शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शिक्षकांच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढू : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:16 IST

इस्लामपूर (जि. सांगली ) : राज्यातील शासकीय शाळांना सरकार पायाभूत सुविधा देत आहेत. येत्या राज्याच्या अंदाजपत्रकात शिक्षक परिषदेच्या काही ...

इस्लामपूर (जि.सांगली) : राज्यातील शासकीय शाळांना सरकार पायाभूत सुविधा देत आहेत. येत्या राज्याच्या अंदाजपत्रकात शिक्षक परिषदेच्या काही मागण्यांना निधी उपलब्ध करून दिला जाईल. अधिवेशनानंतर मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व अर्थमंत्र्यांसमवेत व्यापक बैठक घेऊन शिक्षकांच्या प्रश्नांवर योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.इस्लामपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि विविध संघटनांच्यावतीने ‘मातृभाषिक नि:शुल्क शिक्षण वाचवा’ ही राज्यव्यापी जनपरिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. या जनपरिषदेत ११ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.चंद्रकांत पाटील म्हणाले, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांची शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीची धडपड कौतुकास्पद आहे.आघाडी सरकारच्या काळात आम्ही दोघांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. यापुढील काळातही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आम्ही कार्यरत राहू.या जनपरिषदेचे मुख्य संयोजक भगवानराव साळुंखे म्हणाले, मातृभाषिक नि:शुल्क शिक्षण प्रणाली सक्षम झाली पाहिजे, यासाठी ही जनपरिषद घेत आहोत. शैक्षणिक संस्था व शाळांना मंजुरी देण्याचे यापूर्वीचे सर्व निकष डावलून आता राज्यात शाळांचा चातुर्वण्य निर्माण झाला आहे. शिक्षण क्षेत्रात व्यापार करून नफा कमावणारी वृत्ती शिरली असून, त्याला शासनाचे धोरण कारणीभूत आहे. मराठी माध्यमाच्या शाळा वाचविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांची पाठ...!या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पाठ फिरवल्यामुळे शिक्षकांची घोर निराशा झाली. सकाळची बोचरी थंडी आणि त्यानंतरच्या भर उन्हात शिक्षक बसले होते. या परिषदेलाही शिक्षकांची उपस्थिती जेमतेमच राहिली.