शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

मुलांना काहीच जमत नाही म्हणून मिलिटरीत घालू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:28 IST

सांगलीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठात रणगाडा लोकार्पण सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सनतकुमार आरवाडे, निवृत्त ब्रिगेडियर सुरेश पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष ...

सांगलीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठात रणगाडा लोकार्पण सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सनतकुमार आरवाडे, निवृत्त ब्रिगेडियर सुरेश पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, संचालक गौतम पाटील आदी उपस्थित होते.

छायाचित्र : सुरेंद्र दुपटे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मुलांना काहीच जमत नाही मिलिटरीत घालायचे, ही मानसिकता बदलायला हवी. महाराष्ट्रात एनडीए आहे. पण एनडीएमध्ये महाराष्ट्र कुठं आहे? याचा विचार करावा लागेल. मराठी मुलांनी सैन्याधिकारी होण्याची संधी साधली पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडियर सुरेश पाटील यांनी केले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठात रणगाडा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटील, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपत पाटील, निवृत्त ब्रिगेडियर सुरेश पाटील, संचालक गौतम पाटील आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले की, पालकांनी मुलांना हा रणगाडा दाखवायला हवा. शौर्यगाथाही सांगावी. त्याच्या प्रेरणेने मुले लष्करात जाऊन देशसेवा करतील. सुरेश पाटील यांनी रणगाड्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, १९७१ च्या भारत- पाकीस्तान युद्धात पश्चिम सीमेवर रणगाड्याने पराक्रम गाजवला होता. ३६ इन्फन्ट्री डिव्हिजनच्या प्रतापराव शिंदे यांच्या हॉर्स युनिटने ८ डिसेंबर १९७१ रोजी सक्करगढच्या बाजूने चढाई केली. १० डिसेंबर रोजी शत्रूचे आठ रणगाडे नष्ट केले. या युद्धात शिंदे हॉर्सला एक महावीर चक्र, दोन वीर चक्र, एक सेना मेडल आणि चार मेन्शन इन डिसपॅचेसनी सन्मानित केले होते. शांतीनिकेतनमध्ये रणसामग्रीचे स्मृतिस्थल तयार करण्याचा मानस आहे.

स्वागत संस्थेचे संचालक गौतम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन महेश पाटील यांनी केले, तर आभार अशोक सावंत यांनी मानले. या वेळी सनतकुमार आरवाडे, विनया घोरपडे, ॲड. सतीश पाटील, उपसंचालक बी. आर. थोरात, डी. एस. माने, प्रशासकीय अधिकारी एम. के. आंबोळे आदी उपस्थित होते.

चौकट

पराक्रमी रणगाडा पाहण्याची संधी

हा टी-५५ बॅटल टॅंक रणगाडा १९६६ मध्ये सैन्यात दाखल झाला होता. निवृत्तीनंतर शांतिनिकेतनमध्ये सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ठेवला आहे. जरंडी (ता. तासगाव) येथील प्रतापराव शिंदे यांनी हा रणगाडा चालवला होता. रणगाडा सांगलीत आल्याचे समजले, तेव्हा त्यांनी मेरा साथी आ गया असे म्हणत गावभर साखर वाटली.