शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

डझनभर भंगार टीव्ही, १०० हून अधिक मोबाईल आणि बरेच काही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST

सांगलीत स्वातंत्र्यदिनी राबविलेल्या मोहिमेत साडेसहा टन ई-कचरा संकलित झाला. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत विविध ...

सांगलीत स्वातंत्र्यदिनी राबविलेल्या मोहिमेत साडेसहा टन ई-कचरा संकलित झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत विविध स्वयंसेवी संस्थांनी स्वातंत्र्यदिनी राबविलेल्या मोहिमेत तब्बल साडेसहा टन ई कचरा संकलित झाला. सुमारे डझनभर भंगार टीव्ही, १०० हून अधिक बंद मोबाईल संच यासह वायर, संगणक मॉनिटर्स, सीपीयू, विजेची बंद उपकरणे असा नानातऱ्हेचा इलेक्ट्रॉनिक व विद्युत कचरा कार्यकर्त्यांनी गोळा केला.

सांगलीत पाच टन, इचलकरंजीत साडेचारशे किलो, तासगाव, इस्लामपूर, पलूसमध्ये १२०० किलो ई-कचरा गोळा झाला. ४४ केंद्रांवर संकलन झाले. हा ई-कचरा १६ घंटागाड्यांमधून जमा करण्यात आला. प्रत्येक व्यक्तीने दिलेल्या ई-कचऱ्याची नोंद करण्यात आली. दीड हजार लोकांनी टाकाऊ साहित्य दिले. तसे प्रमाणपत्रही त्यांना देण्यात आले.

जीवन विद्या मिशन, रॉबिनहूड आर्मी, निसर्ग संवाद, आभाळमाया, नेचर काॅन्झर्व्हेशन सोसायटी आदी संस्थांनी उपक्रम राबवला. प्रमोद चौगुले, डॉ. मनोज पाटील, प्रशांत मजलेकर, डॉ. दिलीप पटवर्धन, राजेंद्र जोशी आदींच्या मार्गदर्शनाखाली रोहन कोठारी, सौरभ मराठे, प्रदीप कुलकर्णी, प्रा. डॉ. शर्वरी सोलापुरे, प्रणिता हेरवाडे, डॉ. भाग्यश्री वाटवे, हिमांशू लेले, श्रीपाद कुलकर्णी, सुधीर गोरे, शैलेश पाटील, डॉ. अनिल जाधव, डॉ. ऋतुराज पाटील, अमित कुंभार, राजेश व्यास, दिलीप जोगळेकर, शंतनू जोगळेकर, विलास भिसे, आशिष किंकर, महेश सुतार आदींनी उपक्रमात भाग घेतला.

चौकट

हे झाले गोळा

रेडिओ, टेप, स्पीकर, माईक, लॅण्डलाईन दूरध्वनी, मोबाईल, सेट टॉप बॉक्स, सीडी, डीव्हीडी, कॅसेट टेप, पेन ड्राईव्ह, हार्डडिस्क, संगणक, शोभेच्या वस्तू, खेळणी, हेअर ड्रायर, शेविंग मशीन, डिजिटल घड्याळे, कॅल्क्युलेटर, दिव्यांच्या माळा, आयपॉड, चार्जर, एलईडी दिवे, वजनकाटे, कॅमेरा, इस्त्री, प्रिंटर, एअर प्युरिफायर, म्युझिक सिस्टीम अशा नाना तऱ्हेच्या वस्तू गोळा झाल्या.

चौकट

जमा केलेल्या ई-कचऱ्याचे काय होणार?

सुस्थितीतील साहित्य गरजू विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. दुरुस्ती शक्य असलेले साहित्य दिव्यांगांकडे दुरुस्तीसाठी दिले जाईल. पूर्णत: निरुपयोगी साहित्य शास्त्रीय पद्धतीने नष्ट केले जाणार आहे. हे सर्व काम पूर्णम इकोविजन फाऊंडेशन या अनुभवी संस्थेमार्फत होईल. भविष्यात पूर्णमच्या मार्गदर्शनाखाली अशा मोहिमा पुन्हा राबविल्या जाणार आहेत.