शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

इस्लामपूरच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मांडला होता विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 13:21 IST

पन्नास वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरातील प्रमुख पंत सबनीस यांनी उरुण-इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामकरण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा विषय मांडला होता.

अशोक पाटील

इस्लामपूर : पन्नास वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरातील प्रमुख पंत सबनीस यांनी उरुण-इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामकरण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा विषय मांडला होता. आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने हा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे.

उरुण-इस्लामपूरपैकी उरुणची निर्मिती पहिल्यांदा झाली. उरुणावती देवीच्या नावावरून एका वस्तीला उरुण हे नाव पडले. त्यानंतर विस्तारित झालेल्या वस्त्यांना इस्लामपूर असे नाव देण्यात आले. शासन दरबारी उरुण-इस्लामपूर हेच नाव आहे. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी इस्लामपूरला ‘ईश्वरपूर’ संबोधून काही ठिकाणी फलकही लावले होते. परंतु या नावाला शासनाची मान्यता मिळाली नाही. आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी हा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे.

विकासकामे, भुयारी गटार योजना यावरून सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादासाठी संघर्ष टोकाला गेला असतानाच शिवसेनेने नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर आणून पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.

नगरपालिकेतराष्ट्रवादीची सत्ता असताना शिवसेनेने आणि काही संघटनांनी ईश्वरपूरचा मुद्दा पालिकेच्या सभागृहात आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा विषय बाजूला ठेवला जात होता. आता पालिकेत आमची सत्ता आहे. ती मुदत काही दिवसात संपणार आहे. त्यामुळे नामकरणाचा विषय मंजुरीसाठी सभागृहात ठेवणार आहोत. -आनंदराव पवार, जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक, शिवसेना.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरShiv Senaशिवसेना