शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पवित्र पोर्टल बंद करण्यावरुन शिक्षण संस्था आणि सरकार आमनेसामने; दीपक केसरकर संतापले

By संतोष भिसे | Updated: October 2, 2022 19:09 IST

शिक्षक भरतीसाठीचे 'पवित्र पोर्टल' बंद करण्यावरुन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासमोरच आरडाओरडा झाला. संतापलेल्या केसरकरांनी उपस्थितांना सुनावले.

सांगली: शिक्षक भरतीसाठीचे पवित्र पोर्टल बंद करण्यावरुन शिक्षण संस्था आणि सरकार आमनेसामने आले. सांगलीत रविवारी शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासमोरच आरडाओरडा झाला. संतापलेल्या केसरकरांनी `पाहुण्यांचा आदर करायला शिका` या शब्दांत सुनावले. महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच हा प्रकार घडला.

महामंडळाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील महानगरीमध्ये झाले. केसरकर प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षस्थानी सुळे होत्या. सुळे यांनी केसरकर यांच्यासमोर शिक्षण संस्थांच्या मागण्या, अडचणींची जंत्री वाचली. केसरकर कार्यक्रमाला येण्यापूर्वी सुळे यांच्यासह सर्वच वक्त्यांनी पवित्र पोर्टल बंद करण्याची मागणी केली. केसरकरांनी भाषणादरम्यान, पोर्टल बंद केले जाणार नसल्याचे संकेत दिले. त्यामुळे उपस्थितामधील एका संस्थाचालकाने मध्येच उठून `पोर्टल बंद करा` अशी ओरड केली. त्यामुळे केसरकर संतापले.

(सांगलीत रविवारी शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनात स्मरणिकेचे प्रकाशन कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम आदींच्या उपस्थितीत झाले.) 

यावेळी दीपक केसरकर म्हणाले, पोर्टलमुळे दर्जेदार शिक्षक मिळत आहेत. ते बंद करणार नाही. मला पाहुणा म्हणून बोलावले आहे, पाहुण्यांचा आदर करायला शिका. पोर्टलचे विश्लेषण करा. त्रुटी दाखवून द्या. आरडाओरडा केला म्हणून नमून जाणारा मी मंत्री नाही. गोडगोड बोलून खुश करायला, आश्वासन द्यायला आलो नाही. एकत्र बसून प्रश्न सोडवायचे आहेत. सत्य स्वीकारायला शिका. अधिवेशनाला कामगार मंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, सुमनताई पाटील, किरण सरनाईक, महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

नवी पेन्शनच कायम ठेवण्याचे संकेत

केसरकर म्हणाले, ९९ टक्के लोकांनी नवी पेन्शन स्वीकारली आहे. तुम्हीही स्वीकार करा. न्यायालय जो निर्णय देईल, तो मान्य करु. बालकांचा मेंदू विकसीत होताना गृहपाठ योग्य नाही. अर्थात, सर्वांचाच बंद करणार नाही.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

  •  राज्यात शिक्षण संस्थाविरोधात सरकार, असे वातावरण.
  •  आरटीईचा थकीत परतावा त्वरित द्यावा.
  •  सरकारने शिक्षणासाठीची तरतुद वाढवावी
  •  शिक्षण संस्था महामंडळाचे संकेतस्थळ सुरु करणार.
  •  शिक्षण संस्थांनी प्रतिमा बदलण्यासाठी आत्मचिंतन करावे.
टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर SangliसांगलीSupriya Suleसुप्रिया सुळे