शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पाऊस येईपर्यंत गावांची वीज तोडू नका-: शिवाजीराव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 12:36 AM

शिराळा : पाऊस पडून पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत वीज वितरण कंपनीने कोणत्याही गावाच्या पिण्याच्या पाण्याचे वीज कनेक्शन ...

ठळक मुद्देशिराळा येथे ऊर्जामित्र बैठकीत महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

शिराळा : पाऊस पडून पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत वीज वितरण कंपनीने कोणत्याही गावाच्या पिण्याच्या पाण्याचे वीज कनेक्शन बंद करू नये, अशी सूचना आ. शिवाजीराव नाईक यांनी येथील तहसील कार्यालयात ऊर्जामित्र बैठकीत अधिकाऱ्यांना दिली.

आ. नाईक म्हणाले, सध्या तीव्र उन्हाळा आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाºयांनी क ोणत्याही परिस्थितीत गावाच्या पाण्याचे वीज कनेक्शन बंद करू नये. शासनाने सौरऊर्जेवर पाणी पंप वापरावेत असे सांगितले असले तरी, नदीकाठच्या शेतकºयांना याबाबत सक्ती करु नये. नदीकाठाला पावसाळ्यात नदीचे पाणी पात्राबाहेर येते. काहीवेळा पूरपरिस्थिती उद्भवते. त्यामुळे सौरऊर्जा युनिट बसविणे शेतकºयांना अडचणीचे व नुकसानकारक आहे. या बाबींची दखल घेऊन नदीकाठी शिथिलता द्यावी.

यावेळी कार्यकारी अभियंता रजनीकांत साखरे, उपअभियंता पी. एम. बुचडे, सुखदेव पाटील, रणजितसिंह नाईक, विजय पाटील, सागर पाटील, उपकार्यकारी अभियंता आर. बी. सूर्यवंशी, आर. बी. कसबे, ए. आर. कोरे, आर. एम. शेळके, पी. के. भिलवडे, अमर पाटील, आर. वाय. माने, धीरज वाघ, एम. एच. रसाळ, नगरसेवक बंडा डांगे, सौ. सीमा कदम उपस्थित होते.अडचणी सोडविल्या...वीज बिल, पाणी उपसा पंप, कनेक्शन व इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक आणि इतर शेकडो वीज ग्राहकांच्या अडचणी या बैठकीत सोडविण्यात आल्या.शिराळा येथील ऊर्जामित्र बैठकीत आमदार शिवाजीराव नाईक यांनी वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक केली.

टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरण