शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

केंद्राच्या धोरणाविरोधात कामगारांचा एल्गार : सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना, हमाल, महिला संघटनांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 23:58 IST

केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या धोरणांमुळे देशात आर्थिक मंदीचे वातावरण असून, महागाई, बेरोजगारीत वाढ होत आहे. त्याचबरोबर कामगार कायद्यात होणारे बदल हे भांडवलदारांना फायद्याचे ठरत असून, कामगारांच्या हक्कावर गदा आणणारे आहेत. यासह शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संप, तसेच मोर्चाचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांच्या संपास मोठा प्रतिसाद

सांगली : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समिती, तसेच विविध कामगार संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली. देशव्यापी पुकारण्यात आलेल्या या संपात जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी दिलेल्या सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या धोरणांमुळे देशात आर्थिक मंदीचे वातावरण असून, महागाई, बेरोजगारीत वाढ होत आहे. त्याचबरोबर कामगार कायद्यात होणारे बदल हे भांडवलदारांना फायद्याचे ठरत असून, कामगारांच्या हक्कावर गदा आणणारे आहेत. यासह शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संप, तसेच मोर्चाचे आयोजन केले होते.

बुधवारी सकाळी शहरातील विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात जिल्हाभरातून सर्व कर्मचारी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. त्यानंतर मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. यात संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कडाडून टीका केली. एकाचवेळी विविध संघटनांनी एकत्र येत आंदोलन केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष जे. के. महाडिक, कार्याध्यक्ष डी. जी. मुलाणी, पी. एन. काळे, रमेश सहस्रबुध्दे, शंकर पुजारी, विकास मगदूम, शिक्षक समितीचे नेते किरण गायकवाड, बाबासाहेब लाड, सयाजी पाटील, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे, मुकुंद जाधवर आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. 

  • बँका बंदने हजार कोटीचे व्यवहार ठप्प

सरकारी बँक कर्मचाºयांच्या संघटनेने बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे बँकांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. बँक कर्मचा-यांनी भारत बंदमध्ये सहभाग घेतल्याने कामगार संघटनांचे प्राबल्य असलेल्या महाराष्ट्र बँक, बँक आॅफ इंडिया, देना बँक, सिंडिकेट बँक, युनियन बँक यांसारख्या सरकारी बँकांशिवाय काही व्यापारी बँकांचे कामकाज ठप्प झाले. जिल्ह्यातील बहुतांश बँकांच्या शाखांचे कामकाज सुरु होऊ न शकल्याने सुमारे एक हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखा सुरु राहिल्या.

  • कर्मचा-यांच्या मागण्या

संघटनांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, केंद्र सरकारप्रमाणे सर्व भत्ते राज्य कर्मचाºयांना लागू करावेत, पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा, खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करावे, रिक्त पदे तात्काळ भरावीत, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण पूर्णपणे रद्द करावे, शिक्षकांना अशैक्षणिक काम देण्यात येऊ नयेत. 

  • संघटनांचा सहभाग

या आंदोलनात सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समिती, महावितरण कर्मचारी, पोस्ट कर्मचारी, बॅँक एम्प्लॉईज असोसिएशन, आयुर्विमा, ग्रामपंचायत कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, प्राथमिक शिक्षक संघ, अंगणवाडी सेविका, बांधकाम कामगार, आशा वर्कर्स आदी सहभागी झाले होते.

केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. दुसऱ्या छायाचित्रात कर्मचारी संपामुळे बँका बंद होत्या.

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप