शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

ताकारी पंपगृह वितरीकेच्या पाण्याचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 16:24 IST

सांगली : शाश्वत शेती करण्यासाठी पाण्याचीही शाश्वती असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत निर्माण झाल्यानंतर शेती उत्पादनाच्या माध्यमातून ...

ठळक मुद्देताकारी पंपगृह विभाग क्रमांक 1 च्या वितरीका क्रमांक 2 चे पाणी परिचलन व पाणी पूजनशेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील  : विश्वजीत कदम

सांगली : शाश्वत शेती करण्यासाठी पाण्याचीही शाश्वती असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत निर्माण झाल्यानंतर शेती उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावेल. शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण करू. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथे ताकारी पंपगृह विभाग क्रमांक 1 च्या वितरीका क्रमांक 2 चे पाणी परिचलन व पाणी पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत, प्रांताधिकारी गणेश मरकड, ताकारी पंपगृह क्र. 1 चे कार्यकारी अभियंता राजन डवरी, तहसिलदार शैलजा पाटील, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन नाईक, महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम, बाळासाहेब पवार, सुरेश खारगे, खाशाबा दळवी, रतन पाटील, उत्तमराव पवार, उमेश साळोखे, एन. बी. कांबळे, पी. एम. येसणे आदि उपस्थित होते.कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, जिल्ह्यात ताकारी, टेंभू, आरफळ, म्हैसाळ या उपसा जलसिंचन योजना दुष्काळी भागासाठी वरदायिनी ठरत आहेत. या योजनांमुळे दुष्काळी भागांचा कायापालट होताना दिसत असून उर्वरीत दुष्काळी भागात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी या योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. सांगली जिल्ह्याला पालकमंत्री म्हणूल लाभलेले जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास हा विभाग असल्याने येत्या काळात जिल्ह्यातील उपसा जलसिंचन योजनांची उर्वरीत कामे गतीने पूर्ण करण्यात येतील. 

 राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, अतिवृष्टी नंतर आलेल्या कोरोना संकटातून आता महाराष्ट्र हळूहळू बाहेर पडत आहे. कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीत 1 लाख 13 हजार कोटीची तूट आली आहे. पण राज्यातील कृषि उत्पन्नामध्ये 11.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही एक आशेची बाब आहे. या पुढील काळात जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावरून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहू. त्याचबरोबर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रूपये अनुदान देण्याबाबत शासन स्तरावरील पुरवणी मागण्यांमध्ये याबाबतचा पाठपुरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले.कार्यकारी अभियंता राजन डवरी यावेळी म्हणाले, ताकारी पंपगृह क्रमांक 1 ची वितरीका क्रमांक 2 ही सुमारे 10 कि.मी. लांबीची पाणी परिचलन वितरीका आहे. यासाठी 9 कोटी 50 लाख इतका खर्च झाला आहे. या वितरीकेवर 24 पाणी व्हॉल्व बसविण्यात आले असून याव्दारे 2 हजार 400 हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या वितरीकेव्दारे देवराष्ट्रे गावातील 31.20 हेक्टर, कुंभारगाव 330.47 हेक्टर, जाधवनगर 102.40 हेक्टर, बलवडी 703.19 हेक्टर, कुंडल 571.12 हेक्टर, आंधळी 342.24 हेक्टर, पलूस 320.91 हेक्टर या प्रमाणे शेतीस पाणीपुरवठा होणार आहे.राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते वितरीका क्रमांक 2 चा व्हॉल्व फिरवून पाणी वितरण शुभारंभ करण्यात आला. कुंभारगाव येथील पहिल्या व्हॉल्वच्या ठिकाणी त्यांच्याहस्ते या वितरीकेच्या पाण्याचे पूजन करण्यात आले. 

टॅग्स :WaterपाणीVishwajeet Kadamविश्वजीत कदमmiraj-acमिरजSangliसांगली