शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही-विश्वजित कदम यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 11:57 IST

सांगली जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादामुळेच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. कृषी व सहकार अशा ग्रामीण भागाशी संबंधित खात्याचा कारभार माझ्याकडे आहे. शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करणार आहोत. विकासासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाहीराज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची ग्वाही

सांगली : जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादामुळेच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. कृषी व सहकार अशा ग्रामीण भागाशी संबंधित खात्याचा कारभार माझ्याकडे आहे. शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करणार आहोत. विकासासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.सांगलीत सर्वपक्षीयांच्यावतीने कदम यांचा नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी स्टेशन चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, चंद्रकांत कोरे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार झाला.

यावेळी आमदार विक्रम सावंत, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, शिवसेनेचे रावसाहेब घेवारे, बजरंग पाटील, शेकापचे अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, युवकचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, नगरसेवक अभिजित भोसले, वर्षा निंबाळकर, मनोज सरगर उपस्थित होते.कदम म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांच्यावर जिल्ह्यासह सांगली शहरानेही प्रेम केले. आर. आर. पाटील, मदनभाऊ व पतंगराव कदम यांच्या निधनाने जिल्ह्याला धक्का बसला. पतंगरावांच्या नंतर पलूस कडेगावची जबाबदारी माझ्यावर आली. तेथील जनतेला विश्वास देण्यासाठी अहोरात्र काम केले.

जनतेच्या पुण्याईमुळेच पहिल्यांदा बिनविरोध आमदार होण्याचे भाग्य मला मिळाले. यंदाच्या निवडणुकीनंतर सत्तेत येणार नाही, विरोधी बाकावर बसून जनतेचे प्रश्न आक्रमकपणे सोडविण्याचे मनात ठरविले होते. पण दिवाळीनंतर गणितेच बदलली आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रिपदाची संधीही मिळाली.

राजकारणात संयम ठेवावा लागतो. १९९८ पासून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर सातत्याने संघर्ष केला. पुणे लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतरही खचलो नाही. युवकचा प्रदेशाध्यक्ष म्हणून अविरत काम केले. त्यासाठी मदनभाऊंनी मोठी मदत केली.

आता ग्रामीण जनतेशी संबंधित कृषी सहकार खाते माझ्याकडे आहे. सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पहिला निर्णय झाला. सांगलीचेही काही प्रश्न आहेत. शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करू. 

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमSangliसांगली