शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा मंडळाकडून थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST

आटपाडी : राज्य शासनाने ऑक्टोबर २०१८ मध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे इयता दहावीचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. अडीच ...

आटपाडी : राज्य शासनाने ऑक्टोबर २०१८ मध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे इयता दहावीचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. अडीच वर्षे झाली तरी आटपाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांना अजून शुल्क परत मिळालेले नाही. आता पुन्हा आधारकार्ड आणि बँकेची माहिती मागवून परीक्षा मंडळाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची क्रूर चेष्टा केली आहे.

शासनाने आटपाडी तालुक्यात २०१८ मध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. त्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याऐवजी नेहमी टंचाईसदृश स्थिती जाहीर करत होते, पण तत्कालीन भाजप-शिवसेना युतीच्या शासनाने थेट दुष्काळ असा शब्द वापरून आदेश काढला होता. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाची तूट, भूजलाची कमतरता, वनस्पती निर्देशांक, मृदु आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पीक परिस्थिती या सर्वांचा एकत्रित विचार करून आटपाडी तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. शासनाने दि. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी राज्यातील दुष्काळी तालुक्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यात आटपाडी तालुक्याचा समावेश होता. शासनाने त्यावेळी निर्णय घेतला की, दुष्काळ घोषित केल्याचा आदेश दि. ३१ ऑक्टोबर२०१८ पासून अंमलात येतील. शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ केली जाईल. आणखीही काही सवलती त्यावेळी जाहीर केल्या होत्या. परीक्षा शुल्कात माफी हा आदेशातील पाचवा मुद्दा होता. आजअखेर तालुक्यातील एकाही विद्यार्थ्याला पैसे परत मिळालेले नाहीत. आता ते सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेच्या घोळात सापडले आहेत. त्यात शाळा दूरध्वनीवरून त्यांना दहावीच्या परीक्षेच्या शुल्क माफीसाठी माहिती देण्यासाठी संपर्क साधत आहेत.

चौकट

दुष्काळी भागाला १५ लाखांचा गंडा !

शासनाने शुल्कमाफीचा आदेश दि. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी काढला. त्यानंतर दि. ६ नोव्हेंबरपासून इयता दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यात आले. प्रत्येकी ३२५ रुपये असे तालुक्यातील ४५३२ विद्यार्थ्यांनी एकूण १४ लाख ७२ हजार ९०० रुपये नुसती परीक्षा मंडळाला फी भरली. अर्थात शाळांनी अजून झेरॉक्स आणि इतर खर्चाच्या नावाखाली १०० ते२०० रुपये प्रत्येक पालकांकडून उकळले. शासन निर्णयानंतर शुल्क घेण्याची गरजच नव्हती. त्यावेळी एकदा घेऊन आता पुन्हा सध्या शाळा विद्यार्थी किंवा पालकांचे आधारकार्ड आणि बँकेचा तपशील फी परत देण्यासाठी मागत आहे.

कोट

परीक्षा मंडळाने शाळा व्यवस्थापनाला विद्यार्थी किंवा पालकाचे आधारकार्ड आणि बँक खात्याच्या माहितीचा तपशील ऑनलाईन भरण्यास सांगितले आहे. लवकरच थेट त्यांच्या बँक खात्यात परीक्षा शुल्काची रक्कम जमा होईल.

-दतात्रय मोरे, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, आटपाडी.