शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

जिल्हा बँक संचालकांमध्ये खडाजंगी : ‘वसंतदादा’च्या करारावरून वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:07 IST

सांगली : दत्त इंडिया कंपनीकडून घेतलेल्या ६० कोटी रुपयांच्या सुरक्षा अनामत रकमेतील ३० कोटी रुपये जिल्हा बँकेने वसंतदादा कारखान्याला दिल्यामुळे जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत सोमवारी जोरदार वादावादी झाली. काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी याबाबत जाब विचारल्यानंतर, प्रताप पाटील व त्यांच्यात खडाजंगी झाली.जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ...

ठळक मुद्दे३० कोटी रुपये कंपनीस परस्पर दिल्यावरून विक्रम सावंत यांचा संताप

सांगली : दत्त इंडिया कंपनीकडून घेतलेल्या ६० कोटी रुपयांच्या सुरक्षा अनामत रकमेतील ३० कोटी रुपये जिल्हा बँकेने वसंतदादा कारखान्याला दिल्यामुळे जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत सोमवारी जोरदार वादावादी झाली. काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी याबाबत जाब विचारल्यानंतर, प्रताप पाटील व त्यांच्यात खडाजंगी झाली.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. वसंतदादा कारखान्याने ९३ कोटी रुपयांची थकबाकी न भरल्यामुळे जिल्हा बँकेने मार्च २०१७ मध्ये वसंतदादा कारखान्याचा ताबा घेतला. त्यानंतर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढली. १८ मे २०१७ रोजी दत्त इंडियाने दहा वर्षे मुदत आणि प्रतिटन गाळपासाठी २६१ रुपये दराची निविदा सादर केल्याने व त्यांची सर्वाधिक दराची निविदा ठरल्याने कारखाना त्यांना भाडेतत्त्वावर देण्यात आला. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ५ जुलै २०१७ रोजी याबाबतचा निर्णय झाला.

निविदेतील अटीप्रमाणे ६० कोटी रुपये सुरक्षा अनामत जिल्हा बँकेकडे जमा केल्यानंतरच अंतिम करार झाला. या सुरक्षा अनामत रकमेवरून सुरुवातीपासूनच वाद निर्माण झाले होते. या रकमेतून कामगार, शेतकरी यांची देणी किती द्यायची, शासकीय देणी किती द्यायची व जिल्हा बँकेने त्यातील किती रक्कम ठेवायची, याबाबत नियोजन झाले.

नियोजनानुसार जिल्हा बँकेने ३० कोटी रुपये स्वत:जवळ ठेवून उर्वरित ३० कोटी रुपये देणी देण्यासाठी कारखान्याला दिले. वास्तविक ही ६० कोटी अनामत रक्कम करार संपल्यानंतर पुन्हा कंपनीला परत करायची आहे. असे असताना त्यातील ३० कोटी रुपये वसंतदादा कारखान्याला कोणत्या कायद्याच्या आधारे दिले?, असा सवाल विक्रम सावंत यांनी उपस्थित केला. ३० कोटीच्या या चुकीच्या तरतुदीमुळे जिल्हा बँकेचा तोटा झाल्याचा निष्कर्ष बँकेचे लेखाधिकारी बापट यांनी काढला आहे. याचा दाखला सावंत यांनी बैठकीत दिला.

विक्रम सावंत आक्रमक झाले असतानाच संचालक प्रताप पाटील यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. बँकेचे यामुळे नुकसान झाले नसल्याचे प्रताप पाटील यांनी सांगितले व त्यामुळे दोन्ही संचालकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते.करार पुन्हा वादातजिल्हा बॅँक आणि दत्त इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या करारावरून गेले वर्षभर वाद सुरू आहे. सुरुवातीला निवृत्त कामगारांची कृती समिती, शेतकरी संघटना यांनी कराराच्या गोपनीयतेबद्दल टीका केली होती. याप्रश्नी आंदोलनही करण्यात आले होते. काही महिने हा वाद शांत झाल्यानंतर आता संचालक मंडळातील गरमागरमीवरून पुन्हा तो चर्चेत आला आहे. वसंतदादा कारखाना दत्त इंडिया कंपनीकडे दहा वर्षे ताब्यात राहणार आहे. या करारात कोणत्याही त्रुटी राहिल्या तर जिल्हा बॅँक संचालक मंडळ अडचणीत येऊ शकते. करारामध्ये यासंदर्भात नेमक्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे, याबाबत अद्याप कोणालाही स्पष्ट कल्पना नाही. शेतकरी संघटना, कामगारांनी आक्षेप घेतल्यानंतर आता जिल्हा बँकेचे संचालकही करारावरून आक्रमक होताना दिसत आहेत.जुन्या वादाला तोंडमागील काही वर्षांपासून संचालक विशाल पाटील आणि विक्रमसिंह सावंत यांच्यात अंतर्गत वाद सुरू आहे. यापूवीर्ही जिल्हा बँकेच्या सभेत दोघांमध्ये वाद उफाळून आला होता, परंतु सोमवारी झालेल्या बैठकीला विशाल पाटील उपस्थित नव्हते. वसंतदादा कारखान्याच्या भाडे करारातील त्रुटीचा मुद्दा विक्रम सावंत यांनी उपस्थित केला. त्यामुळे दोन्ही युवा नेत्यांतील वाद उफाळून आल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.चर्चेबद्दल गोपनीयताबँकेचे अध्यक्ष पाटील यांच्याशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही. दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही याबाबत माहिती देण्यास नकार दिला. एकूणच या प्रकाराबद्दल कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक