शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

महावितरण कंपनीकडे वीज मीटरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 15:40 IST

सांगली : वीज मीटरचा तुटवडा संपुष्टात आल्याचे महावितरणचे अधिकारी सांगत असले तरी, जिल्ह्यात आजही पाच ते सहा हजार वीज ...

ठळक मुद्देभविष्यात वीज मीटरची टंचाई भासणार नाही.

सांगली : वीज मीटरचा तुटवडा संपुष्टात आल्याचे महावितरणचे अधिकारी सांगत असले तरी, जिल्ह्यात आजही पाच ते सहा हजार वीज मीटर्सचा तुटवडाच आहे. पन्नास हजार जुनी मीटर्स महिन्याला बदलण्याचे उद्दिष्ट असताना, केवळ महिना तीन   ते चार हजार नवीन मीटर्स मिळत आहेत. नवीन कनेक्शन देण्यातही अडचणी येत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

वीज गळती रोखण्यासाठी महावितरण कंपनीने घरगुती, वाणिज्य, शेती आणि औद्योगिक विभागातील जुनी इलेक्ट्रो-मेकॅनिकल मीटर व नादुरुस्त मीटर बदलण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात घरगुती पाच लाख ४८ हजार १२, वाणिज्य ४९ हजार ६९८, शेतीचे दोन लाख २१ हजार ६४४ आणि औद्योगिकचे नऊ हजार ५५२ ग्राहक आहेत. या ग्राहकांपैकी ६० टक्के ग्राहकांकडे   जुनी मीटर आहेत. जुने मीटर बदलल्यामुळे ग्राहक आणि महावितरणच्याही फायद्याचेच आहे. 

वीज मीटर बदलण्याचा आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून मिळतो. पण, तेवढ्या प्रमाणात मीटरच मिळत नसल्यामुळे स्थानिक अधिकाºयांचे हाल होत आहेत. जिल्ह्यात महिन्यासाठी दहा हजार नवीन वीज मीटर्सची गरज असताना, केवळ तीन  ते चार हजारच मीटर्स मिळत आहेत. यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. तसेच मीटरच्या तुटवड्यामुळे अनेकवेळा वीज ग्राहक आणि महावितरण कर्मचारी यांच्यात वादाचे प्रकार घडताना दिसत आहेत. नवीन कनेक्शन देण्यातही अडचणी येत आहेत. नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे.

महावितरणच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महावितरणने ३० लाख नवीन सिंगल फेज वीज मीटर्सची खरेदी केली असून, पहिल्या टप्प्यात त्यातील ८९ हजार नवीन मीटर्स आॅगस्ट महिन्यात विविध कार्यालयांत उपलब्ध करून दिली आहेत. सप्टेंबर महिन्यात सुमारे २ लाख ६० हजार मीटर्स उपलब्ध झाली आहेत. पुढील प्रत्येक महिन्यात सुमारे ३ लाख ८० हजार नवीन वीज मीटर्स ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. २०१९ च्या मे महिन्यापर्यंत ही ३० लाख मीटर्स महावितरणला मिळणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन केले आहे. भविष्यात वीज मीटरची टंचाई भासणार नाही.

टॅग्स :mahavitaranमहावितरणSangliसांगली