शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीवर कार्यक्षम व्यवस्थापन हव

By admin | Updated: December 5, 2014 23:21 IST

पतंगराव कदम : कडेगाव येथे तीनदिवसीय भूगोलशास्त्र परिषद सुरूे

तोंडोली : जिल्हा व तालुका पातळीवर नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी कार्यक्षम व्यवस्थापन हवे, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांनी केले. कडेगाव येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात यु.जी.सी. व महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतातील नैसर्गिक आपत्ती आणि व्यवस्थापन’ या विषयावरील तीनदिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या माजी अधिष्ठाता डॉ. पी. डब्ल्यु. देशपांडे, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाचे भूगोल विभागप्रमुख डॉ. निलाद्री दास, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. एस. डी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.कदम म्हणाले की, दुष्काळ अतिवृष्टी, भूकंप, भूस्खलन यासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींना मानवाला सामोरे जावे लागते. माळीण दुर्घटना हे त्याचेच उदाहरण आहे. त्यासाठी भूगोलशास्त्राचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना केली पाहिजे. या परिषदेत विचारविनिमय होऊन त्याचे निष्कर्ष मांडण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले.डॉ. पी. डब्ल्यु. देशमुख म्हणाले की, काही आपत्ती नैसर्गिक, तर काही मानवनिर्मित असतात. म्हणून नैसर्गिक आपत्तींचा नेहमी दूरगामी विचार करायला हवा. डॉ. नीलाद्री दास म्हणाले की, भूगोल ही मानवी उत्क्रांतीपासून चालत आलेली एक अभ्यास शाखा आहे. काही दशकांपूर्वी मानवाला कोणत्याही हताशपणे नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत होते. परंतु आजच्या काळात सर्व प्रकारच्या आपत्तींचा अभ्यास करून त्यावर उपाय योजले जात आहेत. म्हणून नैसर्गिक आपत्ती निवारण हा संशोधनाचा अत्यंत महत्त्वाचा व वेगळ्या स्वरूपाचा विषय आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमात भारतातील नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापन या विषयावरील निवडक शोधनिबंधांच्या पुस्तकाचे प्रकाशन पतंगराव कदम यांच्याहस्ते झाले. यावेळी डॉ. के. आर. जाधव, डॉ. अर्जुन ननवरे, प्रा. नागराज पाटील यांना आदर्श भूगोल शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी डॉ. पी. जी. सप्तर्षी, डॉ. बी. एन. गोफने, डॉ. जे. सी. मोरे उपस्थित होते. स्वागत डॉ. सौ. एस. डी. कुलकर्णी यांनी केले. (वार्ताहर)