शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार एकरातील पिके धोक्यात

By admin | Updated: January 29, 2015 00:11 IST

राजेवाडी तलावात अपुरा पाणीसाठा : सिंचन सुविधांची वानवा; पिके करपण्याची भीती

लक्ष्मण खटके - लिंगीवरे -राजेवाडी तलावात यावर्षी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा नसल्यामुळे त्यावर आधारित असणाऱ्या सुमारे आठ हजार एकर पिकाला धोका निर्माण झाला असून, पाण्याच्या ऐन गरजेच्या हंगामात पिके पाण्यावाचून करपण्याची भीती निर्माण झाली आहे. -राजेवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावावर आधारित ४४२०८ एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ पूर्वी मिळत होता. तलावाच्या डाव्या कालव्याद्वारे आटपाडी तालुक्यातील राजेवाडी, लिंगीवरे, उंबरगाव, पुजारवाडी, दिघंची, सांगोला तालुक्यातील खवासपूर, कटफळ, महूद, अचकदाणी, लक्ष्मीनगर आणि पूर्वेकडील काही भाग असे सिंचनाचे लाभक्षेत्र आहे. याशिवाय माण तालुक्यातील पळसवडे, देवापूर, हिंगणी, ढोकमोड या गावांनाही तलावातील पाण्याचा थेट लाभ मिळतो. तलावात पाणीसाठा असतानाच या क्षेत्राला त्याचा लाभ होतो. तलावाच्या डाव्या कालव्यातून सोलापूर जिल्ह्यातील शेरेवाडी तलावात पाणी सोडण्यात येते. पण पावसाच्या कमतरतेमुळे सध्या तलावात पाणीसाठा खूप कमी आहे. पाणी पातळी पाच दारांच्या जवळपास आली आहे. राखीव पाणीसाठ्याचा प्रश्न उभा आहे. शिवाय माणगंगा नदीमध्ये पाणी सोडण्याबाबत जोरदार मागणी सुरू आहे. या सर्व बाबींचा विचार करता, तलावातील पाणीसाठा तुटपुंजा वाटत आहे. राजेवाडी तलाव पाण्याने भरून घेण्याबाबत राजकीय उदासीनता असतानाच प्रशासनालाही या प्रश्नाचे सोयरसुतक नाही. जनतेच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न जनतेच्या काळजातच फक्त जळताना दिसत आहे. तलावात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा नसल्यामुळे आता डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणारी संपूर्ण पिके हाता-तोंडाला येत असतानाच पाण्यावाचून करपण्याची चिन्हे व भीती निर्माण झाली आहे. पोटऱ्यातील ज्वारी पीक भरणीतील मका, गहू, हरभरा, ऊस उत्पादनावर विपरित परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या स्वतंत्र सिंचन योजनेद्वारे विहिरी, कूपनलिका, आड यामार्फत पाणीपुरवठा करून पिके भिजविण्याची तयारी न केल्यास या पिकांची राख होण्यास वेळ लागणार नाही. गाळ साठल्याने पाणीसाठा कमीतलावात गेल्या शतकापासून गाळ मोठ्या प्रमाणात साचू लागल्यामुळे व त्याचा पुरेसा उपसा न झाल्यामुळे तलावाचा पाणीसाठा १४९३ दशलक्ष घनफूटपेक्षाही कमी झाला. त्यामुळे तलावाचे सिंचन लाभक्षेत्र ४४२०८ एकरावरुन केवळ ८ ते १० हजार एकरापर्यंत कमी झाले आहे. सध्या तलावात पाणीसाठा खूप कमी आहे. पाणीपातळी पाच दारांच्या जवळपास आली आहे. राखीव पाणीसाठ्याचा प्रश्न निंर्माण झाला आहे. शिवाय माणगंगा नदीमध्ये पाणी सोडण्याबाबत मागणी सुरू आहे. या सर्व बाबींचा विचार करता तलावातील पाणीसाठा तुटपुंजा आहे. राजेवाडी तलाव पाण्याने भरून घेण्याबाबत राजकीय उदासीनता असतानाच, प्रशासनालाही या प्रश्नाचे सोयरसुतक नाही. तलावाच्या पाण्याच्या भरंवशावर केलेली पिके आता कधी करपतील सांगता येत नाही. शासनाने तलाव भरून घेण्यासाठी व माणगंगा नदीत पाणी सोडून बारमाही करण्यासाठी प्रयत्न केले, तरच शेतकऱ्यांना दुष्काळावर मात करता येईल.- चंद्रकांत मदने, शेतकरी, राजेवाडी