शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. जयसिंगराव पवार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या; जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य अधिवेशनात ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 13:36 IST

जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य अधिवेशन सहा ठराव, महिलांचे चारित्र्यहनन करणाऱ्या टीव्ही मालिका ताबडतोब बंद कराव्यात

सांगली : ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, महिलांचे चारित्र्यहनन करणाऱ्या आणि कुटुंबातील वातावरण बिघडविणाऱ्या टीव्ही मालिका ताबडतोब बंद कराव्यात, असे सहा प्रमुख ठराव जिजाऊ ब्रिगेडच्या ७व्या राज्य अधिवेशनात मंजूर करण्यात आले.

हरीपूर (ता. मिरज) येथे जिजाऊ ब्रिगेडच्या ७व्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वंशज आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अश्विनीताई घोरपडे यांच्या हस्ते झाले. या वेळी स्वप्नाली विश्वजित कदम, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय घोगरे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शैलजा पाटील, विजया पृथ्वीराज पाटील, हरीपूरच्या सरपंच राजश्री तांबवेकर, प्रियांकादेवी घोरपडे, डॉ. संजय पाटील यांची उपस्थिती होती.

या अधिवेशनातील ठराव

  • ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा.
  • पाचाड येथे जिजाऊंचे भव्य स्मारक व ऐतिहासिक घटनांच्या कलादालनासाठी शासनाने ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी.
  • महिलांसाठी प्रत्येक तालुक्यात मोफत कायदेविषयक सल्ला व उद्योग मार्गदर्शन केंद्र सुरू करावे.
  • विधवांची आभूषणे न काढता योग्य सन्मानासाठी शासनाने निर्णय घ्यावा. प्रत्येक गावात कार्यवाहीसाठी ग्रामपंचायतींना निर्देश द्यावेत.
  • प्रत्येक जिल्ह्यात १०० कोटी रुपयांचे राष्ट्रमाता जिजाऊ सभागृह उभारावे.
  • महिलांचे चारित्र्यहनन करणाऱ्या आणि कुटुंबातील वातावरण बिघडविणाऱ्या टीव्ही मालिका ताबडतोब बंद कराव्यात.

मालिका पाहून कुटुंबात बिघाड नकोडॉ. अश्विनी घोरपडे म्हणाल्या, टीव्हीवरील मालिकांमध्ये कौटुंबिक कारस्थानांचा भडिमार केला जातो. भारतीय कुटुंबांमध्ये फक्त कारस्थानेच चालतात का, असा प्रश्न पडतो. टीव्हीवरील मालिका पाहून कुटुंबात बिघाड होऊ नये. जिजाऊंच्या काळात टीव्ही नसतानाही त्यांनी स्वराज्याच्या उभारणीत प्रभावी भूमिका बजावली.

वाढदिवसाला केक कशासाठी?डॉ. घोरपडे म्हणाल्या, वाढदिवसाला केक कापणे, मेणबत्त्या लावणे, रिटर्न गिफ्टची अपेक्षा करणे ही आपली संस्कृती नाही. इंग्रज साहेबाची संस्कृती त्याच्याबरोबरच गेली. आता आपली संस्कृती टिकवली पाहिजे.

टॅग्स :Sangliसांगली