शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

औषधे कुचकामी; द्राक्षबागा रोगांनी निकामी : प्रभावहीन औषधांतून लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 21:38 IST

हजारो रुपये खर्च करूनही बोगस औषधे कुचकामी ठरत असल्याने द्राक्ष बागायतदारांना फटका बसला आहे. काही बोगस औषध कंपन्यांनी पाळेमुळे रोवल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे बागायतदारांना फटका

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रित करून बोगस औषधांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. खराब हवामानामुळे द्राक्षबागांत रोगांनी थैमान घातले आहे. पण बागेतील रोग आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या औषध फवारणींचा प्रभावच जाणवत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हजारो रुपये खर्च करूनही बोगस औषधे कुचकामी ठरत असल्याने द्राक्ष बागायतदारांना फटका बसला आहे. काही बोगस औषध कंपन्यांनी पाळेमुळे रोवल्याचे चित्र आहे.

तासगाव तालुक्यात द्राक्षक्षेत्र मोठे आहे. एक एकर द्राक्षबागेसाठी सुमारे एक लाख रूपये केवळ औषधांवर खर्च होतात. वाढत्या महागाईत औषधांचेही दर वाढले आहेत. द्राक्षबागांसाठी आंतरराष्टÑीय औषध कंपन्यांपासून अगदी लोकल कंपन्यांपर्यंत औषधांची निर्मिती करून विक्री केली जाते.

यंदा द्राक्ष हंगामात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोगांचा सामना करावा लागत आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांना रोगांनी घेरले आहे. द्राक्षबागा जतन करण्यासाठी शेतकºयांकडून मोठ्या जिद्दीने औषध फवारणीसाठी धडपड सुरु असते. कोणताही विचार न करता, अनेक महागडी आणि बाजारात उपलब्ध असणारी औषधे फवारणी करून बागा जतन करण्यासाठी धडपड सुरु आहे. पण बागा वाचवण्यासाठी फवारणी केलेल्या औषधांना गुणवत्ताच नसल्याने, हजारो रुपये खर्ची करूनही काही औषधांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव अनेक द्राक्ष बागायतदारांना आला आहे. त्यामुळे हजारो रुपये खर्च करूनही द्राक्षबागांना रोगांचा फटका बसतच आहे.

तासगाव तालुक्यात अनेक बोगस औषधांची राजरोसपणे विक्री सुरु आहे. काही बनावट कंपन्यांमार्फतही औषधे शेतकºयांच्या माथी मारली जात आहेत. बोगस औषधांप्रमाणेच बोगस औषध कंपन्यांचाही सुळसुळाट झाला आहे. केवळ लेबल लावून कंपनी प्रॉडक्ट असल्याचे भासवून अनेक बोगस औषधे शेतकºयांच्या माथी मारली जात आहेत.

औषधांची बोगसगिरी राजरोसपणे सुरु असताना, कृषी विभागाकडून मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. औषधांची गुणवत्ता आणि त्यांची पडताळणी न करताच औषधे खपवली जात आहेत. एकीकडे औषधासाठी खर्च आणि दुसरीकडे त्यांचा प्रभावच नसल्याने बागेचे होणारे नुकसान, अशा दुहेरी कात्रीत द्राक्ष बागायतदार सापडला असून, कृषी विभागाच्या अधिकाºयांनी याची सखोल चौकशी करून बोगस औषधांवर बंदी आणावी, अशी मागणी होत आहे. 

तासगाव तालुक्यात बोगस औषधांची विक्री करून द्राक्ष उत्पादक शेतकºयांची राजरोस लूट सुरु आहे. मात्र याबाबत तालुका कृषी विभाग गांभीर्यहीन आहे. तालुक्यात औषध विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र ऐन द्राक्ष हंगामात गुणवत्तेची पडताळणी करणारे अधिकारी तालुक्यात दिसून येत नाहीत. औषध दुकानांची तपासणी करण्याचे गरज आहे. कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून केवळ कागदी घोडे नाचवून कारभार सुरु आहे.-संतोष आठवले, सदस्य, पंचायत समिती तासगाव.

 

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी