शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक पाटील यांचे विधान वैफल्यातून

By admin | Updated: April 3, 2015 00:38 IST

संजय पाटील : पाणी योजनांमध्ये राजकारण आणणे चुकीचे

सांगली : जिल्ह्यातील सिंचन योजनांबाबत प्रतीक पाटील यांनी वैफल्यातून विधान केलेले आहे. पाणी योजनांमध्ये राजकारण आणणे चुकीचे आहे. सरकार बदलले म्हणून भूमिका बदलल्या, असा अपप्रचार करण्यापेक्षा लोकांच्या हितासाठी एकत्र येण्याची भूमिका राजकारण्यांनी घेतली पाहिजे, असे मत खासदार संजय पाटील यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, आघाडी सरकार असताना आवर्तने सुरळीत होती आणि नव्या सरकारमुळे अडचणी आल्याची दिशाभूल करणारी वक्तव्ये आणि सोशल मीडियावरील अपप्रचार दुर्दैवी आहे. टंचाई काळात वीजबिल टंचाई निधीतून भरण्यात आले. वास्तविक त्यावेळची पाणीपट्टी अजूनही माफ झालेली नाही. आज ना उद्या ती आपल्याला भरावीच लागणार आहे. टंचाई नसताना योजनेचे वीजबिल कोठून भरायचे?, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. ही दीर्घकालीन शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना असल्याने ती व्यवस्थित चालावी, अशी अपेक्षा आहे. काही लोक या योजनांमध्ये राजकारण आणत आहेत. अशाप्रकारच्या राजकारणातून लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग सुरू आहे. लोकांनी राजकारणाकडे लक्ष न देता स्वत:चे हित पाहावे. पाण्याचे आवर्तन, त्याचा वापर, पाणीपट्टी भरण्याची पद्धत, त्याचे दर याबाबत एक शिस्त लागली पाहिजे. ही शिस्त लागली नाही, तर भविष्यात योजना चालवायच्या कशा?, याबाबतचे आर्थिक संकट आपल्यासमोर उभे राहील. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज केले पाहिजेत. सिंचन योजना पूर्णत्वास येत असताना, केवळ पाण्याच्या मागणीचे अर्ज नाहीत म्हणून अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आम्ही लोकांमध्ये जागृती करीत आहोत. (प्रतिनिधी)दखल घ्यायची गरज नाहीप्रतीक पाटील यांनी, नव्या सरकारच्या कालावधित जिल्ह्यातील सिंचन योजनांचे भवितव्य अंधारात आहे, अशी टीका केली होती. या वक्तव्याची दखल घ्यायची गरज नाही, असे सांगतानाच संजय पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. पाणी योजनांबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित यावे, असे आवाहन त्यांनी केले. दोषींवर कारवाई कराजिल्हा बँकेबाबत भूमिका व्यक्त करताना ते म्हणाले की, बँकेतील गैरव्यवहारात दोषी आढळणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे. जिल्ह्यातील ८0 टक्के शेतकऱ्यांना या बँकेवर अवलंबून राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांची ही बँक चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे. त्यात राजकारण आणू नये. स्वप्नील पाटील भाजपचा नव्हेतासगाव-कवठेमहांकाळ पोटनिवडणुकीबाबत संजय पाटील म्हणाले की, स्वप्नील पाटील यांचे वडील पूर्वी आर. आर. पाटील यांच्याबरोबर काम करीत होते. त्यानंतर काही काळ त्यांनी काँग्रेसचे काम केले. केवळ लोकसभेच्या कालावधित स्वप्नील पाटील माझ्या प्रचारात होता. त्याचा आणि भाजपचा काहीही संबंध नाही. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये आम्ही कोणतेही राजकारण केलेले नाही. नाराजीतून काही लोकांनी उमेदवारी अर्ज भरले असतील, तर त्यांना आम्ही समजावून सांगू. पक्षाने जी भूमिका घेतली आहे, त्याच्याशी आम्ही बांधील आहोत. अजितराव घोरपडे यांचाही स्वप्नीलशी संबंध नाही. त्यामुळे विनाकारण कोणत्याही गोष्टीवर तर्क काढणे चुकीचे आहे. आम्ही आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनतार्इंनाच पाठिंबा दिलेला आहे.