शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

सांगलीतील कुंडल, हरिपूरसह पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 12:34 IST

या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.

सांगली : पलूस तालुक्यातील कुंडल, मिरज तालुक्यातील नांद्रे, हरिपूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव आणि आटपाडी तालुक्यातील चिंचाळे या ग्रामपंचायतीच्या प्रभागाचे आरक्षण सोडत काढताना ओबीसी आरक्षण टाकले नव्हते. म्हणून राज्य निवडणूक आयोगाने ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमातून पाच ग्रामपंचायती वगळल्या आहेत. तसेच या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.नांद्रे, हरिपूर, कुंडल, मळणगाव, चिंचाळे या ग्रामपंचायतींचे नव्याने प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. पण, अधिकाऱ्यांनी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षण शून्य असल्याने प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम रद्द केलेची जाहीर नोटीस रद्द केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राजकीय आरक्षण मिळणे गरजेचे आहे, पण असे असूनही हरिपूरकरिता ओबीसी आरक्षण शून्य कसे आले, याबाबत संदिग्धता होती.याविरोधात पाच ग्रामपंचायतींमधील लोकप्रतिनिधींची ओबीसी आरक्षणानुसारच सोडत निघाली पाहिजे. यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी कुंडल, हरिपूरसह पाचही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. तसेच ओबीसीनुसार निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभा दि. १५ नोव्हेंबर रोजी बोलविण्यात येणार आहे. या सभेत प्रारूप प्रभागरचनेवर आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत दि. १७ नोव्हेंबर, दि. १८ नोव्हेंबर सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे, दि. १८ ते २२ नोव्हेंबर प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करणे, दि. २३ नोव्हेंबर उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे, दि. २४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम प्रभागरचनेला मान्यता देऊन दि. २५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक