शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

सांगलीतील कुंडल, हरिपूरसह पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 12:34 IST

या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.

सांगली : पलूस तालुक्यातील कुंडल, मिरज तालुक्यातील नांद्रे, हरिपूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव आणि आटपाडी तालुक्यातील चिंचाळे या ग्रामपंचायतीच्या प्रभागाचे आरक्षण सोडत काढताना ओबीसी आरक्षण टाकले नव्हते. म्हणून राज्य निवडणूक आयोगाने ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमातून पाच ग्रामपंचायती वगळल्या आहेत. तसेच या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.नांद्रे, हरिपूर, कुंडल, मळणगाव, चिंचाळे या ग्रामपंचायतींचे नव्याने प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. पण, अधिकाऱ्यांनी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षण शून्य असल्याने प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम रद्द केलेची जाहीर नोटीस रद्द केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राजकीय आरक्षण मिळणे गरजेचे आहे, पण असे असूनही हरिपूरकरिता ओबीसी आरक्षण शून्य कसे आले, याबाबत संदिग्धता होती.याविरोधात पाच ग्रामपंचायतींमधील लोकप्रतिनिधींची ओबीसी आरक्षणानुसारच सोडत निघाली पाहिजे. यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी कुंडल, हरिपूरसह पाचही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. तसेच ओबीसीनुसार निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभा दि. १५ नोव्हेंबर रोजी बोलविण्यात येणार आहे. या सभेत प्रारूप प्रभागरचनेवर आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत दि. १७ नोव्हेंबर, दि. १८ नोव्हेंबर सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे, दि. १८ ते २२ नोव्हेंबर प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करणे, दि. २३ नोव्हेंबर उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे, दि. २४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम प्रभागरचनेला मान्यता देऊन दि. २५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक