शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

नेमाडेंच्या शिफारशीमुळे चांगल्या लेखकांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:04 IST

इस्लामपूर : राज्यभरातील साहित्य संस्थांवर ताबा मिळविलेले नेमाडेंसारखे लोक पुरस्कारासाठी आपापल्या कंपूतील कवी, लेखकांची शिफारस करतात. त्यामुळे अनेकदा चांगल्या ...

इस्लामपूर : राज्यभरातील साहित्य संस्थांवर ताबा मिळविलेले नेमाडेंसारखे लोक पुरस्कारासाठी आपापल्या कंपूतील कवी, लेखकांची शिफारस करतात. त्यामुळे अनेकदा चांगल्या लेखकांवर अन्याय होतो, अशा शब्दात ज्येष्ठ कवी, समीक्षक मंगेश नारायणराव काळे यांनी नेमाडेंवर शरसंधान साधले.देशभरात अमानवी अराजकाविरुध्द गोळ्या घालण्याची आणि पुरस्कार परत करण्याची लाट आली. मात्र त्याचवेळेस नेमाडेंनी स्वत:च्या ‘हिंदू’ पुस्तकावर नरेंद्र मोदींच्याहस्ते ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार स्वीकारतानाचे छायाचित्र प्रसिध्द केले. हे कशाचे लक्षण आहे? या काळे यांच्या वक्तव्याने साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली.राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्या सभागृहात राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषदेची इस्लामपूर शाखा आणि राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्यावतीने आयोजित २६ व्या मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरुन काळे बोलत होते. प्रा. डॉ. संजय थोरात यांच्याहस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रा. शामराव पाटील, डॉ. मंगल कोकाटे, बसापचे अध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.काळे म्हणाले, व्यवस्थेला शरण गेलेल्या लेखकांची टोळी आणि वाङ्मयीन राजकारणाने मराठी साहित्याची मोठी हानी झाली आहे. लिहिणाऱ्या प्रत्येकाला आपले लेखक असण्याचे प्रयोजन माहीत असले पाहिजे. लेखक म्हणून स्वत:ची ठाम भूमिका असली पाहिजे. आजुबाजूला जे जळते, त्याची धग कवी अथवा लेखकाने आपल्या लेखनातून व्यक्त केली पाहिजे. त्यामागील पिडा, वेदना आणि प्रतिरोध त्याने उभा केला पाहिजे. तरच आपण भाषेचे नागरिक म्हणून जगण्यास पात्र ठरतो.काळे म्हणाले, आपल्याकडे अनुवाद होत नसल्याने क्षमता असूनही आपल्या लेखकांचे जगभर नाव होत नाही. साहित्य संस्थांवर ताबा ठेवत आपल्याच माणसांची वर्णी लावण्याच्या पध्दतीमुळे अरुण कोल्हटकर, बाबूराव बागुल, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, विजय तेंडूलकर, दुर्गा भागवत, जी. ए. कुलकर्णी, दि. बा. मोकाशी, नारायण सुर्वे असे किती तरी लोक ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारासाठी पात्र आहेत. पण त्यांना तो प्राप्त झाला नाही, याची खंत वाटते.डॉ. थोरात म्हणाले, ग्रामीण आणि शहरी साहित्य संमेलनात गंभीर चर्चा होते, ही मराठी साहित्यासाठी चांगली गोष्ट आहे. अशा संमेलनांमुळे वाचन संस्कृती वाढेल. त्यासाठी ही संमेलने टिकायला हवीत.डॉ. राजेंद्र माने (सातारा) यांना उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल त्यांचा, शासनाच्या भाषा सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल प्रा. वैजनाथ महाजन यांचा, शासनाचा व्यसनमुक्ती प्रचार सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्जेराव कचरे यांचा, तर समीक्षेसाठी मसापचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. विष्णू वासमकर, प्रा. बसवेश्वर स्वामी यांचा सत्कार करण्यात आला.प्रा. प्रदीप पाटील यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. सूरज चौगुले, प्रा. डॉ. दीपक स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. सर्जेराव कचरे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. भीमराव पाटील, वसंत पाटील, मनीषा पाटील, दशरथ पाटील, वृषाली आफळे, प्राचार्य डॉ. दीपा देशपांडे, शहानवाज मुल्ला, वैजयंती पेठकर, प्रा. दशरथ पाटील, प्रा. अरुण घोडके, प्रा. सुभाष खोत, प्रा. सुनील पाटील उपस्थित होते.देशमुख यांना चिमटाते म्हणाले, आपल्या भावविश्वाला जे भिडते—डाचते, ते लिहिलेच पाहिजे. पण जेव्हा भोवतालात काही विपरित घडेल, माणूसपण वेठीला धरले जाईल, तेव्हा मात्र त्याने व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे. शासकीय सेवेत असताना ज्यांनी व्यवस्थेविषयी ब्र उच्चारला नाही, ते आता सेवेतून बाहेर पडल्यानंतर राजाच्या थाटात व्यवस्थेविरुध्द बोलत आहेत, अशा शब्दात माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा नामोल्लेख टाळून काळे यांनी चिमटा काढला.