शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पश्चिम महाराष्ट्र सूतगिरणीमुक्त करायचा आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली. तसे या सरकारला पश्चिम महाराष्ट्र सूतगिरणीमुक्त करावयाचा आहे का? असा थेट सवाल करीत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सूतगिरण्या मोडीत काढण्याचा डाव आहे, असा आरोप केला. याचवेळी त्यांनी राज्यातील सूतगिरणी व्यवसाय ...

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली. तसे या सरकारला पश्चिम महाराष्ट्र सूतगिरणीमुक्त करावयाचा आहे का? असा थेट सवाल करीत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सूतगिरण्या मोडीत काढण्याचा डाव आहे, असा आरोप केला. याचवेळी त्यांनी राज्यातील सूतगिरणी व्यवसाय कर्जमुक्त करा, अशी मागणीही केली.येथील दीनदयाळ मागासवर्गीय सूतगिरणीची २२ वी वार्षिक सभा सूतगिरणीच्या कार्यस्थळावर झाली. यावेळी डांगे यांनी मार्गदर्शन केले. सूतगिरणीचे अध्यक्ष बाळासाहेब खैरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार रामहरी रुपनवर, निती आयोगाच्या कृषी विभागाचे सदस्य रघुनाथदादा पाटील, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रघुनाथदादा पाटील, भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयकपदी निवड झालेले मकरंद देशपांडे यांच्यासह सूतगिरणीचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.अण्णासाहेब डांगे म्हणाले, भारतीय जनता पक्षामध्ये ३५ वर्षे काम केले. १५ वर्षांपूर्वी पक्ष सोडला. त्यानंतर आजअखेर एक शब्दही भाजपविषयी बोललो नव्हतो; मात्र आता अन्यायाची परिसीमा झाल्याने बोलणे भाग पडले. सूतगिरण्या बंद पडल्या, तर लाखो मजूर देशोधडीला लागतील. सरकारने वस्त्रोद्योगापुढे गांभीर्याने पाहावे. वस्त्रोद्योग मोठ्या संकटातून जात आहे. पुढच्या वर्षीची वार्षिक सभा होईल की नाही, हे सांगता येत नाही. १०० टक्के निर्यात करणाºया गिरण्यांकडून कोट्यवधीचे परकीय चलन देशाला मिळते. मात्र हा व्यवसायच बंद करण्याची मानसिकता दिसून येत आहे.ते म्हणाले, विदर्भात ४ रुपये ५० पैसे प्रति युनिट वीजदर आहे; तर पश्चिम महाराष्ट्रात हाच दर ८ रुपये प्रति युनिट इतका आहे. एक किलो सुताची निर्मिती करताना २७ रुपयांचा तोटा सोसावा लागतो. कापूस महामंडळ मोडून दलालांच्या ताब्यात कापूस खरेदी-विक्रीचे अधिकार एकवटले आहेत. त्यामुळे हे सरकार गरिबांचे, शेतकºयांचे आहे का? भांडवलदारांचे आहे? हा प्रश्न आहे. हे सरकार भांडवलदारांची पूजा करत आहे. वीजदराच्या तफावतीमुळे या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र टिकणार नाही. आम्ही जिंदाल कंपनीकडून वीज घेतली तर, सरकारने त्यावर ३ टक्के कर लावला.आमदार रामहरी रुपनवर म्हणाले, व्यवसाय तोट्यात असतानाही दीनदयाळने नफा मिळवून सभासदांचे हित जोपासले आहे. वस्त्रोद्योगाबाबत सरकारची धोरणे अत्यंत चुकीची आहेत. सूतगिरण्यांच्या वीज दराबाबत नागपूर अधिवेशनात चर्चा घडवून आणणार आहे. सूतगिरणीचे अध्यक्ष बाळासाहेब खैरे यांनी अहवाल सालात सूतगिरणीला २ कोटी ५५ लाख रुपयांचा रोकड नफा झाल्याची माहिती दिली. वस्त्रोद्योगाबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी. यावेळी रघुनाथदादा पाटील, निशिकांत भोसले-पाटील, भगवानराव साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गुणवंत कामगारांचा रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.संचालक मकरंद देशपांडे यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक अ‍ॅड. राजेंद्र डांगे यांनी नोटीस वाचन केले. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. राजकुमार पाटील यांनी आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, जि. प. सदस्य संभाजी कचरे, नगरसेवक वैभव पवार, शहाजी पाटील, माणिकराव गायकवाड, मंगल शिंगण, अशोक देसाई, एल. आर. पाटील, संचालक सुमंत महाजन, माणिक गोतपागर, प्रशांत कांबळे, मंगल पवार, एम. एन. कांबळे, अमोल चौधरी, संजय देवकुळे, अधिकारी, सभासद उपस्थित होते.हुतात्मा संकुलाचे अभिनंदनअण्णासाहेब डांगे यांनी राज्यातील सहकार क्षेत्राच्या पिछेहाटीबद्दल बोलतानाच गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३३५० रुपयांचा दर देणाºया हुतात्मा साखर कारखान्याचे अभिनंदन केले. इथेनॉल प्रकल्प उभारण्यापूर्वीच त्यांनी शासनाचे भागभांडवल परत करण्याचा विक्रम केला आहे. एकप्रकारे ही सहकारातील आर्थिक क्रांती आहे. नागनाथअण्णांचे वारसदार चांगल्या पध्दतीने काम करत आहेत, असे गौरवोद्गार डांगे यांनी काढले.