शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात काम नसल्याने रोजगारासाठी स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 15:11 IST

कवठेमहांकाळ या कायमस्वरुपी दुष्काळी गणलेल्या तालुक्यातील जनता तीव्र दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत आहे. टंचाईग्रस्त स्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चारा-पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण

ठळक मुद्देटंचाईमुळे बागा जतन करणेही जिकिरीचे बनले आहे. सध्या काहींनी पाण्याविना बागा सोडून दिल्या आहेत

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ या कायमस्वरुपी दुष्काळी गणलेल्या तालुक्यातील जनता तीव्र दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत आहे. टंचाईग्रस्त स्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चारा-पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, या सततच्या दुष्काळाने अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आहे. कामच मिळत नसल्याने स्थलांतराची वेळ आली असून, रोजगार हमीची कामे सुरू करण्याची वाढती मागणी होत आहे.  

कवठेमहांकाळ हा कायमस्वरुपी दुष्काळी तालुका. सततच्या दुष्काळाने ओढे, नाले, बंधारे, तलाव कोरडे ठणठणीत असून काही भागात म्हैसाळ व टेंभू योजनेची कामे झाली. परंतु घाटमाथ्यावर बराच भाग सिंचन योजनेपासून वंचित आहे. जलसिंचन योजना झालेल्या भागातही पाण्याचे आवर्तन मोक्याच्या वेळी बंद असते.  त्याचा फटका शेतीला बसत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊसच झाला नसल्याने खरीप व रब्बीचा पेरा वाया गेला. बळीराजाने मशागती, खते, औषधे यावर केलेला खर्चही वाया गेला. काही शेतकºयांनी पीक विमा भरला. पण त्याचा परतावाही समाधानकारक मिळाला नाही. 

सध्या तीव्र चारा व पाणी टंचाई तालुक्यात जाणवू लागली आहे. पाऊसच न झाल्याने व रब्बी, खरीप हंगाम वाया गेल्याने, त्यातच पावसाविना नैसर्गिक चारा उपलब्ध न झाल्याने चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोठेही जलस्रोत उपलब्ध नसल्याने पाण्याचा प्रश्नही जाणवत असून, पशुखाद्याचे दरही गगनाला भिडले असल्याने जनावरे जतन करणे जिकिरीचे झाले आहे. 

परिसरात नगदी पीक म्हणून द्राक्ष व डाळिंब लागवडीला शेतकºयांनी पसंती दिली. त्यामुळे हळूहळू बागायत क्षेत्रही वाढले. परंतु सततच्या दुष्काळाने व हवामानाच्या लहरीपणामुळे  बागायत क्षेत्रही घटू लागले आहे. सततच्या टंचाईमुळे बागा जतन करणेही जिकिरीचे बनले आहे. सध्या काहींनी पाण्याविना बागा सोडून दिल्या आहेत, तर काहींनी बागा काढून टाकण्यास सुरुवात केली आहे.

चारा व पाण्याविना जनावरे जतन करणे कसरतीचे झाले असून, चारा छावणी सुरू करण्याची मागणी शासनदरबारी धूळ खात पडली आहे. जनतेच्या व जनावरांच्या हलाखीत नेतेमंडळी व प्रशासकीय अधिकारी वर्ग निवडणुकीच्या कामात अडकला असून, जनता मात्र मरणयातना सहन करीत आहे. जनतेला दुष्काळाच्या झळा जाणवू दिल्या जाणार नाहीत, ही सरकारची घोषणा हवेत विरल्याचे जाणवत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई