शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
3
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
4
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
5
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
6
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
8
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
9
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
10
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
11
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
12
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
14
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
15
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
16
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
17
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
18
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
19
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
20
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल

सांगली जिल्हा आठ महिने आपत्तीच्या फेऱ्यातच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 20:41 IST

लगेचच अवकाळीने थैमान घालण्यास सुरुवात केली व त्यात द्राक्ष, डाळिंब, भाजीपाल्यासह इतर ५५ हजार १३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पिके अक्षरश: कुजू लागली आहेत. तरीही पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील अनेक भागात पिके अक्षरश: कुजू लागली आहेत. तरीही पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत.

शरद जाधव ।सांगली : कधी पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य, कधी महापुराचा प्रलय, तर कधी परतीच्या मान्सूनचा फटका आणि अजूनही जिल्ह्यावर घोंघावत असलेला अवकाळी पावसाचा तडाखा अशा नैसर्गिक आपत्तीच्या फेºयात जिल्हा पुरता अडकला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून जिल्ह्यातील आपत्ती कायम असल्याने प्रशासनालाही कसोटीला सामोेरे जावे लागत आहे.

एकापाठोपाठ एक येत असलेल्या आपत्तीमुळे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान तर झाले आहेच शिवाय जनजीवनही विस्कळीत झाले आहे.जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाण्याची तीव्र टंचाई भासत असते. अशा स्थितीत पुढील सहा महिने पाणी नियोजनाचे दिव्य जनतेपुढे असते. यंदाही जिल्ह्यात फेब्रुवारीदरम्यान सुरू झालेले पाण्याचे टॅँकर जुलै महिन्यापर्यंत चालूच होते. जत, आटपाडी, कवठेमहांकाळसह अन्य भागात एकावेळी ३२० हून अधिक टॅँकर चालू होते, तर पाणी टंचाईमुळे ४ लाख ८० हजारहून अधिक जनता बाधित झाली होती.

निर्धारित वेळेत जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होईल, हा अंदाज यंदाही फोल ठरल्याने जुलै मध्यापर्यंत काही भागात टॅँकर सुरूच होते. पाणीटंचाईचे नियोजन करून थोडी उसंत मिळत असतानाच, आॅगस्ट महिन्याची सुरुवातच सांगलीकरांना महापुराच्या कटू अनुभवाने झाली. सुरुवातीला २००५ ची पातळीही गाठणार नाही, अशा वाटणाºया पुराने ५७ फुटांपर्यंत मजल मारत सांगली शहरासह जिल्ह्यातील १०४ गावांचे होत्याचे नव्हते करून टाकले. महापुराने ५५ हजारांवर हेक्टरवरील शेती

जमीनदोस्त झाली, तर १५ हजार ५२९ व्यापाऱ्यांच्या व्यावसायिक आस्थापनांचे नुकसान झाले. महापुरामुळे ८८ हजार ६०० कुटुंबे बाधित झाली असून, अद्यापही त्यातील बहुतांशजणांचे दैनंदिन जीवन बाधित आहे.

महापुराच्या कटू आठवणीतून जिल्हा सावरत असतानाच जिल्ह्यात परतीच्या मान्सूनने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या सर्वदूर झालेल्या या पावसाने शेतीसह घरे, जनावरे, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. सलग आठ महिन्यांपासून आपत्ती झेलत असलेल्या जिल्ह्यातून परतीच्या मान्सूनने ह्यएक्झीटह्ण घेतली असली तरी, त्यानंतर लगेचच अवकाळीने थैमान घालण्यास सुरुवात केली व त्यात द्राक्ष, डाळिंब, भाजीपाल्यासह इतर ५५ हजार १३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पिके अक्षरश: कुजू लागली आहेत. तरीही पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत.

टॅग्स :SangliसांगलीfloodपूरGovernmentसरकार