शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विंधन विहीरींच्या कामात अडचणी

By admin | Updated: June 11, 2015 00:37 IST

जलव्यवस्थापन समिती सभेत उघड : केवळ ७५ कामांना कार्यारंभ आदेश

सिंधुदुर्गनगरी : पाणीटंचाईच्या २१५ मंजूर कामांपैकी आतापर्यंत केवळ ७५ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. मात्र संबंधितांकडून वेळीच जागेची बक्षिसपत्र करून मिळत नसल्याने पाणीटंचाईच्या विंधन विहिरीच्या कामांना अडचणी येत असल्याची माहिती बुधवारी जलव्यवस्थापन समिती सभेत उघड झाली.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, उपाध्यक्ष रणजित देसाई, शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्यासह समिती सदस्य, खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ५ कोटी ७५ लाखांचा तीन गावे ६५९ वाड्यांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा बनविण्यात आला आहे. यामध्ये पाणीटंचाईच्या प्राप्त प्रस्तावामधून प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या २१५ कामांपैकी आतापर्यंत केवळ ७५ कामांनाच कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तर एकूण २१५ मंजूर कामांमध्ये १३७ विंधन विहिरी, १० विंधन विहिर दुरुस्ती, ३० विहिरीचा गाळ काढणे, ३० नळपाणी योजना दुरुस्ती व ८ तात्पुरत्या नळपाणी योजनांच्या कामांचा समावेश आहे. तर या कामांसाठी २ कोटी ३६ लाख ४८ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. ३६ विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली असून त्यापैकी ३१ यशस्वी ठरली आहेत तर अन्य दुरुस्ती व गाळ काढण्याची कामे सुरु आहेत. विंधन विहिरीची कामे १३७ मंजूर असली तरी यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे बक्षिसपत्र वेळीच करून मिळत नसल्याने मंजूर होऊनही कामे रखडली आहेत. पाणीटंचाईच्या कामांची मागणी होत असली तरी स्थानिक पातळीवरून बक्षिसपत्र व अन्य कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सहकार्य मिळत नसल्याने पाणीटंचाईच्या कामात अडचणी येत असल्याची माहिती सभेत देण्यात आली.लघुपाटबंधारे विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्ह्यात १३८ लाखांची २२ कामे सुरु करण्यात आली आहेत. तसेच देवगड-विजयदुर्ग नळपाणी योजनेच्या पाणीपट्टी वसुलीपेक्षा या योजनेवर खर्चच जादा येत आहे. त्यामुळे या योजना तोट्यात चालवाव्या लागत असल्याची माहिती सभेत देण्यात आली.जिल्ह्यातील १६४० पाणी नमुने तपासले असता त्यामध्ये ८१ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. मात्र या सर्व पाणीस्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यात आले असल्याची माहिती सभेत दिली. (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्हा हागंदारीमुक्तीकडेसिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही ३३ गावे हागंदारीमुक्त झालेली आहेत. त्यामध्ये काही कुटुंबांकडे शौचालय नाहीत. मात्र येत्या २ आॅक्टोबर रोजी जिल्हा हागंदारीमुक्त म्हणून जाहिर केला जाणार आहे. त्यासाठी शिल्लक काम तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देत त्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे असे आवाहन सभेत करण्यात आले.