शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
4
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
5
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
6
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
7
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
8
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
9
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
10
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
11
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
12
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
13
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
14
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
15
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
16
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

द्राक्षाला मागणी वाढल्यामुळे दराचीही तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 17:42 IST

उत्तर भारतामध्येही थंडीची लाट कमी होऊ लागल्यामुळे द्राक्षाच्या दरात तेजी निर्माण झाली असून, किलोला ३० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल येथील

ठळक मुद्देकिलोला ४० ते ७० रुपये दर : केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, पश्चिम बंगालच्या व्यापाºयांची गर्दी

अशोक डोंबाळेसांगली : उत्तर भारतामध्येही थंडीची लाट कमी होऊ लागल्यामुळे द्राक्षाच्या दरात तेजी निर्माण झाली असून, किलोला ३० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल येथील व्यापारी मोठ्याप्रमाणात शेतकºयांच्या बांधापर्यंत जाऊन द्राक्षाची खरेदी करू लागला आहे. काही व्यापारी संघटितपणे द्राक्षाचे दर पाडत असल्यामुळे, त्यांचा जिल्हा प्रशासनाने बंदोबस्त करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र जवळपास एक लाख २५ हजार एकर आहे. द्राक्षे हे सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक बनले आहे. जिल्ह्याचे उसाचे उत्पन्न चार ते पाच हजार कोटी रुपये आहे, तर द्राक्षाचे उत्पन्न जवळपास सहा हजार कोटींच्या घरात गेले आहे. युरोपियन राष्ट्रांसह एकूण पंचवीसहून अधिक देशांमध्ये सांगलीची द्राक्षे निर्यात होत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेतही रेसिड्यू फ्री द्राक्षे, बेदाण्याला मागणी वाढत आहे. त्यानुसार पुरवठा करण्याची शेतकºयांनी तयारी ठेवल्यास भविष्यात निश्चित द्राक्षांच्या खपात मोठी वाढ होईल व दरही चांगला मिळेल.

जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागात उसासारखे जादा पाण्याचे पीक परवडत नाही. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात द्राक्ष पिकासाठीचे अनेक प्रयोग शेतकरी करीत असून नवीन वाण शोधून काढत आहेत. तासगाव तालुक्यातील द्राक्षबागायतदारांनी तर देशाला नवीन वाणाची ओळख करून दिली आहे. कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून द्राक्षाची गोडी वाढली. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ आदी योजनांमुळे द्राक्षाचे क्षेत्र दुष्काळी पट्ट्यात मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहेत.

मिरज तालुक्यातील आरग, बेडग, म्हैसाळ, सोनी, तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, सावळज, बोरगाव, पुणदी, वायफळे, डोंगरसोनी, खानापूर तालुक्यातील पळशी, करंजे, सुलतानगादे, हिवरे, खानापूर, विटा, पारे आणि जत, वाळवा, कवठेमहांकाळ, पलूस तालुक्यातही द्राक्षाची लागवड वाढली आहे. दुष्काळी शेतकºयांच्या जीवनात द्राक्षामुळे  गोडवा आला आहे.

जिल्ह्यात द्राक्ष हंगाम जोमात सुरु असून सुपर सोनाक्का, सोनाक्का, माणिक चमन, तास-ए-गणेश, थॉमसन या द्राक्षजातींबरोबरच कृष्णा सिडलेस, शरद सिडलेस, ज्योती सिडलेस ही काळी द्राक्षे, लाल-गुलाबी फ्लेम द्राक्षांचे देखील उत्पादन होते. द्राक्षाच्या दर्जानुसार प्रति किलो ३० ते ७० रुपये दर शेतकºयांना मिळत आहे. उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कमी होऊ लागल्यामुळे द्राक्षाच्या दरात तेजी येणार आहे. द्राक्षांची निर्यातही मोठ्याप्रमाणात वाढली आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीMONEYपैसा