शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

सांगली जिल्हा आठ महिने आपत्तीच्या फेऱ्यातच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 20:41 IST

लगेचच अवकाळीने थैमान घालण्यास सुरुवात केली व त्यात द्राक्ष, डाळिंब, भाजीपाल्यासह इतर ५५ हजार १३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पिके अक्षरश: कुजू लागली आहेत. तरीही पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील अनेक भागात पिके अक्षरश: कुजू लागली आहेत. तरीही पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत.

शरद जाधव ।सांगली : कधी पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य, कधी महापुराचा प्रलय, तर कधी परतीच्या मान्सूनचा फटका आणि अजूनही जिल्ह्यावर घोंघावत असलेला अवकाळी पावसाचा तडाखा अशा नैसर्गिक आपत्तीच्या फेºयात जिल्हा पुरता अडकला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून जिल्ह्यातील आपत्ती कायम असल्याने प्रशासनालाही कसोटीला सामोेरे जावे लागत आहे.

एकापाठोपाठ एक येत असलेल्या आपत्तीमुळे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान तर झाले आहेच शिवाय जनजीवनही विस्कळीत झाले आहे.जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाण्याची तीव्र टंचाई भासत असते. अशा स्थितीत पुढील सहा महिने पाणी नियोजनाचे दिव्य जनतेपुढे असते. यंदाही जिल्ह्यात फेब्रुवारीदरम्यान सुरू झालेले पाण्याचे टॅँकर जुलै महिन्यापर्यंत चालूच होते. जत, आटपाडी, कवठेमहांकाळसह अन्य भागात एकावेळी ३२० हून अधिक टॅँकर चालू होते, तर पाणी टंचाईमुळे ४ लाख ८० हजारहून अधिक जनता बाधित झाली होती.

निर्धारित वेळेत जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होईल, हा अंदाज यंदाही फोल ठरल्याने जुलै मध्यापर्यंत काही भागात टॅँकर सुरूच होते. पाणीटंचाईचे नियोजन करून थोडी उसंत मिळत असतानाच, आॅगस्ट महिन्याची सुरुवातच सांगलीकरांना महापुराच्या कटू अनुभवाने झाली. सुरुवातीला २००५ ची पातळीही गाठणार नाही, अशा वाटणाºया पुराने ५७ फुटांपर्यंत मजल मारत सांगली शहरासह जिल्ह्यातील १०४ गावांचे होत्याचे नव्हते करून टाकले. महापुराने ५५ हजारांवर हेक्टरवरील शेती

जमीनदोस्त झाली, तर १५ हजार ५२९ व्यापाऱ्यांच्या व्यावसायिक आस्थापनांचे नुकसान झाले. महापुरामुळे ८८ हजार ६०० कुटुंबे बाधित झाली असून, अद्यापही त्यातील बहुतांशजणांचे दैनंदिन जीवन बाधित आहे.

महापुराच्या कटू आठवणीतून जिल्हा सावरत असतानाच जिल्ह्यात परतीच्या मान्सूनने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या सर्वदूर झालेल्या या पावसाने शेतीसह घरे, जनावरे, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. सलग आठ महिन्यांपासून आपत्ती झेलत असलेल्या जिल्ह्यातून परतीच्या मान्सूनने ह्यएक्झीटह्ण घेतली असली तरी, त्यानंतर लगेचच अवकाळीने थैमान घालण्यास सुरुवात केली व त्यात द्राक्ष, डाळिंब, भाजीपाल्यासह इतर ५५ हजार १३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पिके अक्षरश: कुजू लागली आहेत. तरीही पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत.

टॅग्स :SangliसांगलीfloodपूरGovernmentसरकार