शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा मंडळाकडून थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST

आटपाडी : राज्य शासनाने ऑक्टोबर २०१८ मध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे इयता दहावीचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. अडीच ...

आटपाडी : राज्य शासनाने ऑक्टोबर २०१८ मध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे इयता दहावीचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. अडीच वर्षे झाली तरी आटपाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांना अजून शुल्क परत मिळालेले नाही. आता पुन्हा आधारकार्ड आणि बँकेची माहिती मागवून परीक्षा मंडळाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची क्रूर चेष्टा केली आहे.

शासनाने आटपाडी तालुक्यात २०१८ मध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. त्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याऐवजी नेहमी टंचाईसदृश स्थिती जाहीर करत होते, पण तत्कालीन भाजप-शिवसेना युतीच्या शासनाने थेट दुष्काळ असा शब्द वापरून आदेश काढला होता. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाची तूट, भूजलाची कमतरता, वनस्पती निर्देशांक, मृदु आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पीक परिस्थिती या सर्वांचा एकत्रित विचार करून आटपाडी तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. शासनाने दि. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी राज्यातील दुष्काळी तालुक्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यात आटपाडी तालुक्याचा समावेश होता. शासनाने त्यावेळी निर्णय घेतला की, दुष्काळ घोषित केल्याचा आदेश दि. ३१ ऑक्टोबर२०१८ पासून अंमलात येतील. शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ केली जाईल. आणखीही काही सवलती त्यावेळी जाहीर केल्या होत्या. परीक्षा शुल्कात माफी हा आदेशातील पाचवा मुद्दा होता. आजअखेर तालुक्यातील एकाही विद्यार्थ्याला पैसे परत मिळालेले नाहीत. आता ते सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेच्या घोळात सापडले आहेत. त्यात शाळा दूरध्वनीवरून त्यांना दहावीच्या परीक्षेच्या शुल्क माफीसाठी माहिती देण्यासाठी संपर्क साधत आहेत.

चौकट

दुष्काळी भागाला १५ लाखांचा गंडा !

शासनाने शुल्कमाफीचा आदेश दि. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी काढला. त्यानंतर दि. ६ नोव्हेंबरपासून इयता दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यात आले. प्रत्येकी ३२५ रुपये असे तालुक्यातील ४५३२ विद्यार्थ्यांनी एकूण १४ लाख ७२ हजार ९०० रुपये नुसती परीक्षा मंडळाला फी भरली. अर्थात शाळांनी अजून झेरॉक्स आणि इतर खर्चाच्या नावाखाली १०० ते२०० रुपये प्रत्येक पालकांकडून उकळले. शासन निर्णयानंतर शुल्क घेण्याची गरजच नव्हती. त्यावेळी एकदा घेऊन आता पुन्हा सध्या शाळा विद्यार्थी किंवा पालकांचे आधारकार्ड आणि बँकेचा तपशील फी परत देण्यासाठी मागत आहे.

कोट

परीक्षा मंडळाने शाळा व्यवस्थापनाला विद्यार्थी किंवा पालकाचे आधारकार्ड आणि बँक खात्याच्या माहितीचा तपशील ऑनलाईन भरण्यास सांगितले आहे. लवकरच थेट त्यांच्या बँक खात्यात परीक्षा शुल्काची रक्कम जमा होईल.

-दतात्रय मोरे, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, आटपाडी.