शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

द्राक्षाला मागणी वाढल्यामुळे दराचीही तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 17:42 IST

उत्तर भारतामध्येही थंडीची लाट कमी होऊ लागल्यामुळे द्राक्षाच्या दरात तेजी निर्माण झाली असून, किलोला ३० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल येथील

ठळक मुद्देकिलोला ४० ते ७० रुपये दर : केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, पश्चिम बंगालच्या व्यापाºयांची गर्दी

अशोक डोंबाळेसांगली : उत्तर भारतामध्येही थंडीची लाट कमी होऊ लागल्यामुळे द्राक्षाच्या दरात तेजी निर्माण झाली असून, किलोला ३० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल येथील व्यापारी मोठ्याप्रमाणात शेतकºयांच्या बांधापर्यंत जाऊन द्राक्षाची खरेदी करू लागला आहे. काही व्यापारी संघटितपणे द्राक्षाचे दर पाडत असल्यामुळे, त्यांचा जिल्हा प्रशासनाने बंदोबस्त करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र जवळपास एक लाख २५ हजार एकर आहे. द्राक्षे हे सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक बनले आहे. जिल्ह्याचे उसाचे उत्पन्न चार ते पाच हजार कोटी रुपये आहे, तर द्राक्षाचे उत्पन्न जवळपास सहा हजार कोटींच्या घरात गेले आहे. युरोपियन राष्ट्रांसह एकूण पंचवीसहून अधिक देशांमध्ये सांगलीची द्राक्षे निर्यात होत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेतही रेसिड्यू फ्री द्राक्षे, बेदाण्याला मागणी वाढत आहे. त्यानुसार पुरवठा करण्याची शेतकºयांनी तयारी ठेवल्यास भविष्यात निश्चित द्राक्षांच्या खपात मोठी वाढ होईल व दरही चांगला मिळेल.

जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागात उसासारखे जादा पाण्याचे पीक परवडत नाही. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात द्राक्ष पिकासाठीचे अनेक प्रयोग शेतकरी करीत असून नवीन वाण शोधून काढत आहेत. तासगाव तालुक्यातील द्राक्षबागायतदारांनी तर देशाला नवीन वाणाची ओळख करून दिली आहे. कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून द्राक्षाची गोडी वाढली. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ आदी योजनांमुळे द्राक्षाचे क्षेत्र दुष्काळी पट्ट्यात मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहेत.

मिरज तालुक्यातील आरग, बेडग, म्हैसाळ, सोनी, तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, सावळज, बोरगाव, पुणदी, वायफळे, डोंगरसोनी, खानापूर तालुक्यातील पळशी, करंजे, सुलतानगादे, हिवरे, खानापूर, विटा, पारे आणि जत, वाळवा, कवठेमहांकाळ, पलूस तालुक्यातही द्राक्षाची लागवड वाढली आहे. दुष्काळी शेतकºयांच्या जीवनात द्राक्षामुळे  गोडवा आला आहे.

जिल्ह्यात द्राक्ष हंगाम जोमात सुरु असून सुपर सोनाक्का, सोनाक्का, माणिक चमन, तास-ए-गणेश, थॉमसन या द्राक्षजातींबरोबरच कृष्णा सिडलेस, शरद सिडलेस, ज्योती सिडलेस ही काळी द्राक्षे, लाल-गुलाबी फ्लेम द्राक्षांचे देखील उत्पादन होते. द्राक्षाच्या दर्जानुसार प्रति किलो ३० ते ७० रुपये दर शेतकºयांना मिळत आहे. उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कमी होऊ लागल्यामुळे द्राक्षाच्या दरात तेजी येणार आहे. द्राक्षांची निर्यातही मोठ्याप्रमाणात वाढली आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीMONEYपैसा