शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

मुलांना काहीच जमत नाही म्हणून मिलिटरीत घालू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:28 IST

सांगलीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठात रणगाडा लोकार्पण सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सनतकुमार आरवाडे, निवृत्त ब्रिगेडियर सुरेश पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष ...

सांगलीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठात रणगाडा लोकार्पण सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सनतकुमार आरवाडे, निवृत्त ब्रिगेडियर सुरेश पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, संचालक गौतम पाटील आदी उपस्थित होते.

छायाचित्र : सुरेंद्र दुपटे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मुलांना काहीच जमत नाही मिलिटरीत घालायचे, ही मानसिकता बदलायला हवी. महाराष्ट्रात एनडीए आहे. पण एनडीएमध्ये महाराष्ट्र कुठं आहे? याचा विचार करावा लागेल. मराठी मुलांनी सैन्याधिकारी होण्याची संधी साधली पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडियर सुरेश पाटील यांनी केले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठात रणगाडा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटील, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपत पाटील, निवृत्त ब्रिगेडियर सुरेश पाटील, संचालक गौतम पाटील आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले की, पालकांनी मुलांना हा रणगाडा दाखवायला हवा. शौर्यगाथाही सांगावी. त्याच्या प्रेरणेने मुले लष्करात जाऊन देशसेवा करतील. सुरेश पाटील यांनी रणगाड्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, १९७१ च्या भारत- पाकीस्तान युद्धात पश्चिम सीमेवर रणगाड्याने पराक्रम गाजवला होता. ३६ इन्फन्ट्री डिव्हिजनच्या प्रतापराव शिंदे यांच्या हॉर्स युनिटने ८ डिसेंबर १९७१ रोजी सक्करगढच्या बाजूने चढाई केली. १० डिसेंबर रोजी शत्रूचे आठ रणगाडे नष्ट केले. या युद्धात शिंदे हॉर्सला एक महावीर चक्र, दोन वीर चक्र, एक सेना मेडल आणि चार मेन्शन इन डिसपॅचेसनी सन्मानित केले होते. शांतीनिकेतनमध्ये रणसामग्रीचे स्मृतिस्थल तयार करण्याचा मानस आहे.

स्वागत संस्थेचे संचालक गौतम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन महेश पाटील यांनी केले, तर आभार अशोक सावंत यांनी मानले. या वेळी सनतकुमार आरवाडे, विनया घोरपडे, ॲड. सतीश पाटील, उपसंचालक बी. आर. थोरात, डी. एस. माने, प्रशासकीय अधिकारी एम. के. आंबोळे आदी उपस्थित होते.

चौकट

पराक्रमी रणगाडा पाहण्याची संधी

हा टी-५५ बॅटल टॅंक रणगाडा १९६६ मध्ये सैन्यात दाखल झाला होता. निवृत्तीनंतर शांतिनिकेतनमध्ये सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ठेवला आहे. जरंडी (ता. तासगाव) येथील प्रतापराव शिंदे यांनी हा रणगाडा चालवला होता. रणगाडा सांगलीत आल्याचे समजले, तेव्हा त्यांनी मेरा साथी आ गया असे म्हणत गावभर साखर वाटली.