शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील खानापूर, मिरज विधानसभा मतदारसंघावरून 'महाआघाडी'मध्ये नाराजी नाट्य, भाजपात अतंर्गत गटबाजी

By अशोक डोंबाळे | Updated: August 24, 2024 18:08 IST

महायुतीमध्ये सध्या तरी वादळापूर्वीची शांतता

अशोक डोंबाळे

सांगली : महाविकास आघाडीमध्ये खानापूर, मिरज व सांगलीच्या जागेवरून वादंग होण्याची चिन्हे आहेत. खानापूर, मिरज विधानसभा मतदारसंघांवर उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने दावा सांगितल्यामुळे नेत्यांमध्ये नाराजी नाट्य निवडणूकीपूर्वीच रंगले आहे. महायुतीमध्ये सध्या तरी वादळापूर्वीची शांतता आहे. सांगली, मिरज, शिराळा, जतमध्ये भाजपला अंतर्गत गटबाजीचाच सर्वाधिक फटका बसणार आहे.विधानसभा निवडणुकांसाठी ऑक्टोबरपासून आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने मतदारयादी करण्यासह निवडणुकीची पूर्णतयारी केली आहे. महाआघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनीही विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. महाआघाडीस लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते मोठ्या जोशात विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीमध्ये प्रमुख काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा समावेश आहे. काँग्रेसची सध्या सांगली, पलूस-कडेगाव, मिरज आणि जतमध्ये मजबूत बांधणी आहे. यामुळे काँग्रेसचे खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित पाटील यांनी सांगली, पलूस-कडेगाव, जत, मिरज विधानसभेबरोबरच खानापूर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. येथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांचे नातू व काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम तयारी करत आहेत. शरदचंद्र पवार गटाचे शिराळा, इस्लामपूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघावर वर्चस्व असून, येथे त्यांचे विद्यमान आमदार आहेत. या तीन जागा सोडून मिरज, खानापूर आणि जत विधानसभेच्या जागांवर शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दावा केला आहे. उद्धवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्या तरी सांगली, मिरज आणि खानापूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे; पण खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार असल्यामुळे तो मतदारसंघ त्यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खानापूर आणि मिरज विधानसभा मतदारसंघावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे प्रमुख तीन पक्ष आहेत. याशिवाय, काही छोटे पक्ष, संघटनाही त्यांच्या सोबत आहेत; पण विधानसभा निवडणुकीत त्याच्या वाट्याला महायुतीचे मोठे पक्ष जागा सोडण्याची शक्यता फारच कमी आहे. भाजपचे सांगली, मिरज विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत; पण पक्षांतर्गत बंडाळीमुळे सांगली, मिरजेच्या जागा टिकविण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान आहे.शिराळा, जत, खानापूर विधानसभा मतदारसंघातही भाजप नेत्यांमध्येच कुरघोड्याचे राजकारण रंगले आहे. शिवसेना शिंदे गटाने सध्या तरी खानापूर विधानसभा मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सध्या तरी तासगाव-कवठेमहांकाळ, शिराळा, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघावर लक्ष ठेवले आहे. यापैकी एखादा मतदासंघ मिळू शकतो.

महायुतीने या विधानसभांवर केला दावामहायुतीमध्ये भाजपने सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, जत, शिराळा, इस्लामपूर मतदारसंघावर, तर शिवसेना शिंदे गटाने खानापूर, राष्ट्रवादी अजित पवार गटाने तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

महाविकास आघाडीने या विधानसभांवर केला दावाकाँग्रेसने सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, जत, खानापूर मतदारसंघावर, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने शिराळा, इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर मतदारसंघावर दावा केला आहे. उद्धवसेनेकडूनही खानापूर, मिरज, सांगली विधानसभेवर दावा केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा