शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

आमदारांची मोर्चेबांधणी अन् भूछत्रांचा वाढता जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:44 IST

वरिष्ठ नेत्यांना भेटून कामाचा पुळका आणायचा आणि आम्हीच कसे तुमचे तारणहार आहे, याचा आव आणण्याचाच सध्या प्रयत्न सुरू आहे.

ठळक मुद्देविधानसभेसाठी भाऊगर्दी : विद्यमानांची मतदार संघात जुळवाजुळव

दीपक शिंदे ।सातारा : विधानसभा निवडणूक जशी जवळ येईल तसे निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. पावसाळ्यात भूछत्र्या उगवण्याचे प्रमाण जास्त असतं, त्याप्रमाणे निवडणुका आल्या की ही राजकीय भूछत्रं उगवतात; पण जरा उन्हाची तिरीप लागली की भूछत्रांचा सुकून वाळा होतो. तशीच अवस्था या इच्छुकांचीही होणार आहे. वरिष्ठ नेत्यांना भेटून कामाचा पुळका आणायचा आणि आम्हीच कसे तुमचे तारणहार आहे, याचा आव आणण्याचाच सध्या प्रयत्न सुरू आहे.

जिल्ह्यात निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने इच्छुकांची भाऊगर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. कोणाला विरोध तर कोणाला सोबत घेऊन एकमेकांची खोड मोडण्याचे राजकारण सुरू आहे. काही ठिकाणी तर ज्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येता येत नाही, असे लोक स्वत:लाच विधानसभेचा उमेदवार घोषित करू लागले आहेत. तर काहीजण नेत्यांना मतदार संघातील समस्यांचे पत्र देऊन आश्वासन घेऊ लागले आहेत. गुप्त बैठका आणि नियोजन याच्यावर भर दिला जात असतानाच आपली ताकद आणि जनाधार याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे.

गेल्या पाच वर्षांत गावात काय काम आहे, कोणाची काय अडचण आहे? याच्याशी देणे-घेणे नसणाऱ्यांना एकदम गावाची आणि गावातील लोकांची, प्रलंबित कामांची काळजी वाटू लागल्याने गावकरीही आश्चर्य व्यक्त करत आहेत. काही मतदार संघात इच्छुकांची संख्या वाढलेली आहे; विद्यमान आमदाराचा पराभव करण्यासाठी सर्व इच्छुक आता एकत्र आलेत. प्रत्येकजण आपला स्वतंत्र अजेंडा घेऊन आणि तयारीसह मतदारांपर्यंत पोहोचत आहे. जवळपास सर्वच विधानसभा मतदार संघातही इच्छुकांची संख्या वाढत आहे. एकास एक लढत झाली तर काही गणिते मांडता येतात; पण बहुरंगी लढती झाल्या की कोणाच्या पदरात काय पडणार? याचा मागमूसच लागत नाही. चांगल्या उमेदवाराचीही गोची करण्याचे काम ही ऐनवेळची भूछत्रे करीत असतात.

सध्या विद्यमान आमदारांनी केलेल्या कामांची सरबत्तीच सुरू केली आहे. तर निवडणूक लढवू इच्छिणारे गेल्या अनेक वर्षांत न झालेल्या कामांची यादी तयार करू लागले आहेत. ही कामे आपल्याशिवाय कोणीच करू शकणार नाही, असा विश्वासही देऊ लागल्याने मतदारांनाही आश्चर्य वाटत आहे; पण केवळ निवडणुकीपुरता फायदा करून घेण्यासाठी अनेकजण रिंगणात उतरतात आणि पुन्हा गायब होतात. ते पाच वर्षे दिसतच नाहीत. त्यांना मतदारही ओळखतात, त्यामुळेच ही पावसाळ्यातील भूछत्रे फक्त पावसाळ्यातच उगवतात, असा टोला त्यांना मारला जाऊ लागल्याचे दिसत आहे.आठ मतदार संघांत इच्छुकांची चाचपणीजिल्ह्यातील आठ मतदार संघांत सध्या ४२ जण इच्छुक आहेत. यातील काही मातब्बर तर काही नव्याने प्रयत्नाच्या तयारीत आहेत. विद्यमान आमदारांना जेरीस आणण्याचा प्रयत्नही काहीजणांनी केला आहे. त्याची झलक लोकसभा निवडणुकीत दाखवूनही दिली आहे. त्यामुळे आता सावध पवित्रा घेऊनच विद्यमानही रिंगणात उतरणार आहेत. कोणतीही हयगय होऊ नये, यासाठी निवडणुकीपूर्वीच मतदारसंघ बांधून ठेवण्याची किमया केली जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण