शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

डायलिसिस मोफत होणार; सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळमध्ये कार्यान्वित, अन्य ठिकाणी लवकरच 

By अविनाश कोळी | Updated: January 2, 2025 18:58 IST

अविनाश कोळी सांगली : डायलिसिसची गरज असलेल्या सामान्य रुग्णांना आता आरोग्य यंत्रणेने मोठा दिलासा दिला आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा ...

अविनाश कोळीसांगली : डायलिसिसची गरज असलेल्या सामान्य रुग्णांना आता आरोग्य यंत्रणेने मोठा दिलासा दिला आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा व राष्ट्रीय आरोग्य अभियानातून उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डायलिसिस सेंटर्स उभारले जात आहेत. कवठेमहांकाळ येथील केंद्र कार्यान्वित झाले असून इस्लामपूर, आष्टा, कोकरुड, विटा याठिकाणीही हे सेंटर्स सुरू होणार आहेत. त्यामुळे याठिकाणी रुग्णांना मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध होईल.जिल्ह्याच्या प्रत्येक भागात ही सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आरोग्य यंत्रणेची धडपड सुरू आहे. कवठेमहांकाळ येथे कोरोना काळात उभारलेलेे ५० बेडचे रुग्णालय आता डायलिसिस सेंटर म्हणून रूपांतरित झाले आहे. याठिकाणी आठ डायलिसिस यंत्रे बसविण्यात आली आहेत. दोन शिफ्टमध्ये येथे १६ रुग्णांचे डायलिसिस केले जाऊ शकते. आता इस्लामपूरमध्ये लवकरच सेंटर सुरू होणार आहे. आष्टा, कोकरुड, विटा येथेही सेंटर्स उभारणीच्या हालचाली सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वत्र जागेच्या उपलब्धतेनुसार डायलिसिस सेंटर उभारण्याचे नियोजन केले जात आहे.

५५ रुग्णांना लाभकवठेमहांकाळ येथील केंद्रात आजवर ५५ रुग्णांचे डायलिसिस करण्यात आले. जत, मिरज पूर्व, तासगाव, सांगोला, अथणी या भागातील रुग्णांना या केंद्राचा लाभ होणार आहे, अशी माहिती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय भाेसेकर यांनी दिली.

नियुक्त संस्थेमार्फत कामयलिसिस सेंटरचे काम एचएलएल लाइफ केअर लिमिटेडमार्फत चालविले जाते. डॉक्टर, तंत्रज्ञ व कर्मचारी त्यांच्यामार्फतच नियुक्त केले जातात. रुग्णांना मोफत सेवा दिल्यानंतर शासनाकडून त्यांना त्याची प्रतिपूर्ती मिळते.

विट्यामध्ये शंभर बेडच्या रुग्णालयाचा प्रस्तावविट्यात शंभर बेडच्या रुग्णालयाचा प्रस्ताव असून त्याठिकाणी डायलिसिस सेंटर उभारले जाणार आहे. जागेची निश्चिती झाल्यास त्याठिकाणीही सेवा सुरू होईल. त्याचा लाभ परिसरातील रुग्णांना होणार आहे.

मशीन काम कसे करते ?किडनी निकामी ठरल्यानंतर रुग्णाला वाचविण्यासाठी डायलिसिस हा पर्याय उत्तम ठरतो. मशीनद्वारे रुग्णांच्या रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरीरात पुरविले जाते. ही मशीन किडनीसारखेच कृत्रिमरीत्या काम करते. किडनीग्रस्त रुग्ण हा डायलिसिस उपचार घेऊन १५ वर्षांपासून जास्त काळ जगू शकतो.

कवठेमहांकाळ येथील डायलिसिस सेंटर अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. जिल्ह्याच्या अन्य भागातील प्रस्तावित सेंटर्सही लवकरच सुरू होतील. या सेंटरच्या माध्यमातून सामान्य रुग्णांना मोफत सेवा मिळणार आहे. त्यामुळे शासनाची ही योजना लोकांना दिलासा देणारी आहे. - डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली

टॅग्स :SangliसांगलीdialysisडायलिसिसHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलGovernmentसरकार