शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही तोंड उघडलं तर अडचणीत याल"; अजित पवारांच्या टीकेला रवींद्र चव्हाणांकडून जशास तसे उत्तर
2
सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत १२ नक्षलवादी ठार
3
मुस्ताफिजुर रहमान बाबत निर्णय झाला, संघातून वगळण्याचे बीसीसीआयचे केकेआरला आदेश
4
सावधान! फोनचे 'ब्लूटूथ' ऑन ठेवणं पडू शकतं महागात; क्षणात बँक खातं होईल रिकामं!
5
"लग्न लावून दिलंत तर..."; मैत्रिणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या तरुणीची धमकी, थेट नवरीलाच पळवलं
6
७ जानेवारीला उघडणार ४५ वर्ष जुन्या कंपनीचा IPO; किती करावी लागणार गुंतवणूक, प्राईज बँड किती? जाणून घ्या
7
सोमवारी तळहातावरील गुरु पर्वतावर लावा हळदीचा टिळा; 'पुष्य नक्षत्रा'च्या मुहूर्तावर उघडेल भाग्याचे द्वार!
8
व्हिडीओ घेऊ नका...! वडिलांना घेऊन रुग्णालयातून बाहेर पडताना श्रद्धा कपूर पापाराझींवर भडकली
9
Mithun Chakraborty : "जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब..."; मिथुन चक्रवर्ती कडाडले, ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
10
Nashik Municipal Election 2026 : गटबाजीच्या खेळात प्रभाग २५ मध्ये दोन ठिकाणी कमळ कोमेजले, असे का घडले?
11
६७ बिनविरोध नगरसेवक निवडणूक आयोगाच्या रडारवर; दबाव टाकला की आमिष दाखवलं? होणार चौकशी
12
तारिक रहमान होणार 'किंग', पण प्रचाराचं काय? बांगलादेशात निवडणूक आयोगाच्या 'या' एका नियमाने वाढवलं टेन्शन!
13
Border 2: मेरा दिमाग हिला हुआ है! 'घर कब आओगे' गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल असं का म्हणाला?
14
पाकिस्तानची नापाक खेळी; राजस्थानमध्ये ड्रोनने पाठवली 'पांढरी पावडर', पोलिसांनी असा लावला छडा
15
इराणमध्ये खामेनींविरोधात निदर्शने तीव्र, ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे 'Gen-Z' चा उत्साह वाढला
16
एकच प्रीमिअम, पती-पत्नीला मिळणार विमा सुरक्षा प्लॅन; जाणून घ्या कसं?
17
महाराष्ट्राचा शाहरुख खान! पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेश कामतचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, दाखवले सिक्स पॅक ॲब्स
18
कंडोमच्या किमती वाढल्याने लोकसंख्या वाढेल? सलग तिसऱ्या वर्षी चीनला भीती, भारतासाठी ही एक संधी
19
‘नवसाचं पोर गेलं, भरपाई दिल्याने परत येणार का?’ दूषित पाण्यामुळे मृत्यू; दोन अधिकाऱ्यांना हटवले
20
इराण पेटला...! सर्वोच्च नेते खामेनेईंविरुद्ध तरुणाईचे रस्त्यावर उतरून आंदोलन; देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर, निदर्शनात सात जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार एकरातील पिके धोक्यात

By admin | Updated: January 29, 2015 00:11 IST

राजेवाडी तलावात अपुरा पाणीसाठा : सिंचन सुविधांची वानवा; पिके करपण्याची भीती

लक्ष्मण खटके - लिंगीवरे -राजेवाडी तलावात यावर्षी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा नसल्यामुळे त्यावर आधारित असणाऱ्या सुमारे आठ हजार एकर पिकाला धोका निर्माण झाला असून, पाण्याच्या ऐन गरजेच्या हंगामात पिके पाण्यावाचून करपण्याची भीती निर्माण झाली आहे. -राजेवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावावर आधारित ४४२०८ एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ पूर्वी मिळत होता. तलावाच्या डाव्या कालव्याद्वारे आटपाडी तालुक्यातील राजेवाडी, लिंगीवरे, उंबरगाव, पुजारवाडी, दिघंची, सांगोला तालुक्यातील खवासपूर, कटफळ, महूद, अचकदाणी, लक्ष्मीनगर आणि पूर्वेकडील काही भाग असे सिंचनाचे लाभक्षेत्र आहे. याशिवाय माण तालुक्यातील पळसवडे, देवापूर, हिंगणी, ढोकमोड या गावांनाही तलावातील पाण्याचा थेट लाभ मिळतो. तलावात पाणीसाठा असतानाच या क्षेत्राला त्याचा लाभ होतो. तलावाच्या डाव्या कालव्यातून सोलापूर जिल्ह्यातील शेरेवाडी तलावात पाणी सोडण्यात येते. पण पावसाच्या कमतरतेमुळे सध्या तलावात पाणीसाठा खूप कमी आहे. पाणी पातळी पाच दारांच्या जवळपास आली आहे. राखीव पाणीसाठ्याचा प्रश्न उभा आहे. शिवाय माणगंगा नदीमध्ये पाणी सोडण्याबाबत जोरदार मागणी सुरू आहे. या सर्व बाबींचा विचार करता, तलावातील पाणीसाठा तुटपुंजा वाटत आहे. राजेवाडी तलाव पाण्याने भरून घेण्याबाबत राजकीय उदासीनता असतानाच प्रशासनालाही या प्रश्नाचे सोयरसुतक नाही. जनतेच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न जनतेच्या काळजातच फक्त जळताना दिसत आहे. तलावात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा नसल्यामुळे आता डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणारी संपूर्ण पिके हाता-तोंडाला येत असतानाच पाण्यावाचून करपण्याची चिन्हे व भीती निर्माण झाली आहे. पोटऱ्यातील ज्वारी पीक भरणीतील मका, गहू, हरभरा, ऊस उत्पादनावर विपरित परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या स्वतंत्र सिंचन योजनेद्वारे विहिरी, कूपनलिका, आड यामार्फत पाणीपुरवठा करून पिके भिजविण्याची तयारी न केल्यास या पिकांची राख होण्यास वेळ लागणार नाही. गाळ साठल्याने पाणीसाठा कमीतलावात गेल्या शतकापासून गाळ मोठ्या प्रमाणात साचू लागल्यामुळे व त्याचा पुरेसा उपसा न झाल्यामुळे तलावाचा पाणीसाठा १४९३ दशलक्ष घनफूटपेक्षाही कमी झाला. त्यामुळे तलावाचे सिंचन लाभक्षेत्र ४४२०८ एकरावरुन केवळ ८ ते १० हजार एकरापर्यंत कमी झाले आहे. सध्या तलावात पाणीसाठा खूप कमी आहे. पाणीपातळी पाच दारांच्या जवळपास आली आहे. राखीव पाणीसाठ्याचा प्रश्न निंर्माण झाला आहे. शिवाय माणगंगा नदीमध्ये पाणी सोडण्याबाबत मागणी सुरू आहे. या सर्व बाबींचा विचार करता तलावातील पाणीसाठा तुटपुंजा आहे. राजेवाडी तलाव पाण्याने भरून घेण्याबाबत राजकीय उदासीनता असतानाच, प्रशासनालाही या प्रश्नाचे सोयरसुतक नाही. तलावाच्या पाण्याच्या भरंवशावर केलेली पिके आता कधी करपतील सांगता येत नाही. शासनाने तलाव भरून घेण्यासाठी व माणगंगा नदीत पाणी सोडून बारमाही करण्यासाठी प्रयत्न केले, तरच शेतकऱ्यांना दुष्काळावर मात करता येईल.- चंद्रकांत मदने, शेतकरी, राजेवाडी