शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब बागांतील रोगाचे सर्वेक्षण करणार

By admin | Updated: August 26, 2014 22:53 IST

शिरीष जमदाडे : जत तालुक्यातील बागांची पाहणी

सांगली : जिल्ह्यातील डाळिंब बागांमधील कीड नियंत्रणात आणण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने तेथील बागांचे सर्वेक्षण, संशोधन करण्यास मंजुरी दिली आहे. सात हजार ४०० हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब बागांचे १ सप्टेंबरपासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, कीडरोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्पामध्ये अन्य पिकांचा समावेश होता. डाळिंब बागांचा यामध्ये समावेश नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला होता. डाळिंब बागांवरील कीड रोगाचेही सर्वेक्षण झाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. म्हणूनच केंद्र आणि राज्य शासनाने यावर्षापासून कीडरोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्पात डाळिंब बागांचा समावेश केला आहे. १ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सात हजार ४०० हेक्टरवरील डाळिंब बागातील कीडरोगाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. येत्या चार दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात सर्वेक्षण होणार आहे. यातून डाळिंब बागांमध्ये कोणत्याप्रकारे किती क्षेत्रावर किडीचा फैलाव झाला आहे, याचा अंदाज येणार आहे. डाळिंब बागातील कीड रोगाच्या संशोधनाचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल, असे जमदाडे यांनी सांगितले. दरम्यान, जत तालुक्यातील डाळिंब बागांवर तेल्याचा फैलाव असल्यामुळे तेथे संशोधकांना पाठवून अहवाल देण्याची सूचना दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बागांची पाहणी केवळ औपचारिकताजत तालुक्यातील व्हसपेठ, माडग्याळ, गुड्डापूर, दरीबडची, जालिहाळ, सिध्दनाथ आदी परिसरातील शंभर ते दीडशे एकर बागांवर तेल्या (बिब्ब्या) रोगाचा फैलाव वाढला आहे. म्हणून डाळिंब बागांना कृषी विभाग अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी करण्याची औपचारिकता पार पाडली आहे. डाळिंब बागांवर कोणते कीटकनाशक फवारल्यास रोग नियंत्रणात येईल, याविषयी मार्गदर्शन झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. कृषी विभागाच्या गलथान कारभाराबद्दल शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.