शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

रिक्षाच्या कर्जांना मुदतवाढीची कृती समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST

सांगली : राज्यभरात लॉकडाऊन शिथिल होत असले तरी प्रवासी वाहतूक अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे बँका व ...

सांगली : राज्यभरात लॉकडाऊन शिथिल होत असले तरी प्रवासी वाहतूक अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे बँका व वित्तीय कंपन्यांनी रिक्षांच्या कर्जांना मुदतवाढ देण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली. मिरजेत यासंदर्भात मंगळवारी विविध रिक्षा संघटनांची बैठक झाली.

पॅगो प्रवासी रिक्षा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले म्हणाले की, लॉकडाऊन शिथिल झाल्याने कर्जवसुलीसाठीचा तगादा सुरू होण्याची शक्यता आहे. कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे यापूर्वी काही रिक्षाचालकांनी आत्महत्याही केल्या आहेत. तशी वेळ पुन्हा येता कामा नये. यासाठी लॉकडाऊन १०० टक्के शिथिल होईपर्यंत आणि रेल्वे, बसवाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत कर्जांना स्थगिती मिळावी. तशा सूचना शासनाने बॅंका व वित्तसंस्थांना द्याव्यात.

कर्जाचे हप्ते, व्याज त्यावरील दंडव्याज वसुलीसाठी रिक्षाचालकांना धमकावण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. भीती घालून रिक्षा ओढून नेण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्याला विरोध करण्याचे बैठकीत ठरले. यावेळी राजू रसाळ, अजमुद्दिन खतीब, मोईन खताळ, तुषार मोहिते, शरीफ काझी, शिवाजी जाधव, रशीद शेख, बाळू खतीब, अरीफ शेख, अजित पाटील, महेश सातवेकर, सुहास कांबळे, प्रदीप फराटे, शाहीर खराडे, प्रकाश चव्हाण, अजित नाईक

संतोष ठोंबरे, तानाजी फडतरे, प्रकाश कांबळे, अनिल यादव, सुखदेव कोळी आदी उपस्थित होते.

चौकट

महाराष्ट्रभर रेल्वे, एसटी व खासगी प्रवासी वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने सुरू होईपर्यंत रिक्षा व्यवसाय सुरळीत होणार नाही. कमाई सुरू झाल्यावरच कर्जाचे हप्ते भरण्याचा निर्णय रिक्षाचालकांनी घेतला. रिक्षा व्यवसाय बचाव कृती समितीतर्फे तसे निवेदन निबंधकांना देण्याचाही निर्णय झाला.

चौकट

निबंधकांना निवेदन देणार

महाराष्ट्रभर रेल्वे, एसटी व खासगी प्रवासी वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने सुरू होईपर्यंत रिक्षा व्यवसाय सुरळीत होणार नाही. कमाई सुरू झाल्यावरच कर्जाचे हप्ते भरण्याचा निर्णय रिक्षाचालकांनी घेतला. रिक्षा व्यवसाय बचाव कृती समितीतर्फे तसे निवेदन निबंधकांना देण्याचाही निर्णय झाला.