शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

ताकारी पंपगृह वितरीकेच्या पाण्याचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 16:24 IST

सांगली : शाश्वत शेती करण्यासाठी पाण्याचीही शाश्वती असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत निर्माण झाल्यानंतर शेती उत्पादनाच्या माध्यमातून ...

ठळक मुद्देताकारी पंपगृह विभाग क्रमांक 1 च्या वितरीका क्रमांक 2 चे पाणी परिचलन व पाणी पूजनशेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील  : विश्वजीत कदम

सांगली : शाश्वत शेती करण्यासाठी पाण्याचीही शाश्वती असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत निर्माण झाल्यानंतर शेती उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावेल. शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण करू. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथे ताकारी पंपगृह विभाग क्रमांक 1 च्या वितरीका क्रमांक 2 चे पाणी परिचलन व पाणी पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत, प्रांताधिकारी गणेश मरकड, ताकारी पंपगृह क्र. 1 चे कार्यकारी अभियंता राजन डवरी, तहसिलदार शैलजा पाटील, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन नाईक, महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम, बाळासाहेब पवार, सुरेश खारगे, खाशाबा दळवी, रतन पाटील, उत्तमराव पवार, उमेश साळोखे, एन. बी. कांबळे, पी. एम. येसणे आदि उपस्थित होते.कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, जिल्ह्यात ताकारी, टेंभू, आरफळ, म्हैसाळ या उपसा जलसिंचन योजना दुष्काळी भागासाठी वरदायिनी ठरत आहेत. या योजनांमुळे दुष्काळी भागांचा कायापालट होताना दिसत असून उर्वरीत दुष्काळी भागात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी या योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. सांगली जिल्ह्याला पालकमंत्री म्हणूल लाभलेले जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास हा विभाग असल्याने येत्या काळात जिल्ह्यातील उपसा जलसिंचन योजनांची उर्वरीत कामे गतीने पूर्ण करण्यात येतील. 

 राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, अतिवृष्टी नंतर आलेल्या कोरोना संकटातून आता महाराष्ट्र हळूहळू बाहेर पडत आहे. कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीत 1 लाख 13 हजार कोटीची तूट आली आहे. पण राज्यातील कृषि उत्पन्नामध्ये 11.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही एक आशेची बाब आहे. या पुढील काळात जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावरून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहू. त्याचबरोबर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रूपये अनुदान देण्याबाबत शासन स्तरावरील पुरवणी मागण्यांमध्ये याबाबतचा पाठपुरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले.कार्यकारी अभियंता राजन डवरी यावेळी म्हणाले, ताकारी पंपगृह क्रमांक 1 ची वितरीका क्रमांक 2 ही सुमारे 10 कि.मी. लांबीची पाणी परिचलन वितरीका आहे. यासाठी 9 कोटी 50 लाख इतका खर्च झाला आहे. या वितरीकेवर 24 पाणी व्हॉल्व बसविण्यात आले असून याव्दारे 2 हजार 400 हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या वितरीकेव्दारे देवराष्ट्रे गावातील 31.20 हेक्टर, कुंभारगाव 330.47 हेक्टर, जाधवनगर 102.40 हेक्टर, बलवडी 703.19 हेक्टर, कुंडल 571.12 हेक्टर, आंधळी 342.24 हेक्टर, पलूस 320.91 हेक्टर या प्रमाणे शेतीस पाणीपुरवठा होणार आहे.राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते वितरीका क्रमांक 2 चा व्हॉल्व फिरवून पाणी वितरण शुभारंभ करण्यात आला. कुंभारगाव येथील पहिल्या व्हॉल्वच्या ठिकाणी त्यांच्याहस्ते या वितरीकेच्या पाण्याचे पूजन करण्यात आले. 

टॅग्स :WaterपाणीVishwajeet Kadamविश्वजीत कदमmiraj-acमिरजSangliसांगली