहे.

चारा व पाण्याविना जनावरे जतन करणे कसरतीचे झाले असून, चारा छावणी सुरू करण्याची मागणी शासनदरबारी धूळ खात पडली आहे. जनतेच्या व जनावरांच्या हलाखीत नेतेमंडळी व प्रशासकीय अधिकारी वर्ग निवडणुकीच्या कामात अडकला असून, जनता मात्र मरणयातना सहन करीत आहे. जनतेला दुष्काळाच्या झळा जाणवू दिल्या जाणार नाहीत, ही सरकारची घोषणा हवेत विरल्याचे जाणवत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई