शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नैसर्गिक आपत्तीवर कार्यक्षम व्यवस्थापन हव

By admin | Updated: December 5, 2014 23:21 IST

पतंगराव कदम : कडेगाव येथे तीनदिवसीय भूगोलशास्त्र परिषद सुरूे

तोंडोली : जिल्हा व तालुका पातळीवर नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी कार्यक्षम व्यवस्थापन हवे, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांनी केले. कडेगाव येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात यु.जी.सी. व महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतातील नैसर्गिक आपत्ती आणि व्यवस्थापन’ या विषयावरील तीनदिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या माजी अधिष्ठाता डॉ. पी. डब्ल्यु. देशपांडे, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाचे भूगोल विभागप्रमुख डॉ. निलाद्री दास, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. एस. डी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.कदम म्हणाले की, दुष्काळ अतिवृष्टी, भूकंप, भूस्खलन यासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींना मानवाला सामोरे जावे लागते. माळीण दुर्घटना हे त्याचेच उदाहरण आहे. त्यासाठी भूगोलशास्त्राचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना केली पाहिजे. या परिषदेत विचारविनिमय होऊन त्याचे निष्कर्ष मांडण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले.डॉ. पी. डब्ल्यु. देशमुख म्हणाले की, काही आपत्ती नैसर्गिक, तर काही मानवनिर्मित असतात. म्हणून नैसर्गिक आपत्तींचा नेहमी दूरगामी विचार करायला हवा. डॉ. नीलाद्री दास म्हणाले की, भूगोल ही मानवी उत्क्रांतीपासून चालत आलेली एक अभ्यास शाखा आहे. काही दशकांपूर्वी मानवाला कोणत्याही हताशपणे नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत होते. परंतु आजच्या काळात सर्व प्रकारच्या आपत्तींचा अभ्यास करून त्यावर उपाय योजले जात आहेत. म्हणून नैसर्गिक आपत्ती निवारण हा संशोधनाचा अत्यंत महत्त्वाचा व वेगळ्या स्वरूपाचा विषय आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमात भारतातील नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापन या विषयावरील निवडक शोधनिबंधांच्या पुस्तकाचे प्रकाशन पतंगराव कदम यांच्याहस्ते झाले. यावेळी डॉ. के. आर. जाधव, डॉ. अर्जुन ननवरे, प्रा. नागराज पाटील यांना आदर्श भूगोल शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी डॉ. पी. जी. सप्तर्षी, डॉ. बी. एन. गोफने, डॉ. जे. सी. मोरे उपस्थित होते. स्वागत डॉ. सौ. एस. डी. कुलकर्णी यांनी केले. (वार्ताहर)