शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

इस्लामपूरच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मांडला होता विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 13:21 IST

पन्नास वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरातील प्रमुख पंत सबनीस यांनी उरुण-इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामकरण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा विषय मांडला होता.

अशोक पाटील

इस्लामपूर : पन्नास वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरातील प्रमुख पंत सबनीस यांनी उरुण-इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामकरण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा विषय मांडला होता. आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने हा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे.

उरुण-इस्लामपूरपैकी उरुणची निर्मिती पहिल्यांदा झाली. उरुणावती देवीच्या नावावरून एका वस्तीला उरुण हे नाव पडले. त्यानंतर विस्तारित झालेल्या वस्त्यांना इस्लामपूर असे नाव देण्यात आले. शासन दरबारी उरुण-इस्लामपूर हेच नाव आहे. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी इस्लामपूरला ‘ईश्वरपूर’ संबोधून काही ठिकाणी फलकही लावले होते. परंतु या नावाला शासनाची मान्यता मिळाली नाही. आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी हा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे.

विकासकामे, भुयारी गटार योजना यावरून सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादासाठी संघर्ष टोकाला गेला असतानाच शिवसेनेने नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर आणून पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.

नगरपालिकेतराष्ट्रवादीची सत्ता असताना शिवसेनेने आणि काही संघटनांनी ईश्वरपूरचा मुद्दा पालिकेच्या सभागृहात आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा विषय बाजूला ठेवला जात होता. आता पालिकेत आमची सत्ता आहे. ती मुदत काही दिवसात संपणार आहे. त्यामुळे नामकरणाचा विषय मंजुरीसाठी सभागृहात ठेवणार आहोत. -आनंदराव पवार, जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक, शिवसेना.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरShiv Senaशिवसेना