शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांची मोर्चेबांधणी अन् भूछत्रांचा वाढता जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:44 IST

वरिष्ठ नेत्यांना भेटून कामाचा पुळका आणायचा आणि आम्हीच कसे तुमचे तारणहार आहे, याचा आव आणण्याचाच सध्या प्रयत्न सुरू आहे.

ठळक मुद्देविधानसभेसाठी भाऊगर्दी : विद्यमानांची मतदार संघात जुळवाजुळव

दीपक शिंदे ।सातारा : विधानसभा निवडणूक जशी जवळ येईल तसे निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. पावसाळ्यात भूछत्र्या उगवण्याचे प्रमाण जास्त असतं, त्याप्रमाणे निवडणुका आल्या की ही राजकीय भूछत्रं उगवतात; पण जरा उन्हाची तिरीप लागली की भूछत्रांचा सुकून वाळा होतो. तशीच अवस्था या इच्छुकांचीही होणार आहे. वरिष्ठ नेत्यांना भेटून कामाचा पुळका आणायचा आणि आम्हीच कसे तुमचे तारणहार आहे, याचा आव आणण्याचाच सध्या प्रयत्न सुरू आहे.

जिल्ह्यात निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने इच्छुकांची भाऊगर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. कोणाला विरोध तर कोणाला सोबत घेऊन एकमेकांची खोड मोडण्याचे राजकारण सुरू आहे. काही ठिकाणी तर ज्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येता येत नाही, असे लोक स्वत:लाच विधानसभेचा उमेदवार घोषित करू लागले आहेत. तर काहीजण नेत्यांना मतदार संघातील समस्यांचे पत्र देऊन आश्वासन घेऊ लागले आहेत. गुप्त बैठका आणि नियोजन याच्यावर भर दिला जात असतानाच आपली ताकद आणि जनाधार याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे.

गेल्या पाच वर्षांत गावात काय काम आहे, कोणाची काय अडचण आहे? याच्याशी देणे-घेणे नसणाऱ्यांना एकदम गावाची आणि गावातील लोकांची, प्रलंबित कामांची काळजी वाटू लागल्याने गावकरीही आश्चर्य व्यक्त करत आहेत. काही मतदार संघात इच्छुकांची संख्या वाढलेली आहे; विद्यमान आमदाराचा पराभव करण्यासाठी सर्व इच्छुक आता एकत्र आलेत. प्रत्येकजण आपला स्वतंत्र अजेंडा घेऊन आणि तयारीसह मतदारांपर्यंत पोहोचत आहे. जवळपास सर्वच विधानसभा मतदार संघातही इच्छुकांची संख्या वाढत आहे. एकास एक लढत झाली तर काही गणिते मांडता येतात; पण बहुरंगी लढती झाल्या की कोणाच्या पदरात काय पडणार? याचा मागमूसच लागत नाही. चांगल्या उमेदवाराचीही गोची करण्याचे काम ही ऐनवेळची भूछत्रे करीत असतात.

सध्या विद्यमान आमदारांनी केलेल्या कामांची सरबत्तीच सुरू केली आहे. तर निवडणूक लढवू इच्छिणारे गेल्या अनेक वर्षांत न झालेल्या कामांची यादी तयार करू लागले आहेत. ही कामे आपल्याशिवाय कोणीच करू शकणार नाही, असा विश्वासही देऊ लागल्याने मतदारांनाही आश्चर्य वाटत आहे; पण केवळ निवडणुकीपुरता फायदा करून घेण्यासाठी अनेकजण रिंगणात उतरतात आणि पुन्हा गायब होतात. ते पाच वर्षे दिसतच नाहीत. त्यांना मतदारही ओळखतात, त्यामुळेच ही पावसाळ्यातील भूछत्रे फक्त पावसाळ्यातच उगवतात, असा टोला त्यांना मारला जाऊ लागल्याचे दिसत आहे.आठ मतदार संघांत इच्छुकांची चाचपणीजिल्ह्यातील आठ मतदार संघांत सध्या ४२ जण इच्छुक आहेत. यातील काही मातब्बर तर काही नव्याने प्रयत्नाच्या तयारीत आहेत. विद्यमान आमदारांना जेरीस आणण्याचा प्रयत्नही काहीजणांनी केला आहे. त्याची झलक लोकसभा निवडणुकीत दाखवूनही दिली आहे. त्यामुळे आता सावध पवित्रा घेऊनच विद्यमानही रिंगणात उतरणार आहेत. कोणतीही हयगय होऊ नये, यासाठी निवडणुकीपूर्वीच मतदारसंघ बांधून ठेवण्याची किमया केली जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण