शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 11:47 IST

आपल्या अपयशाचे खापर अनेक जण नशिबावर फोडतात. मात्र जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर खडतर परिस्थितीवर मात करून काहीजण समाजात आपला वेगळा ठसा उमटवतात.

आपल्या आजुबाजुला अनेक घटना घडत असतात. अनेकजण आपल्यापेक्षाही जास्त यातना सहन करत असतात. परिस्थिती नसते, संधी मिळत नाही म्हणून नशिबाला दोष देत बसतात. पण एखादा जन्मताच मोल मजुरी करणाऱ्या कुटुंबात जन्माला आला असेल तर... त्यातून त्याने बडा अधिकारी व्हायचे स्वप्न पाहिले असेल तर आणि तो तसा अधिकारी झाला तर... गोष्ट आहे सांगलीच्या शिराळ्यातील बिरजूची...

आपल्या अपयशाचे खापर अनेक जण नशिबावर फोडतात. मात्र जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर खडतर परिस्थितीवर मात करून काहीजण समाजात आपला वेगळा ठसा उमटवतात. पहिली ते दहावीपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिराळा येथील सद्गुरु आश्रमशाळेत घेऊन नुकताच आयएएस झालेला बिरजू गोपाल चौधरी याने हे सिद्ध करून दाखवले आहे.

२०२३-२४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बिरजू हे देशात १८७ व्या रैंकने उत्तीर्ण झाले. बिरजू चौधरी हा एका मजुराचा मुलगा. पोटाची खळगी भरण्यासाठी बिरजूचे कुटुंब राजस्थानमधील कोटा येथून शिराळ्यात आले होते. दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत राहून आई चंदा मजुरी तर वडील गोपाळ हे मार्बल तसेच फरशी बसवण्याचे काम करायचे. मिळणाऱ्या तुटपुंज्या मजुरीतून कसेबसे घर चालायचे. पोराच्या शिक्षणाचा खर्च पेलणार नाही हे माहित असल्यामुळे गोपाल चौधरी यांनी बिरजूला शिराळा येथील सद्‌गुरु आश्रमशाळेत पहिलीत दाखल केले. बिरजू चुणचुणीत आणि हुशार आहे हे शिक्षकांनी लगेच जाणले. तो दुसऱ्या राज्यातील आहे. परिस्थितीमुळे त्याचे शिक्षण अधुरे राहणार नाही याची दक्षता शिक्षकांनी घेतली. वेळप्रसंगी त्याला आर्थिक मदतही केली. याच आश्रम शाळेच्या मदतीवर बिरजूने आयएएस क्रॅक केली आहे. 

आपल्या यशामध्ये सद्‌गुरु आश्रमशाळेचे तसेच सर्व शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शाळेचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही. शाळेतच माझा पाया भक्कम झाला आणि मला योग्य दिशा मिळाली, अशा भावना बिरजू  गोपाळ चौधरी यांनी व्यक्त केल्या. 

पहिली ते दहावीपर्यंतचे आश्रमशाळेतच पूर्ण केले. सातवीत असताना शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. दहावीतही ९३ टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. सध्या तो आयकर विभागामध्ये आयकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यानंतरही परीक्षा देत राहिला आणि यूपीएससी परीक्षेत त्याने दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. सद्‌गुरु जंगली महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव एकनाथराव जाधव, सहसचिव सत्यजित जाधव व सर्व शिक्षकांनी बिरजूचे अभिनंदन केले.

भाषेची अडचण होती...बिरजू लहानपणापासून शांत, संयमी आणि आज्ञाधारक होता. शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्याला भाषेची अडचण होती, मात्र अवघ्या काही महिन्यांतच त्याने मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले. प्रत्येक इयत्तेत तो पहिल्या तीन क्रमांकात असायचा. खडतर परिस्थितीत त्याने मिळवलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे.  - विलास निकम, प्राथमिक शिक्षक 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी