शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही सांगली जिल्ह्यातील सात तलाव कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:41 IST

सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघु ८४ प्रकल्प (तलाव) असून त्यामध्ये केवळ २२ टक्केच पाणीसाठा आहे. ३२ तलावांमध्ये, तर ५० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असून सात तलाव कोरडे ठणठणीत आहेत. सध्या तर पावसाचा जोर कमी असल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव आणि मिरज पूर्व भागातील खरीप हंगामातील पिके धोक्यात आहेत. या ...

ठळक मुद्दे ८४ तलावात केवळ २२ टक्के पाणीसाठा : दुष्काळी तालुक्यात खरीप वाया जाण्याची भीती; परतीच्या पावसाची आस

सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघु ८४ प्रकल्प (तलाव) असून त्यामध्ये केवळ २२ टक्केच पाणीसाठा आहे. ३२ तलावांमध्ये, तर ५० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असून सात तलाव कोरडे ठणठणीत आहेत. सध्या तर पावसाचा जोर कमी असल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव आणि मिरज पूर्व भागातील खरीप हंगामातील पिके धोक्यात आहेत. या पिकांचे भवितव्य आता परतीच्या पावसावरच अवलंबून असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील पाच मध्यम आणि ७९ लघु प्रकल्पांमध्ये ९ हजार ४४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असतानाही या प्रकल्पामध्ये केवळ दोन हजार ९९८.०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. प्रकल्पातील पाण्याचा विचार केल्यास, ते केवळ २२ टक्केच भरले आहेत. पावसाचा जोर वाढला नाही, तर प्रकल्प १०० टक्के भरण्याची शक्यता धूसर आहे. पावसाळ्यातच तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी दोन, खानापूर, आटपाडी, जत येथील प्रत्येकी एक प्रकल्प कोरडे ठणठणीत असल्याचा सांगली पाटबंधारे विभागाचाच अहवाल आहे. जिल्ह्यातील २३ प्रकल्पात केवळ २५ टक्के, तर ९ तलावात ५० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. सहा प्रकल्पांमध्ये ७५ टक्के, तर पाच तलावांमध्येच शंभर टक्के पाणीसाठा आहे. पाच शंभर टक्के भरलेल्या प्रकल्पांपैकी चार शिराळा व एका वाळवा तालुक्यातील प्रकल्पाचा समावेश आहे.

शिराळा तालुक्यात ८५९.८ मिलिमीटर, तर आटपाडी तालुक्यात ५२ टक्के, जत तालुक्यात ९८.८ टक्के पाऊस झाला आहे. कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात ११३.५ ते १२७.२ टक्के पाऊस झाला आहे. जून, जुलै या महिन्यात पावसाचा नेहमी जोर असतो. पण सध्या आॅगस्टचा पहिला आठवडा संपला तरीही पावसाचा जोर दिसत नाही. जिल्ह्यात केवळ ७८ टक्केच खरिपाच्या पेरण्या झाल्या असून जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील माळरानावरील पिकांनी माना टाकल्या आहेत. येथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. २२ टक्के शेतकºयांनी खरीप पेरणीच केलेली नाही. परतीचा पाऊस जोरदार झाला नाही, तर निम्म्या जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सिंचन योजनांतून पाझर तलाव भरा : महावीर पाटीलदुष्काळी तालुक्यात सध्याही पाणीटंचाईच आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना चालू करुन दुष्काळी भागातील पाझर तलाव भरावेत. यामुळे काही शेतकºयांच्या पदरात तरी खरिपाची पिके पडणार आहेत. शासनाने सिंचन योजनांची वीज बिले टंचाईतून भरावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी केली आहे.यंदा २४.७ टक्के जादा पाऊस, तरीही खरीप अडचणीतसांगली जिल्ह्यात गतवर्षी १ जून ते ६ आॅगस्ट २०१७ अखेर ८८.७ मिलिमीटर पाऊस झाला होता. परंतु, परतीच्या पावसाने मान्सूनच्या एन्ट्रीचा बॅकलॉग भरुन काढला होता. त्यामुळे शेतकºयांच्या पदरात खरीप पिके पडली होती. यावर्षीची परिस्थितीही काही प्रमाणात तशीच आहे. १ जून ते ६ आॅगस्ट २०१८ अखेर जिल्ह्यात २५५.१ मिलिमीटर पाऊस झाला असून गतवर्षीच्या तुलनेत २४.७ टक्के जादा पाऊस झाला आहे. तरीही खरीप अडचणीत का?, असा प्रश्न साहजिकच पडणार आहे. पण, पावसाची आकडेवारी पाहिल्यास काही तालुक्यातच धो... धो... कोसळला आहे. शिराळा तालुक्यात ८५९.८, तर आटपाडी, जत तालुक्यात १०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस तालुक्यात दोनशे मिलिमीटरपेक्षा कमीच पाऊस झाला आहे. म्हणूनच पाच तालुक्यातील खरिपाची पिके धोक्यात आहेत.

टॅग्स :DamधरणSangliसांगली